शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

तिरोड्याचा कृषी विभाग रिक्त पदांमुळे पांगळा

By admin | Updated: March 31, 2015 01:30 IST

शासनाचा सर्वाधिक भर शेतकरी व शेती विकासाकडे असल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांच्या विकासाकरीता जलयुक्त

सहसंचालकांचे दुर्लक्ष : ११ पदे रिक्त, दीड वर्षापासून दोन्ही मंडळ प्रभारावरतिरोडा : शासनाचा सर्वाधिक भर शेतकरी व शेती विकासाकडे असल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांच्या विकासाकरीता जलयुक्त शिवार अभियानासारख्या योजना नव्याने सुरु केल्या आहेत. मात्र योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास कसा होईल, असा प्रश्न उपस्थित आहे.तिरोडा तालुका कृषी विभागांतर्गत ७ पदे आधीपासूनच रिक्त आहेत. तालुका कृषी कार्यालयांतर्गत दोन मंडळ कृषी कार्यालय मुंडीकोटा आणि तिरोडा आहेत. कृषी सहायकाचे एकूण पदे २४, सुपरवायजर (पर्यवेक्षक) ५ आणि कार्यालय कृषी सहायक १ आणि अन्य कार्यालयीन कर्मचारी वर्ग आहेत. मात्र गेल्या दोन वर्षापासून तिरोडा तालुका कृषी विभागाकडे कृषी सहसंचालकाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.दीड-दोन वर्षात मुंडीकोटा आणि तिरोडा मधील दोन्ही मंडळ कृषी अधिकारी, सेवानिवृत्त झालेले आहेत. तेव्हापासून दोन वर्ष लोटून सुद्धा मंडळ कृषी अधिकाऱ्यांची व्यवस्था तिरोउज्ञ येथे कृषी सहसंचालकानी केलेली नाही. आज ही दोन्ही मंडळ प्रभारावर चालत आहेत. तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकाऱ्यांचे पद गेल्या दोन वर्षापासून रिक्त पडून आहे. गेल्या सहा महिन्यापासून अर्जुनी, परसवाडज्ञ सहित तीन कार्यक्षेत्र कृषी सहायक विणा प्रभारावर चालत आहेत. एका सहायकाकडे तीन ते ५ गावे असताना दुसऱ्या सहायकाचे पुन्हा ५ गावे प्रभारावर दिल्याने त्या सहायकाची कोणती अवस्था होत असेल आणि ते सहायक शेतकऱ्यांना किती सेवा देत असतील याचा मंथन खुद कृषी विभागाच्या आळा अफसरांनी करायला पाहिजे.पुर्वीचेच सात पदे रिक्त असताना २०१४ मध्ये सहा कृषी सहायकाचे स्थानांतरण करण्यात आले. नव्याने एकही कृषी सहायक पाठविले नसल्याने तिरोडा कृषी विभागाने त्या स्थानांतरीत कृषी सहायकांना सोडले नव्हते. मात्र नागपूर विभागाने सहसंचालकांना स्थानांतरीत कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिल्याने २८ फेब्रुवारीला सहा कृषी सहायकांना तिरोडा तालुका कृषी विभागातून कार्यमुक्त केले आहे. कार्यमुक्त केलेल्या सहायकामध्ये तीन महिला सहायकांचा समावेश आहे. तिरोडा तालुका कृषी विभागात कृषी सहायकांची ९ पदे रिक्त झाली आहेत. तालुका कृषी अधिकाऱ्यांची दोन पदे अशी एकूण १२ पदे रिक्त असून तालुका कृषी विभाग एक प्रकारचा अपंग झाला आहे. (प्रतिनिधी)आधीच कमतरता, त्यात स्थानांतरजलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी करण्याकरीता कृषी विभागात कर्मचाऱ्यांची नितांत गरज आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांना स्थानांतरीत करुन विकासात्मक कामात एक प्रकारचा अडथळा निर्माण करण्यात आला आहे. कृषी विभागाकडे जलशिवाराव्यतिरिक्त असणारे अन्य उपक्रम पूर्ण करण्याकरीता कर्मचाऱ्यांची कमतरता भासणार आहे. कृषी सहसंचालकांशी ज्या पद्धतीने स्थानांतरित करण्याचे आदेश निर्गमित केले, त्यानुसार त्या जागा भरण्याची काळजी तातडीने घेणे गरजेचे आहे. कामाचा व्याप अधिक असला तरी सहकार्याच्या भावनेने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने आतापर्यंत स्थानांतरित कर्मचाऱ्यांना थांबविण्यात आले होते. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्ययुक्त करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची जबाबदारी आपली नसून विभागाची आहे.- पी.व्ही. पोटदुखेतालुका कृषी अधिकारी, तिरोडा.