शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

तिरोड्याचा कृषी विभाग रिक्त पदांमुळे पांगळा

By admin | Updated: March 31, 2015 01:30 IST

शासनाचा सर्वाधिक भर शेतकरी व शेती विकासाकडे असल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांच्या विकासाकरीता जलयुक्त

सहसंचालकांचे दुर्लक्ष : ११ पदे रिक्त, दीड वर्षापासून दोन्ही मंडळ प्रभारावरतिरोडा : शासनाचा सर्वाधिक भर शेतकरी व शेती विकासाकडे असल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांच्या विकासाकरीता जलयुक्त शिवार अभियानासारख्या योजना नव्याने सुरु केल्या आहेत. मात्र योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास कसा होईल, असा प्रश्न उपस्थित आहे.तिरोडा तालुका कृषी विभागांतर्गत ७ पदे आधीपासूनच रिक्त आहेत. तालुका कृषी कार्यालयांतर्गत दोन मंडळ कृषी कार्यालय मुंडीकोटा आणि तिरोडा आहेत. कृषी सहायकाचे एकूण पदे २४, सुपरवायजर (पर्यवेक्षक) ५ आणि कार्यालय कृषी सहायक १ आणि अन्य कार्यालयीन कर्मचारी वर्ग आहेत. मात्र गेल्या दोन वर्षापासून तिरोडा तालुका कृषी विभागाकडे कृषी सहसंचालकाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.दीड-दोन वर्षात मुंडीकोटा आणि तिरोडा मधील दोन्ही मंडळ कृषी अधिकारी, सेवानिवृत्त झालेले आहेत. तेव्हापासून दोन वर्ष लोटून सुद्धा मंडळ कृषी अधिकाऱ्यांची व्यवस्था तिरोउज्ञ येथे कृषी सहसंचालकानी केलेली नाही. आज ही दोन्ही मंडळ प्रभारावर चालत आहेत. तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकाऱ्यांचे पद गेल्या दोन वर्षापासून रिक्त पडून आहे. गेल्या सहा महिन्यापासून अर्जुनी, परसवाडज्ञ सहित तीन कार्यक्षेत्र कृषी सहायक विणा प्रभारावर चालत आहेत. एका सहायकाकडे तीन ते ५ गावे असताना दुसऱ्या सहायकाचे पुन्हा ५ गावे प्रभारावर दिल्याने त्या सहायकाची कोणती अवस्था होत असेल आणि ते सहायक शेतकऱ्यांना किती सेवा देत असतील याचा मंथन खुद कृषी विभागाच्या आळा अफसरांनी करायला पाहिजे.पुर्वीचेच सात पदे रिक्त असताना २०१४ मध्ये सहा कृषी सहायकाचे स्थानांतरण करण्यात आले. नव्याने एकही कृषी सहायक पाठविले नसल्याने तिरोडा कृषी विभागाने त्या स्थानांतरीत कृषी सहायकांना सोडले नव्हते. मात्र नागपूर विभागाने सहसंचालकांना स्थानांतरीत कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिल्याने २८ फेब्रुवारीला सहा कृषी सहायकांना तिरोडा तालुका कृषी विभागातून कार्यमुक्त केले आहे. कार्यमुक्त केलेल्या सहायकामध्ये तीन महिला सहायकांचा समावेश आहे. तिरोडा तालुका कृषी विभागात कृषी सहायकांची ९ पदे रिक्त झाली आहेत. तालुका कृषी अधिकाऱ्यांची दोन पदे अशी एकूण १२ पदे रिक्त असून तालुका कृषी विभाग एक प्रकारचा अपंग झाला आहे. (प्रतिनिधी)आधीच कमतरता, त्यात स्थानांतरजलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी करण्याकरीता कृषी विभागात कर्मचाऱ्यांची नितांत गरज आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांना स्थानांतरीत करुन विकासात्मक कामात एक प्रकारचा अडथळा निर्माण करण्यात आला आहे. कृषी विभागाकडे जलशिवाराव्यतिरिक्त असणारे अन्य उपक्रम पूर्ण करण्याकरीता कर्मचाऱ्यांची कमतरता भासणार आहे. कृषी सहसंचालकांशी ज्या पद्धतीने स्थानांतरित करण्याचे आदेश निर्गमित केले, त्यानुसार त्या जागा भरण्याची काळजी तातडीने घेणे गरजेचे आहे. कामाचा व्याप अधिक असला तरी सहकार्याच्या भावनेने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने आतापर्यंत स्थानांतरित कर्मचाऱ्यांना थांबविण्यात आले होते. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्ययुक्त करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची जबाबदारी आपली नसून विभागाची आहे.- पी.व्ही. पोटदुखेतालुका कृषी अधिकारी, तिरोडा.