शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

सलंगटोला येथील आदिवासींना रस्ताच नाही

By admin | Updated: June 29, 2014 23:58 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील उशीखेडा येथून अडीच किमी अंतरावर असलेल्या सलंगटोला या आदिवासी गावाला येण्या-जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे या आदिवासीसोबत प्रशासन अन्याय करीत

शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील उशीखेडा येथून अडीच किमी अंतरावर असलेल्या सलंगटोला या आदिवासी गावाला येण्या-जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे या आदिवासीसोबत प्रशासन अन्याय करीत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून प्रत्येक छोट्या मोठ्या गावांना पक्के रस्ते तयार केले जाते. परंतु सलंगटोला या आदिवासी गावाला कुठल्याही मार्गाने जोडल्या गेले नाही. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना दल्ली किंवा उशिखेडा येथील शाळेत जाणे कठीण झाले आहे. या गावातील लोक व विद्यार्थी शेतातील धुऱ्याने येणे-जाणे करतात. पावसाळाच्या दिवसात तर धुऱ्याने जाणे सुध्दा कठीण होते. याबाबत दल्ली ग्राम पंचायतला वारंवार मागणी करूनही कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. लोकप्रतिनिधी अथवा कोणताही अधिकारी या गावाकडे ढुकूंनही पाहीले नाही, असा येथील लोकांना आरोप आहे. देशात आदिवासींना सर्वांगिण विकासासाठी वेगळा आदिवासी विकास विभाग असूनही आदिवासी गावाकडे दुर्लक्ष केला जातो, ही शोकांतिका आहे. या गावाकडे दुर्लक्ष केला गेल्याने त्यांचा विकास होण्याऐवजी विकास खुंटेला आहे. उशिखेडा, टेकरी ते सलंगटोला असा मार्ग तयार झाला, तर विद्यार्थी शाळेत जाणे पसंत करतील. अन्यथा विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहावे लागेल. निवडणूक काळात विविध पक्षांचे कार्यकर्ते धुऱ्या पाळीने जाऊन मतासाठी या गावाला भेट दिली. रस्त्याची समस्या नक्कीच दूर करू असे आश्वासन दिले होते.परंतु निवडणूक संपली की, ढुकूंनही पाहत नाही, अशी व्यथा सुज्ञ नागरिकांनी मांडली आहे. स्वातंत्र्याची ६० वर्ष लोटले. मात्र सलंगटोलाला रस्ता नसल्याने येथील नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. (वार्ताहर)