शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

तिरोडा तालुक्यात २० गावांत डासनाशक फवारणी सुरू

By admin | Updated: November 27, 2014 23:37 IST

जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांच्या वतीने तिरोडा तालुक्यातील १३९ गावांपैकी केवळ २० गावांत डासनाशक फवारणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. इतर गावातही अशी फवारणी करण्यात यावी,

काचेवानी : जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांच्या वतीने तिरोडा तालुक्यातील १३९ गावांपैकी केवळ २० गावांत डासनाशक फवारणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. इतर गावातही अशी फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. जिल्हा हिवताप विभागाने सदर मोहीम १४ जून २०१४ पासून सुरू केली असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात ७२ मजूर कार्यरत असून १२ तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. तिरोडा तालुक्यात तीन गट कार्यरत आहेत. यातील एस.आर. मानकर, दिलीप इंदुरकर आणि ए.बी. मानकर हे तीन गटप्रमुख असून प्रत्येक गटात सहा मजूर कार्यरत आहेत. तालुक्यातील सुकडी, चिखली, डोंगरगाव, काचेवानी, विहीरगाव, मारेगाव, कोडेलोहारा, मंगेझरी, कोडेबर्रा, गोविंदपूर आणि बोदलकसा अशा २० गावांत फवारणीचे कार्य होत आहे. परंतु तालुक्यात एकूण १३९ गावे असून केवळ २० गावांत फवारणी करणे म्हणजे ठिठोल्या करण्याचे प्रकार असल्याचे दिसत आहे.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सलीम पाटील यांनी सांगितले की, फवारणीसाठी गावांची निवड पुणेवरून होत असते. ज्या गावांत डासांचे प्रमाण अधिक दिसून येथे किंवा डासांच्या प्रभावातून प्रकरणे आढळतात अशा गावांत फवारणी करण्याचे ठरविले जाते व त्यासाठी मंजुरी पुणेवरून येते.केवळ तिरोडा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच डासांचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. त्यामुळे डास प्रतिबंधक फवारणी लहान-मोठ्या सर्वच गावात होणे गरजेचे आहे. तिरोड्याचे आ. विजय रहांगडाले यांचे गृहगाव खमारी आणि माजी आ. दिलीप बंसोड यांचे गृहगाव ठाणेगाव सुद्धा वगळण्यात आले आहेत. या व्यतिरीक्त बेरडीपार, निमगाव, इंदोरा, बरबसपुरा, जमुनिया, मेंदीपूर, अर्जुनी, परसवाडा, मुंडीकोटा, वडेगाव सहित महत्वाची ५० पेक्षा अधिक गावे सोडण्यात आली आहेत. २० गावांत फवारणी सुरू असताना आपल्याही गावात फवारणी होणार याची नागरिक वाट बघत आहेत. मात्र २० गावाव्यतिरीक्त अन्य गावांत फवारणी होवू शकत नाही. परंतु अन्य गावात फवारणी झाली नसल्याने व तेथे रुग्ण आढळल्यास हिवताप अधिकाऱ्यांना गंभीर स्वरूपाचा सामना करावा लागेल, नागरिक बोलून दाखवित आहेत. सध्या फवारणीचे काम काचेवानी ग्रा.पं. मध्ये सुरू आहे. एस.आर. मानकर यांच्या चमूमध्ये देवरीचे एन.एम. शेंदरे, हिरापूरचे पी.एम. मेश्राम, मानेगावचे एम.एम. पटले, टी.एन. भोयर आणि बी.एस. प्रधान आदी मजूर कार्यरत आहेत. यांची भेट घेतली असता हे कार्यक्रम जून महिन्यापासून सुरू असून तालुक्यात ठराविक गावे असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रम ६ डिसेंबरपर्यंत असल्याचे सांगितले. मात्र अधिकाऱ्यांनी काम दिल्यास आपण करणार, असे ते बोलले. या कामात अडचणींबात विचारले असता, थंडीच्या वेळी राहण्याची गैरसोय होत आहे. कार्यरत मजूर रोजंदारीवर असून एका दिवशी ५०० लोकसंख्या असलेल्या घरांमध्ये फवारणी ठरवून दिल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)