शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
4
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
5
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
6
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
7
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
8
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
9
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
11
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
13
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
14
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
15
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
16
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
17
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
18
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
19
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
20
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!

सौजन्याची वागणूक द्या

By admin | Updated: May 29, 2017 02:01 IST

जेष्ठ नागरिकांना आयुष्याच्या मावळतीला सन्मानजनक वागणूक मिळावी. त्यांच्या कोणत्याही कार्यात अडचणी निर्माण होऊ नयेत.

ज्येष्ठ नागरिकांची मागणी : परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जेष्ठ नागरिकांना आयुष्याच्या मावळतीला सन्मानजनक वागणूक मिळावी. त्यांच्या कोणत्याही कार्यात अडचणी निर्माण होऊ नयेत. त्यांना कोणतेही अधिकचे कष्ट होऊ नये यासाठी शासनाच्या विविध विभागामार्फत विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यामधीेल एक योजना म्हणजे एसटीमधील प्रवास. त्या प्रवासाचा लाभ जेष्ठ नागरिक घेत असले तरी परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करताना त्यांना अनेकदा वाईट अनुभवातून सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या विविध विभागामार्फत जेष्ठ नागरिकांना सोयी-सवलती देऊन, त्यांचा आदर करून मान वाढविण्याचा प्रयत्न असताना परिवहन मंडळाच्या साकोली आगारातून सुटणाऱ्या साकोली-केशोरी या बसफेरीमधून प्रवासा दरम्यान जेष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक किंवा सौजन्याची वागणूक दिली जात नाही. उलट अरे बुढ्या तुझी सवलत पास किंवा निवडणूक ओळखपत्र लवकर दाखव, तू किती वयाचा आहेस, तुझ्याजवळ चिल्लर पैसे असतील तर बसमध्ये चढ अन्यथा चढू नको. हात थरथरत जेष्ठ नागरिकांना ओळखपत्र, पास काढण्यास विलंब होतो. मात्र वाहक मोठा आवाज चढवून बोलण्यास विसरत नाही. अर्थात सर्वच वाहक असे वागतील, असे नाही. काही वाहक चांगलेसुध्दा असल्याची त्यांनी सांगितले. जेष्ठ नागरिकांना वेळोवेळी अपमानजनक वागणूक मिळत असल्याचे सांगण्यात आले. त्यांना वाहकाचे किंवा चालकाचे नाव माहीत आहेत काय? असे विचारले असता, त्यांना नाव विचारणे सोडाच एसटीच्या आतमध्ये घेवून दुरवर कुठेही सोडून देण्याच्या भीतीमुळे नाव विचारू शकलो नाही, असे त्यांनी सांगितले. सर्वच जेष्ठ नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. स्वबळावर उत्पन्नाची अत्यल्प कमी प्राप्ती होत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असते. त्यांच्यावर मोठा आवाज चढवून तिकीटच्या पैशाची मागणी करणे, हीदेखील त्यांच्यासाठी अपमानजनक बाब ठरू शकते. हे परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांनी समजण्याची गोष्ट आहे. यावरून परिवहन मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सभ्यतेचे व सौजन्यशीलतेचे पाठ शिकविण्याची गरज आहे. चालक व वाहकांविषयी जेष्ठ नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. याकडे परिवहन मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन जेष्ठ नागरिकांना एसटीच्या चालक वाहकांकडून सौजन्याची वागणूक मिळण्याची मागणी जेष्ठ नागरिकांनी केली आहे. - बसच्या प्रवासात अपंग सोसतात हालअपेष्टामहामंडळाच्या बसगाड्यात अपंगांकरिता जागा निश्चित केल्या आहेत. प्रवासादरम्यान त्यांना त्रास होऊ नये यासाठी जागा राखीव केली आहे. मात्र या जागेवर प्रवाशांकडून जागा बळकावण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान अपंग व्यक्तींना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. उन्हाळ्याच्या दिवसात बसमध्ये गर्दी असते. अशात महिला व अपंगांना उभे राहूनच प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पहायला मिळते. ‘केवळ महिलांसाठी, अपंगांसाठी राखीव’ लिहिलेल्या आसनावर त्यांना बसविण्याचे सौजन्य वाहकाकडून दाखविले जात नाही. यामुळे आरक्षणाचा हेतू साध्य होताना दिसत नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये आमदार, खासदार, अपंग, महिला, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. सीटच्या मागे व खिडकीजवळ सदर जागा राखीव असल्याची सूचना लिहीलेली असते. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वाहकांची असते. परंतु त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. बसस्थानकावर बस येताच खिडकीतून जागेवर रूमाल, बॅग अशा वस्तू टाकून जागा आरक्षित केली जाते. मात्र अपंग व्यक्तींना हे शक्य होत नाही. परिणामी, बसमध्ये चढल्यानंतर गर्दीमुळे अपंगांना उभे राहुन प्रवास करावा लागतो. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. या नियमांच्या अंमलबजावणीकरिता वाहकांना सूचना देऊन प्रवाशांना सहकार्य करण्याची मागणी अपंग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.