शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

वृक्ष प्राधिकरणाची दोन वर्षांपासून प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 21:51 IST

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड ही ग्रामीण नव्हे तर शहरी भागात देखील तेवढीच महत्त्वाची आहे.

ठळक मुद्देआमसभेच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष : पर्यावरण संवर्धन वाºयावर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड ही ग्रामीण नव्हे तर शहरी भागात देखील तेवढीच महत्त्वाची आहे. शहरात व्यापक स्वरुपात वृक्षारोपण करता यावे, शहर हिरवेगार व्हावे, यासाठी स्थानिक नगर परिषदेने दोन वर्षांपूर्वी वृक्ष प्राधिकरण समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. त्याला आमसभेने मंजुरी दिली होती. मात्र अद्यापही वृक्ष प्राधिकरण समितीचीे स्थापना करण्यात आली नाही.शहरातील वाढत्या संख्येमुळे प्रदूषणाच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच शहरीकरणामुळे वृक्षांची संख्या कमी होत आहे. परिणामी पर्यावरणाचे संतुलन ढासळले. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमावर भर दिला जात आहे. याच दृष्टीने शासनाच्या २० सप्टेबर २०१४ च्या निर्णयानुसार ट्री प्रिजर्वेशन अ‍ॅन्ड प्रोटेक्शन अ‍ॅक्ट १९७५ नुसार शहरातील वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समिती गठीत करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. यानंतर स्थानिक नगर परिषदेने ११ आॅगस्ट २०१५ च्या आमसभेत वृक्ष प्राधिकरण समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निणर्याला दोन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही सदर समिती गठीत करण्यात आली नाही.वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एम.मेश्राम यांनी नगर परिषद मुख्याधिकाºयांना पत्र देऊन संयुक्त वनव्यवस्थापन समिती गठीत करण्याबाबतचे पत्र दिले होते. मात्र त्यावर सुध्दा कुठलीच कारवाई झाली नसल्याची माहिती आहे. नगर परिषद मुख्याधिकाºयांनी अद्यापही पर्यावरण संवर्धनाच्या मुद्दा गांर्भियाने घेतला नसल्याचे चित्र आहे.संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडे दुर्लक्षशहरी भागातील वन आणि वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी एक सयुंक्त वन व्यवस्थापन समिती गठीत करण्यात येणार होती. या समितीचे पदसिध्द अध्यक्ष उपवनसंरक्षक राहणार होते. यात नगरसेवक, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक, दोन महिला प्रतिनिधी, पर्यावरण क्षेत्रातील दोन सदस्य, स्वंयसेवी संस्थाचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा समावेश आहे. ही समिती गठीत करण्याकडे सुध्दा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.मुख्याधिकाºयांचे लक्ष केवळ सुभाष बागेकडेशहरात सर्वत्र वृक्षारोपण करुन पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे होते. मात्र नगर परिषद मुख्याधिकारी पाटील यांचे लक्ष केवळ सुभाष बागेकडे असल्याचे चित्र आहे. या बागेतील वृक्षांच्या संवर्धनावर त्यांचा अधिक भर असून शहरातील इतर ठिकाणी असलेल्या वृक्षांच्या संवर्धनाकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. यासंदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी व उपवनसंरक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.