शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 13:05 IST

कर्जमाफीच्या घोषणेला वर्ष लोटले तरी अद्यापही यातील घोळ संपलेला नाही. कर्जमाफीची दहावी ग्रीन यादी न आल्याने जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी संकटात आले असून त्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे२५ हजार शेतकरी संकटात

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कर्जमाफीच्या घोषणेला वर्ष लोटले तरी अद्यापही यातील घोळ संपलेला नाही. कर्जमाफीची दहावी ग्रीन यादी न आल्याने जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी संकटात आले असून त्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली.कर्जमाफीस जिल्ह्यातील ८७ हजार शेतकरी प्राप्त ठरले होते. यापैकी जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकानी ६२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफाची १४५ कोटी रुपयांची रक्कम जमा केली. याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि घोळ निर्माण झाल्यानंतर शासनाने त्यांची पडताळणीे करण्यासाठी ग्रीन, येलो, रेड असे विभाजन केले. ग्रीन यादीत समावेश असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाते. जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाना जून महिन्यापर्यंत ९ ग्रीन याद्या प्राप्त झाल्या. यातील ६२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली. मात्र मागील दोन महिन्यांपासून उर्वरित २५ हजार शेतकऱ्यांचा समावेश असलेली दहावी ग्रीन यादी महाआॅनलाईकडून अद्यापही बँका आणि निबंधक कार्यालयाला प्राप्त झाली नाही.

जुने माफ होईना अन नवीन मिळेनाकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनातर्फे रक्कम भरुन त्यांचे खाते शून्य केले जाणार आहे. खाते शून्य झाल्यानंतर शेतकऱ्यांना नवीन पिक कर्जाची उचल करता येणार आहे. मात्र खरीप हंगाम अर्धा संपत येत असताना खाते शून्य झाल्याने नवीन पिक कर्ज मिळण्याची अडचण झाली. तर शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम भरल्यास त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. जुने कर्जमाफ होत नसल्याने नवीन पिक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

सावकारांनी वाढविलेला व्याजदरऐन खरीप हंगामात कर्जमाफीच्या किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांना उधार उसनवारी करुन हंगाम पूर्ण करावा लागत आहे. यामुळे बरेच शेतकरी सावकारांकडे जात असून ते याचा फायदा घेत १० ते १२ टक्के व्याजाने पैसे देत असल्याची माहिती आहे.

याद्या लांबविण्याचे कारण कायकर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जून महिन्यापर्यंत नियमित आल्या. मात्र त्यानंतर मोठे अंतर पडले आहे. याद्या लांबविण्यामागे राजकीय हेतू असल्याची चर्चा आहे. बँकाचे अधिकारी यावर अधिक बोलण्यास तयार नाही. त्यामुळे याद्या लांबविण्याचे नेमके कारण गुलदस्त्यात आहे.

महाआॅनलाईनकडून बँकाना अद्यापही दहावी ग्रीन यादी प्राप्त झाली नाही. त्यामुळे जवळपास २५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. याद्या प्राप्त होताच रक्कम जमा केली जाईल.- सुरेश टेटे, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा बँक गोंदिया.कर्जमाफीची दहावी ग्रीन यादी अद्यापही आली नाही. काही तांत्रिक अडचणीमुळे याद्यांना विलंब होत असल्याची माहिती आहे.अनिल गोस्वामीे, प्रभारी उपनिबंधक गोंदिया.

टॅग्स :Farmerशेतकरी