शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दिवाळीनंतर सुरू होणार ‘ट्राफिक सिग्नल’

By admin | Updated: October 21, 2014 22:54 IST

गोंदियातील अनियंत्रित वाहतूक, अरूंद रस्ते व वाहनांची वर्दळ यामुळे वाहतूक व्यवस्थेत बिघाड झाला आहे. कुणी कोणत्याही ठिकाणातून वाहन टाकून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतात.

गोंदिया : गोंदियातील अनियंत्रित वाहतूक, अरूंद रस्ते व वाहनांची वर्दळ यामुळे वाहतूक व्यवस्थेत बिघाड झाला आहे. कुणी कोणत्याही ठिकाणातून वाहन टाकून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अपघातही घडतात. या अस्ताव्यस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी गोंदिया शहरातील पाच चौकांमध्ये ट्राफिक सिग्नल बसविण्यात आले आहे. त्यांची चाचणी घेतली जात असून हे ट्राफीक सिग्नल दिवाळीनंतर सुरू होणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली आहे.या ट्राफीक सिग्नलसाठी ४२ लाख ४७ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. ही रक्कम केंद्र शासनाच्या नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत देण्यात आली आहे. गोंदिया शहरातील अरूंद रस्त्यामुळे रहदारीस नेहमी अडथळा निर्माण होतो. अडथळा निर्माण झाल्यास नागरिक आपल्या चुकीचे खापर पोलिसांच्या डोक्यावर फोडतात. नगर परिषदेचे दुर्लक्ष व शहरातील गल्यावर व्यापाऱ्यांचे वाढते अतिक्रमण या बाबीला लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा नेहमीच काम करीत असते. मात्र वाहतुकीची कोंडी झाल्यास प्रत्येक माणूस या कोंडीची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे, अशी ओरड करतात. गोंदिया शहरातील वाहतुकीची समस्या ‘जैसे थे’ आहे. गोंदिया शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक पोलीस असतात. परंतु नियम तोडणाऱ्या वाहन चालकांना वाहतुक पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला तर ते वाहन न थांबविता पळून जातात. गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक, आंबेडकर चौक, नेहरू चौक, शक्ती चौक आणि विशाल मेगा मार्ट चौक या ठिकाणी ट्राफिक सिग्नल बसविण्यात आले आहेत. शहरात सध्या सिग्नल नसल्यामुळे कोणताही वाहन चालक कुठूनही घुसतो. यामुळे वाहतुकीचा बोजवारा नेहमीच उडाल्याचे लक्षात येते. या ट्राफिक सिग्नलसाठी वाहतुक पोलिसांनी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून विद्युत कनेक्शन घेतले आहे. या कामाचे कंत्राट नागपूर येथील डेकोफर्ण कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले होते. या सिग्नलची चाचणी वाहतूक विभागाने घेणे सुरू केले आहे. जयस्तंभ चौकातील सिग्नलचे ट्रायल आठवडाभरापूर्वी व नेहरू चौकातील सिग्नलचे ट्रायल चार दिवसापूर्वी करण्यात आले आहे. दिवाळीनंतर हे सिग्नल वाहतुक विभाग सुरू करणार आहे. (तालुका प्रतिनिधी)