शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षलागवड काळाजी गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:04 IST

मागील बऱ्याच वर्षांपासून नागरिक आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करीत आहेत. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग व वातावरणातील बदल अशा परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत जलसंकटाची तीव्र समस्या निर्माण झालेली आहे.

ठळक मुद्देपरिणय फुके : वृक्षारोपण कार्यक्र म उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील बऱ्याच वर्षांपासून नागरिक आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करीत आहेत. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग व वातावरणातील बदल अशा परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत जलसंकटाची तीव्र समस्या निर्माण झालेली आहे. यावर मात करण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.येथील पवार बोर्डिंग गोंदिया येथे रविवारी (दि.७) आयोजित वृक्षलागवड कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार विजय रहांगडाले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक विनीता साहू, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्रसंचालक तथा वनसंरक्षक रामानुजन, उपवनसंरक्षक एस.युवराज, वनविकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक दिव्या भारती, प्रामुख्याने उपस्थित होते.फुके म्हणाले, दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे. कारण मानवाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे. त्यामुळे वृक्षलागवड करु न त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. यासाठी स्वयंस्फुर्तीने नागरिकांनी वृक्षलागवड करावी. वृक्षलागवड ही लोकचळवळ होण्याकरीता लोकांना प्रोत्साहित केले पाहिजे. वृक्षलागवड करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे या वृक्षलागवड उपक्रमास सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे असे सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी, येणाºया नवीन पिढीसाठी एक चांगला संदेश जावा यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करावे. आपण कोणकोणत्या प्रजातीच रोपट्यांची लागवड करतो यावर सुद्धा पर्यावरणाचे संतुलन अवलंबून असते.आप्तस्वकीयांच्या वाढदिवसाला भेट म्हणून एखादी महागडी वस्तू न देता, रोपटे भेट म्हणून दयावे असे त्यांनी सांगितले. अशोक इंगळे यांनी, ‘३३ कोटी वृक्ष लागवड’ हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. गोंदिया नगरपरिषदेद्वारे सुद्धा वृक्ष लागवडीचा चांगला कार्यक्रम राबवून या वृक्ष लागवडीच्या उपक्रमास सहकार्य करण्यात येईल. यासाठी नागरिकांनी ‘पाणी अडवा-पाणी जिरवा व पाणी वाचवा’ हा उपक्रम राबवावा.या वृक्ष लागवड उपक्रमास सर्वांचे सहकार्य अपेक्षीत असल्याचे सांगीतले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.प्रास्ताविक उपवनसंरक्षक एस.युवराज यांनी मांडले. संचालन सहायक वनसंरक्षक एम.एच.शेंडे यांनी केले तर आभार सहायक वनसंरक्षक शेख यांनी मानले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे, नगरसेवक दिपक बोबडे, बी.बी.अग्रवाल, मैथुला बिसेन, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्यासह वनरक्षक व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.