शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘नरेगा’तून होणार ३९ हजार वाढीव कुटुंबांसाठी शौचालये

By admin | Updated: December 29, 2016 01:08 IST

गोंदिया जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी भारत स्वच्छ अभियानामार्फत काम जरी सुरू असले तरी

दंडात्मक कारवाई नाही : हागणदारीमुक्तीसाठी अधिकाऱ्यांची तळमळ गोंदिया : गोंदिया जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी भारत स्वच्छ अभियानामार्फत काम जरी सुरू असले तरी शासनाच्या ‘पुढे पाठ, मागे सपाट’ या भूमीकेमुळे जिल्हा हागणदारीमुक्त होऊ शकला नाही. निर्मल ग्राम योजनेतील भ्रष्टाचार जिल्ह्याला हागणदारीमुक्त करण्यास अडसर होत आहे. जिल्ह्यातील ३९ हजार ४५७ वाढीव कुटुंबांना आता नरेगातून शौचालय तयार करून दिले जाणार आहेत. घराघरात शौचालय तयार व्हावे, कुणी उघड्यावर शौचास बसू नये यासाठी शासनाने सुरूवातीला शौचालय बांधणाऱ्यांना १२०० रूपये अनुदान दिले. निर्मलग्राम होणाऱ्या ग्राम पंचायतींना दोन लाखाचे पुरस्कार देण्यात आले. महाराष्ट्रातून निर्मल जिल्हा म्हणून गोंदियाचे नाव पुढे आले होते. परंतु वास्तविक पाहता जिल्ह्यात बहुतांश शौचालय कागदावरच तयार होते. गावातील लाभार्थ्यांचे नाव कागदावर दाखवून सरपंच व सचिवांनी अनेकांच्या शौचालयाचा पैसा आपल्या घश्यात टाकला. शौचालयासाठी नागरिकांना १२०० रूपये न देता तत्कालीन बहुतांश सरपंच व सचिवांनी लाखो रुपयांचा घोटाळा केला. ज्यांच्या नावाने पैश्याची उचल करण्यात आली त्यांना लाभ दिलाच नाही. परंतु केंद्र शासन त्यांना शौचालयाचा लाभ दिला म्हणून आता शौचालयाचा लाभ देत नाही आणि उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना कारवाईचा धसका देते. त्यामुळे या गरिबांकडे शौचालय बांधण्यासाठी पैसा नाही. त्यांच्या नावाने काढलेला पैसा खाणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या गरिबांना उघड्यावर शौचास जाण्याची पाळी आली आहे. परंतु शासन या परिस्थितीला समजून न घेता पुन्हा लाभ मिळणार नाही असे म्हणत असल्यामुळे घरीबांच्या घरात शौचालय होणार नाही ही परिस्थीती कायम राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी) दंडाची तरतूद नावाचीच ग्राम पंचायतच्या हद्दीत सार्वजनिक, शासकीय, खासगी जागेवर कुणी व्यक्ती शौचविधी करीत असेल तर त्याच्यावर ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम १७७ मधील पोटकलम ३ ब अन्वये १२०० रूपये दंड, ही दंडात्मक रक्कम कलम १२९ अन्वये वसूल करून पुढील कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे जि.प. प्रशासनाकडून सांगितले जाते. तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५९ चे कलम ११५ व ११७ अन्वये १२०० रूपये दंड अथवा ६ महिन्याची शिक्षा करण्याची तरतूद आहे. मात्र आतापर्यंत कोणावरच दंडात्मक किंवा इतर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळे लोक त्याकडे गांभिर्याने पाहात नाही.