शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
4
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
7
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
8
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
9
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
10
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
11
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
12
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
13
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
14
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
15
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
16
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
17
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
18
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
19
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
20
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे

तिरोड्याचा कृषी विभाग रिक्त पदांमुळे पांगळा

By admin | Updated: March 31, 2015 01:30 IST

शासनाचा सर्वाधिक भर शेतकरी व शेती विकासाकडे असल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांच्या विकासाकरीता जलयुक्त

सहसंचालकांचे दुर्लक्ष : ११ पदे रिक्त, दीड वर्षापासून दोन्ही मंडळ प्रभारावरतिरोडा : शासनाचा सर्वाधिक भर शेतकरी व शेती विकासाकडे असल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांच्या विकासाकरीता जलयुक्त शिवार अभियानासारख्या योजना नव्याने सुरु केल्या आहेत. मात्र योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास कसा होईल, असा प्रश्न उपस्थित आहे.तिरोडा तालुका कृषी विभागांतर्गत ७ पदे आधीपासूनच रिक्त आहेत. तालुका कृषी कार्यालयांतर्गत दोन मंडळ कृषी कार्यालय मुंडीकोटा आणि तिरोडा आहेत. कृषी सहायकाचे एकूण पदे २४, सुपरवायजर (पर्यवेक्षक) ५ आणि कार्यालय कृषी सहायक १ आणि अन्य कार्यालयीन कर्मचारी वर्ग आहेत. मात्र गेल्या दोन वर्षापासून तिरोडा तालुका कृषी विभागाकडे कृषी सहसंचालकाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.दीड-दोन वर्षात मुंडीकोटा आणि तिरोडा मधील दोन्ही मंडळ कृषी अधिकारी, सेवानिवृत्त झालेले आहेत. तेव्हापासून दोन वर्ष लोटून सुद्धा मंडळ कृषी अधिकाऱ्यांची व्यवस्था तिरोउज्ञ येथे कृषी सहसंचालकानी केलेली नाही. आज ही दोन्ही मंडळ प्रभारावर चालत आहेत. तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकाऱ्यांचे पद गेल्या दोन वर्षापासून रिक्त पडून आहे. गेल्या सहा महिन्यापासून अर्जुनी, परसवाडज्ञ सहित तीन कार्यक्षेत्र कृषी सहायक विणा प्रभारावर चालत आहेत. एका सहायकाकडे तीन ते ५ गावे असताना दुसऱ्या सहायकाचे पुन्हा ५ गावे प्रभारावर दिल्याने त्या सहायकाची कोणती अवस्था होत असेल आणि ते सहायक शेतकऱ्यांना किती सेवा देत असतील याचा मंथन खुद कृषी विभागाच्या आळा अफसरांनी करायला पाहिजे.पुर्वीचेच सात पदे रिक्त असताना २०१४ मध्ये सहा कृषी सहायकाचे स्थानांतरण करण्यात आले. नव्याने एकही कृषी सहायक पाठविले नसल्याने तिरोडा कृषी विभागाने त्या स्थानांतरीत कृषी सहायकांना सोडले नव्हते. मात्र नागपूर विभागाने सहसंचालकांना स्थानांतरीत कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिल्याने २८ फेब्रुवारीला सहा कृषी सहायकांना तिरोडा तालुका कृषी विभागातून कार्यमुक्त केले आहे. कार्यमुक्त केलेल्या सहायकामध्ये तीन महिला सहायकांचा समावेश आहे. तिरोडा तालुका कृषी विभागात कृषी सहायकांची ९ पदे रिक्त झाली आहेत. तालुका कृषी अधिकाऱ्यांची दोन पदे अशी एकूण १२ पदे रिक्त असून तालुका कृषी विभाग एक प्रकारचा अपंग झाला आहे. (प्रतिनिधी)आधीच कमतरता, त्यात स्थानांतरजलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी करण्याकरीता कृषी विभागात कर्मचाऱ्यांची नितांत गरज आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांना स्थानांतरीत करुन विकासात्मक कामात एक प्रकारचा अडथळा निर्माण करण्यात आला आहे. कृषी विभागाकडे जलशिवाराव्यतिरिक्त असणारे अन्य उपक्रम पूर्ण करण्याकरीता कर्मचाऱ्यांची कमतरता भासणार आहे. कृषी सहसंचालकांशी ज्या पद्धतीने स्थानांतरित करण्याचे आदेश निर्गमित केले, त्यानुसार त्या जागा भरण्याची काळजी तातडीने घेणे गरजेचे आहे. कामाचा व्याप अधिक असला तरी सहकार्याच्या भावनेने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने आतापर्यंत स्थानांतरित कर्मचाऱ्यांना थांबविण्यात आले होते. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्ययुक्त करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची जबाबदारी आपली नसून विभागाची आहे.- पी.व्ही. पोटदुखेतालुका कृषी अधिकारी, तिरोडा.