शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

सलंगटोला येथील आदिवासींना रस्ताच नाही

By admin | Updated: June 29, 2014 23:58 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील उशीखेडा येथून अडीच किमी अंतरावर असलेल्या सलंगटोला या आदिवासी गावाला येण्या-जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे या आदिवासीसोबत प्रशासन अन्याय करीत

शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील उशीखेडा येथून अडीच किमी अंतरावर असलेल्या सलंगटोला या आदिवासी गावाला येण्या-जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे या आदिवासीसोबत प्रशासन अन्याय करीत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून प्रत्येक छोट्या मोठ्या गावांना पक्के रस्ते तयार केले जाते. परंतु सलंगटोला या आदिवासी गावाला कुठल्याही मार्गाने जोडल्या गेले नाही. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना दल्ली किंवा उशिखेडा येथील शाळेत जाणे कठीण झाले आहे. या गावातील लोक व विद्यार्थी शेतातील धुऱ्याने येणे-जाणे करतात. पावसाळाच्या दिवसात तर धुऱ्याने जाणे सुध्दा कठीण होते. याबाबत दल्ली ग्राम पंचायतला वारंवार मागणी करूनही कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. लोकप्रतिनिधी अथवा कोणताही अधिकारी या गावाकडे ढुकूंनही पाहीले नाही, असा येथील लोकांना आरोप आहे. देशात आदिवासींना सर्वांगिण विकासासाठी वेगळा आदिवासी विकास विभाग असूनही आदिवासी गावाकडे दुर्लक्ष केला जातो, ही शोकांतिका आहे. या गावाकडे दुर्लक्ष केला गेल्याने त्यांचा विकास होण्याऐवजी विकास खुंटेला आहे. उशिखेडा, टेकरी ते सलंगटोला असा मार्ग तयार झाला, तर विद्यार्थी शाळेत जाणे पसंत करतील. अन्यथा विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहावे लागेल. निवडणूक काळात विविध पक्षांचे कार्यकर्ते धुऱ्या पाळीने जाऊन मतासाठी या गावाला भेट दिली. रस्त्याची समस्या नक्कीच दूर करू असे आश्वासन दिले होते.परंतु निवडणूक संपली की, ढुकूंनही पाहत नाही, अशी व्यथा सुज्ञ नागरिकांनी मांडली आहे. स्वातंत्र्याची ६० वर्ष लोटले. मात्र सलंगटोलाला रस्ता नसल्याने येथील नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. (वार्ताहर)