शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षण व सल्ला केंद्राला अवकळा

By admin | Updated: August 26, 2014 23:32 IST

कृषीप्रधान देशाचा कर्णधार असलेल्या बळीराजासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने विविध उपाययोजना राबवून त्यांच्या आर्थिक बळकटीसाठी प्रयत्न केले. परंतु या योजनांचा लाभ देण्यासाठी शासन

यशवंत मानकर - आमगावकृषीप्रधान देशाचा कर्णधार असलेल्या बळीराजासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने विविध उपाययोजना राबवून त्यांच्या आर्थिक बळकटीसाठी प्रयत्न केले. परंतु या योजनांचा लाभ देण्यासाठी शासन निधीअभावी मागे पडले. कृषी क्षेत्रात संशोधनात्मक बदल घडून अधिक लाभ पोहचविण्यासाठी कृषी विभागाची महत्वाकांक्षा मात्र आज बदलत चालली आहे. त्यामुळे बळीराजावर वाऱ्यवर जीवन जगण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शासन स्तरावर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पीक उत्पादनाची वाढ व मिळणाऱ्या उत्पादनांवर त्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचे धोरण अवलंबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ व विकसनशील शेतीकरिता शासनाने कृषी विकास विभागाला अधिक महत्व दिले. तसेच शेतकऱ्यांना अधिक उत्पादीत पीके घेता यावी यासाठी शेती संशोधनाची क्रांतीकारक पावले उचलण्यात आले. यासाठी शासनाने संशोधनासाठी प्रत्येक तालुकास्तरावर संशोधनाची साधने उपलब्ध करून देण्यात आली. तर अनेक ठिकाणी संशोधन कार्य यशस्वीपणे चालविण्यासाठी शासनस्तरावर शेतकऱ्यांकडूनच मोबदला देऊन जमीण उपलब्ध करण्यात आली.गोंदिया जिल्ह्यात शासनाने शेतकऱ्यांना कृषी विभाग अंतर्गत योजनांचा लाभ मिळावा यासाठी संशोधन कार्यालय प्रारंभ केले. पंजाबराव कृषी विद्यापीठ संशोधन विभागाला आमगाव येथे कृषी जमीन उपलब्ध करून देण्यात आले. कृषी विभाग राज्य शासनाने कृषी संशोधनासाठी १८ एकर जमीन हस्तांतरीत केली. प्रारंभी या ठिकाणी विभागाने राज्यशासनाच्या विविध योजनांना कार्यान्वित करून शेतपिकांची अनेक संशोधने यशस्वीपणे केली. संशोधन कार्याने शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला. कृषी संशोधनाने पिकांचे उत्पादन क्षमता वाढ करून शेतकऱ्यांना नवी दिशा दिली. परंतु कालांतराने या कृषी संशोधन कार्यावर काम करणारे विभाग प्रशासनाने वाऱ्यावर सोडले. संशोधन कार्यात असलेल्या विभागाला आर्थिक अडचण पुढे आली. कर्मचाऱ्यांना या संशोधन कार्यात स्वत:चा पगार खर्ची घालावा लागला. परंतु विभागाने बळीराजाला संशोधनातून दिलेली संजीवनीचा ध्यास लक्षात न घेता या विभागावरील खर्च व कर्मचाऱ्यांची कपात सुरूच ठेवली. त्यामुळे विभागाला अखेरची घरघर लागली आहे. विभागाकडे जमीन, सयंत्र उपलब्ध असून सुध्दा आर्थिक अडचणीपुढे हा विभाग विकासाच्या पलीकडे पाऊल न घालता अधोगतीला लागला आहे. त्यामुळे या विभागाची व्यथा शासनस्तरावर फाईल बंद असल्याची जाणीव पुढे येत आहे.