शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

वृक्ष प्राधिकरणाची दोन वर्षांपासून प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 21:51 IST

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड ही ग्रामीण नव्हे तर शहरी भागात देखील तेवढीच महत्त्वाची आहे.

ठळक मुद्देआमसभेच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष : पर्यावरण संवर्धन वाºयावर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड ही ग्रामीण नव्हे तर शहरी भागात देखील तेवढीच महत्त्वाची आहे. शहरात व्यापक स्वरुपात वृक्षारोपण करता यावे, शहर हिरवेगार व्हावे, यासाठी स्थानिक नगर परिषदेने दोन वर्षांपूर्वी वृक्ष प्राधिकरण समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. त्याला आमसभेने मंजुरी दिली होती. मात्र अद्यापही वृक्ष प्राधिकरण समितीचीे स्थापना करण्यात आली नाही.शहरातील वाढत्या संख्येमुळे प्रदूषणाच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच शहरीकरणामुळे वृक्षांची संख्या कमी होत आहे. परिणामी पर्यावरणाचे संतुलन ढासळले. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमावर भर दिला जात आहे. याच दृष्टीने शासनाच्या २० सप्टेबर २०१४ च्या निर्णयानुसार ट्री प्रिजर्वेशन अ‍ॅन्ड प्रोटेक्शन अ‍ॅक्ट १९७५ नुसार शहरातील वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समिती गठीत करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. यानंतर स्थानिक नगर परिषदेने ११ आॅगस्ट २०१५ च्या आमसभेत वृक्ष प्राधिकरण समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निणर्याला दोन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही सदर समिती गठीत करण्यात आली नाही.वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एम.मेश्राम यांनी नगर परिषद मुख्याधिकाºयांना पत्र देऊन संयुक्त वनव्यवस्थापन समिती गठीत करण्याबाबतचे पत्र दिले होते. मात्र त्यावर सुध्दा कुठलीच कारवाई झाली नसल्याची माहिती आहे. नगर परिषद मुख्याधिकाºयांनी अद्यापही पर्यावरण संवर्धनाच्या मुद्दा गांर्भियाने घेतला नसल्याचे चित्र आहे.संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडे दुर्लक्षशहरी भागातील वन आणि वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी एक सयुंक्त वन व्यवस्थापन समिती गठीत करण्यात येणार होती. या समितीचे पदसिध्द अध्यक्ष उपवनसंरक्षक राहणार होते. यात नगरसेवक, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक, दोन महिला प्रतिनिधी, पर्यावरण क्षेत्रातील दोन सदस्य, स्वंयसेवी संस्थाचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा समावेश आहे. ही समिती गठीत करण्याकडे सुध्दा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.मुख्याधिकाºयांचे लक्ष केवळ सुभाष बागेकडेशहरात सर्वत्र वृक्षारोपण करुन पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे होते. मात्र नगर परिषद मुख्याधिकारी पाटील यांचे लक्ष केवळ सुभाष बागेकडे असल्याचे चित्र आहे. या बागेतील वृक्षांच्या संवर्धनावर त्यांचा अधिक भर असून शहरातील इतर ठिकाणी असलेल्या वृक्षांच्या संवर्धनाकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. यासंदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी व उपवनसंरक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.