शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

नळयोजना ठरली कुचकामी

By admin | Updated: July 30, 2015 01:42 IST

बरबसपुरा येथे सात वर्षानंतर पूर्णत्वास आलेली नळ योजना सुरू होताच कुचकामी ठरली. नळ योजनेचे पाणी नागरिकांना मिळत नाही.

काचेवानी : बरबसपुरा येथे सात वर्षानंतर पूर्णत्वास आलेली नळ योजना सुरू होताच कुचकामी ठरली. नळ योजनेचे पाणी नागरिकांना मिळत नाही. ही योजना कुचकामी ठरण्यामागे तांत्रिक विभागाचे दुर्लक्ष आणि कंत्राटदाराची मनमर्जी असल्याचे सांगण्यात आले. बरबसपुरा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत सन २००६-०७ करिता ४४ लाख रूपये खर्चाची नळ योजना मंजूर करण्यात आली होती. या नळ योजनेचे भूमिपूजन तत्कालीन आ. राजेंद्र जैन व दिलीप बंसोड यांच्या हस्ते करण्यात आले होते. नळ योजनेच्या कामाला सुरूवातीपासून अवकळा लागली होती. प्रारंभी या नळ योजनेचे कंत्राट गोंदियातील कंत्राटदारांना दिले होते. त्यांनी अर्धवट कामे करून ठेवले होते. काही महिन्यांनी हे काम स्वत:ला कर्तव्यदक्ष समजणारे नागपूरचे राऊत नामक कंत्राटदाराला देण्यात आले. त्यांना तीन ते चार वर्ष काम पूर्ण करण्यासाठी लागले. आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१४ मध्ये टाकीत पाणी घालून नळ योजनेतून गावकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र गावातील कोणत्याही नागरिकांना नळ योनजेच्या पाण्याची योग्य सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही. बरबसपुरा येथील गावकऱ्यांनी सांगितले की, ज्या दिवसापासून नळाला पाणी सोडण्यात आले, तेव्हा काही निवडक घरांना १० ते १५ गुंड पाणी मिळाले. काही घरी ते चार ते पाच गुंड पाणी तर काही घरी नळाचे पाणीच पोहोचले नाही. नळ योजनेचे पिण्याच्या पाणी सुरू होण्याला सात ते आठ महिने झाले असले तरी निम्म्या गावाला सतत पंधरा दिवस पाणी उपलब्ध झालेले नाही. सद्यस्थितीत नळ योजना ठप्प पडलेली आहे. काही नागरिकांनी लोकमतला सांगितले, या नळयोजनेतून पिण्याचे पाणी वाटप केले जात आहे. ते पाणी पिण्या योग्यच नाही. काही दिवस गढूळ पाणी नळाव्दारे येते. गावात १८० च्या वर कुटुंबांनी नळ जोडणी घेतली आहे. मात्र नळाचे पाणी निम्म्या लोकांना मिळत नाही, असे सरपंच ममता लिचडे यांनी सांगितले. कंत्राटदारांनी काम पूर्ण केले नसल्याने एम.बी. रोकण्यात आली आहे. एम.बी. करिता कंत्राटदार राजेश राऊत तगादा लावत असले तरी काम पूर्ण केल्याशिवाय एम.बी. देण्यात येणार नाही. नरेंद्र मेश्राम यांच्या घरी नळाला पाणी येत नव्हते. मात्र बाजूला असणाऱ्या अनुसया मोटघरे आणि जावरकर यांच्या घरी नळाला पाणी येत होते. यासंबधी राजेश राऊत यांना बोलले असता माझे काम झाले, आता तुम्ही पहा. कदाचित भूत लागल्याने बंद पडले असेल, असे उध्दटपणाचे उत्तर कंत्राटदार राजेश राऊत यांची दिल्याचे सरपंच लिचडे यांनी सांगितले. (वार्ताहर)सर्वांना मलाई, नागरिकांना फुटकी घागर बरबसपुरा नळयोजनेच्या कामाला सात वर्षापेक्षा जास्त काळ लागला. परंतु त्याचा लाभ ग्रामीण नागरिकांना होत नाही. नळयोनजेच्या कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने निधी उकळण्याकरिता कसे-बसे काम केले. अधिकारी, ग्रामपंचायतने टक्केवारी घेतली. अर्थात सर्वांनी मलाई खाल्ली. योजनेचा लाभ नागरिकांना मिळणे गरजेचे होते, ते मिळाले नाही. नळ योनजेच्या कामाकडे ग्रामपंचायतने जातीने लक्ष दिले नाही. राऊत कंत्राटदाराने सद्बुध्दीने काम केले नाही. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचे ऐकून घेतले नाही. त्यामुळे ही नळयोजना कुचकामी ठरल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत. नळयोजनेच्या कामाची मलाई कंत्राटदारासह अधिकारी-पदाधिकाऱ्यांना मिळाली. परंतु सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नागरिकांना काय मिळाले? हे समजण्यासारखे आहे.