शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

५५६ ग्रामपंचायतीत आज स्वच्छतेची शपथ

By admin | Updated: October 1, 2014 23:24 IST

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारपासून (दि.२) ‘स्वच्छ भारत मिशन’ या अभियानाला सुरुवात करण्यात येत आहे. त्यानिमित्त जिल्हा परिषद, पंचायत समितीसह जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायत कार्यालयात

गोंदिया : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारपासून (दि.२) ‘स्वच्छ भारत मिशन’ या अभियानाला सुरुवात करण्यात येत आहे. त्यानिमित्त जिल्हा परिषद, पंचायत समितीसह जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायत कार्यालयात स्वच्छतेची शपथ घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेतील २३ विभागातील एकूण ३३९ कर्मचारी शपथ घेतल्यानंतर प्रत्यक्षात श्रमदान करुन कार्यालय व परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबविणार असल्याची माहिती देवून स्वच्छता अभियानाला जनआंदोलन बनविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे यांनी केले आहे.केंद्र व राज्य शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निर्देशप्रमाणे ‘मिशन स्वच्छ भारत’ कार्यक्रम सुरू होत आहे. २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण देशाला निर्मल करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे गांभिर्य गावस्तरापासून राज्यस्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी २५ सप्टेंबर ते २३ आॅक्टोबर २०१४ पर्यंत राष्ट्रीय स्वच्छता अभियान देखील राबविण्याचे निर्देश आहेत. ग्रामीण भागात आजही स्वच्छतेच्या पुरेशा सोयी नाहीत. बहुतेक व्यक्ती हे उघड्यावरच शौचास जातात. परिणामी विष्ठेतील विषाणू, जीवाणू , परजीवी जंतूमुळे पोलिओ, अतिसार, कॉलरा, हगवन, विषमज्वर असे विविध आजार जडतात. केवळ व्यक्तीक स्वच्छता पाळल्यास आपणव स्वत:सह अनेक व्यक्तींचा या आजारापासून बचाव करू शकतो. शौचालय बांधणे, त्याचा वापर करणे, स्वयंपाकापूर्वी, जेवणापूर्वी शौचाहून आल्यानंतर, बाळाची शी धुतल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुणे, पिण्याचे पाणी उंचावर ठेवून ते घेण्यासाठी ओगराळ्याचा वापर करणे, अन्न सुरक्षित झाकून ठेवणे या स्वच्छतेच्या बाबी अतिशय छोट्या आहेत. मात्र, त्याचा आपल्या वैयक्तीक आयुष्यात अंगिकार केल्यास त्यामुळे आपण आपले घरच नव्हे तर परिसर आणि पर्यायाने आपला गाव स्वच्छ ठेवू शकतो. अनेक कार्यालयात तंबाखू, गुटखा, पान खावून भिंतीवर थुंकले जाते. ही सवय अतिश्य वाईट आहे. आपण आपल्या घरी असा प्रकार करीत नाही. आपले कार्यालय, आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक व्यक्तीचे आद्य कर्तव्य असून स्वच्छता राखून आपण एकप्रकारे देश्सेवाच करीत आहोत. याचे भान प्रत्येक व्यक्तीने ठेवावयास पाहिजे. जिल्हा परिषदेत स्वच्छता राखण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. सर्व कर्मचारी उद्या (दि.२) सकाळी साडे सात वाजता कार्यालयात उपस्थित राहून स्वच्छतेची शपथ घेतली. त्यानंतर परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान करतील. हआच उपक्रम जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती तथा ग्रामपंचायतीत सुद्धा राबविण्यात येणार आहे. ग्रामसभेत अशी शपथ घेण्याचे निर्देश देण्यात आले असून नागरिकांनी सुद्धा या उपक्रमात व्हावे, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)