शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

सौजन्याची वागणूक द्या

By admin | Updated: May 29, 2017 02:01 IST

जेष्ठ नागरिकांना आयुष्याच्या मावळतीला सन्मानजनक वागणूक मिळावी. त्यांच्या कोणत्याही कार्यात अडचणी निर्माण होऊ नयेत.

ज्येष्ठ नागरिकांची मागणी : परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जेष्ठ नागरिकांना आयुष्याच्या मावळतीला सन्मानजनक वागणूक मिळावी. त्यांच्या कोणत्याही कार्यात अडचणी निर्माण होऊ नयेत. त्यांना कोणतेही अधिकचे कष्ट होऊ नये यासाठी शासनाच्या विविध विभागामार्फत विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यामधीेल एक योजना म्हणजे एसटीमधील प्रवास. त्या प्रवासाचा लाभ जेष्ठ नागरिक घेत असले तरी परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करताना त्यांना अनेकदा वाईट अनुभवातून सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या विविध विभागामार्फत जेष्ठ नागरिकांना सोयी-सवलती देऊन, त्यांचा आदर करून मान वाढविण्याचा प्रयत्न असताना परिवहन मंडळाच्या साकोली आगारातून सुटणाऱ्या साकोली-केशोरी या बसफेरीमधून प्रवासा दरम्यान जेष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक किंवा सौजन्याची वागणूक दिली जात नाही. उलट अरे बुढ्या तुझी सवलत पास किंवा निवडणूक ओळखपत्र लवकर दाखव, तू किती वयाचा आहेस, तुझ्याजवळ चिल्लर पैसे असतील तर बसमध्ये चढ अन्यथा चढू नको. हात थरथरत जेष्ठ नागरिकांना ओळखपत्र, पास काढण्यास विलंब होतो. मात्र वाहक मोठा आवाज चढवून बोलण्यास विसरत नाही. अर्थात सर्वच वाहक असे वागतील, असे नाही. काही वाहक चांगलेसुध्दा असल्याची त्यांनी सांगितले. जेष्ठ नागरिकांना वेळोवेळी अपमानजनक वागणूक मिळत असल्याचे सांगण्यात आले. त्यांना वाहकाचे किंवा चालकाचे नाव माहीत आहेत काय? असे विचारले असता, त्यांना नाव विचारणे सोडाच एसटीच्या आतमध्ये घेवून दुरवर कुठेही सोडून देण्याच्या भीतीमुळे नाव विचारू शकलो नाही, असे त्यांनी सांगितले. सर्वच जेष्ठ नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. स्वबळावर उत्पन्नाची अत्यल्प कमी प्राप्ती होत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असते. त्यांच्यावर मोठा आवाज चढवून तिकीटच्या पैशाची मागणी करणे, हीदेखील त्यांच्यासाठी अपमानजनक बाब ठरू शकते. हे परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांनी समजण्याची गोष्ट आहे. यावरून परिवहन मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सभ्यतेचे व सौजन्यशीलतेचे पाठ शिकविण्याची गरज आहे. चालक व वाहकांविषयी जेष्ठ नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. याकडे परिवहन मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन जेष्ठ नागरिकांना एसटीच्या चालक वाहकांकडून सौजन्याची वागणूक मिळण्याची मागणी जेष्ठ नागरिकांनी केली आहे. - बसच्या प्रवासात अपंग सोसतात हालअपेष्टामहामंडळाच्या बसगाड्यात अपंगांकरिता जागा निश्चित केल्या आहेत. प्रवासादरम्यान त्यांना त्रास होऊ नये यासाठी जागा राखीव केली आहे. मात्र या जागेवर प्रवाशांकडून जागा बळकावण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान अपंग व्यक्तींना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. उन्हाळ्याच्या दिवसात बसमध्ये गर्दी असते. अशात महिला व अपंगांना उभे राहूनच प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पहायला मिळते. ‘केवळ महिलांसाठी, अपंगांसाठी राखीव’ लिहिलेल्या आसनावर त्यांना बसविण्याचे सौजन्य वाहकाकडून दाखविले जात नाही. यामुळे आरक्षणाचा हेतू साध्य होताना दिसत नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये आमदार, खासदार, अपंग, महिला, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. सीटच्या मागे व खिडकीजवळ सदर जागा राखीव असल्याची सूचना लिहीलेली असते. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वाहकांची असते. परंतु त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. बसस्थानकावर बस येताच खिडकीतून जागेवर रूमाल, बॅग अशा वस्तू टाकून जागा आरक्षित केली जाते. मात्र अपंग व्यक्तींना हे शक्य होत नाही. परिणामी, बसमध्ये चढल्यानंतर गर्दीमुळे अपंगांना उभे राहुन प्रवास करावा लागतो. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. या नियमांच्या अंमलबजावणीकरिता वाहकांना सूचना देऊन प्रवाशांना सहकार्य करण्याची मागणी अपंग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.