शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीचे होणार ‘आॅडिट’

By admin | Updated: August 17, 2016 00:15 IST

शासनाने राज्यात एकाचवेळी दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

८० टक्के रोपे जगवण्याची जबाबदारी : संगोपनासाठी अधिकाऱ्यांवरही भार भंडारा : शासनाने राज्यात एकाचवेळी दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. लागवड केलेल्या रोपांपैकी ८० टक्के जगनलीच पाहिजेत, असे आदेश शासनाने संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे यंदा नुसती वृक्ष लागवड करून भागणार नाही तर लावललेली रोपे जिवंत आहेत, याची शहानिशा होणार आहे. त्यामुळे संगोपणासाठी अधिकाऱ्यांना आता मोठा आटापिटा करावा लागणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने जलसंधारणासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. शासनाच्या वतीने वृक्ष लागवड हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. परंतु लावण्यात आलेली किती रोपे जगली, याकडे मात्र कुणाचेही लक्ष नसायचे. त्यामुळे राज्यातील वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असल्याचे पुढे आले. युती शासनाने यंदा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम चांगलाच मनवर घेतला. १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यांना उद्दीष्ट दिले. वृक्ष लागवडीचा प्रचार, प्रसार करा, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय तथा शासनाचे इतरही विभाग, स्वयंसेवी संस्थांना वृक्ष लागवडीसाठी आणि त्याच्या संवधर्नासाठी प्रोत्साहित करा, असे आदेश शासनाने जिल्हा यंत्रणेला दिले होते. जिल्ह्याला लाखोंच्या घरात वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट होते. ते पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. प्रत्येक शासकीय विभागाला उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यासाठी रोपांची व्यवस्था देखील केली गेली. शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयमसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय, सामाजिक वनीकरण व वनविभाग यांनी एकत्रित येवून वृक्षलागवडीचे लोकचळवळीत रूपातर करीत १ जुलै या एकाच दिवशी जिल्ह्यात लाखो वृक्षांची लागवड केली. कृषी, महसूल, नगर परिषद, जलसंपदा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदीबरोबरच इतर शासकीय कार्यालयांनी देखील मोठ्या दिमाखात वृक्ष लागवड केली आहे. सामाजिक वनीकरण विभागाने, जिल्हाभरात लावण्यात आलेल्या प्रत्येक रोपाची नोंद केली आहे. काही दिवसानी या रोपाचे ‘आॅडिट’ होणार आहे. लावलेली ८० टक्के झाडे जगवण्याची जबाबदारी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांवर टाकली आहे. त्यामुळे या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांना धावपळ करावी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)