शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

वनरक्षक व वनपालांचा आजपासून बेमुदत संप

By admin | Updated: August 24, 2014 23:34 IST

राज्यातील वनरक्षक व वनपाल यांच्या वनमंत्रालयाने मान्य केलेल्या विविध मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्याकरिता राज्यातील समस्त वनरक्षक व वनपाल

नवेगावबांध : राज्यातील वनरक्षक व वनपाल यांच्या वनमंत्रालयाने मान्य केलेल्या विविध मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्याकरिता राज्यातील समस्त वनरक्षक व वनपाल २५ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जात आहेत. संघटनेच्या वतीने तशी नोटीसही शासनाला देण्यात आलेली आहे.वनरक्षकाला २४०० रुपये तर वनपालाला ३५०० रुपये ग्रेडपे देण्यात यावा, वनरक्षकास तलाठी पदाप्रमाणे व वनपाल पदास मंडळ अधिकारी पदाप्रमाणे वेतनश्रेणी द्यावी, एका वनरक्षकाकडे सरासरी ६९ चौ.कि.मी. क्षेत्र तर एका वनपालाकडे २५५ चौ.कि.मी. क्षेत्र फिरतीला आहे. यासाठी निश्चित प्रवास भत्ता देण्यात यावा, नियमानुसार राज्यसीमा तपासणी नाक्यावर शासकीय रक्कम वसुल करने व वाहतूक पास देण्यासाठी वनपालाची आवश्यकता असून वनपालांची नियुक्ती करण्यात यावी, पोलीस दलात कार्यरत कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या सवलती वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील लागू कराव्या, आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ एस.एस.सी. नापास वनरक्षक व वनपालांना मिळावा, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचा २८ मार्च २०१३ चे पत्रानुसार नव्याने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मंजूरी देण्यात यावी, वनपाल व वनरक्षकास कामाचे आठ तास निश्चीत करावे. वरीलपैकी बहुतेक मागण्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना वनविभागाने मान्य करण्याचे कबूल केले. परंतु शासनाने अजूनपर्यंत कारवाई केलेली नाही. आता २७ आॅगस्ट २०१४ रोजी मंत्रीमंडळाची बैठक असल्याकारणाने संघटनेने संपाचे हत्यार उपसले आहे. संघटनेच्या वतीने बेमुदत संपाची नोटीस राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे. शासन याबाबत कोणता निर्णय घेते याकडे वनरक्षक व वनपालांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)