शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 13:05 IST

कर्जमाफीच्या घोषणेला वर्ष लोटले तरी अद्यापही यातील घोळ संपलेला नाही. कर्जमाफीची दहावी ग्रीन यादी न आल्याने जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी संकटात आले असून त्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे२५ हजार शेतकरी संकटात

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कर्जमाफीच्या घोषणेला वर्ष लोटले तरी अद्यापही यातील घोळ संपलेला नाही. कर्जमाफीची दहावी ग्रीन यादी न आल्याने जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी संकटात आले असून त्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली.कर्जमाफीस जिल्ह्यातील ८७ हजार शेतकरी प्राप्त ठरले होते. यापैकी जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकानी ६२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफाची १४५ कोटी रुपयांची रक्कम जमा केली. याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि घोळ निर्माण झाल्यानंतर शासनाने त्यांची पडताळणीे करण्यासाठी ग्रीन, येलो, रेड असे विभाजन केले. ग्रीन यादीत समावेश असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाते. जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाना जून महिन्यापर्यंत ९ ग्रीन याद्या प्राप्त झाल्या. यातील ६२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली. मात्र मागील दोन महिन्यांपासून उर्वरित २५ हजार शेतकऱ्यांचा समावेश असलेली दहावी ग्रीन यादी महाआॅनलाईकडून अद्यापही बँका आणि निबंधक कार्यालयाला प्राप्त झाली नाही.

जुने माफ होईना अन नवीन मिळेनाकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनातर्फे रक्कम भरुन त्यांचे खाते शून्य केले जाणार आहे. खाते शून्य झाल्यानंतर शेतकऱ्यांना नवीन पिक कर्जाची उचल करता येणार आहे. मात्र खरीप हंगाम अर्धा संपत येत असताना खाते शून्य झाल्याने नवीन पिक कर्ज मिळण्याची अडचण झाली. तर शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम भरल्यास त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. जुने कर्जमाफ होत नसल्याने नवीन पिक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

सावकारांनी वाढविलेला व्याजदरऐन खरीप हंगामात कर्जमाफीच्या किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांना उधार उसनवारी करुन हंगाम पूर्ण करावा लागत आहे. यामुळे बरेच शेतकरी सावकारांकडे जात असून ते याचा फायदा घेत १० ते १२ टक्के व्याजाने पैसे देत असल्याची माहिती आहे.

याद्या लांबविण्याचे कारण कायकर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जून महिन्यापर्यंत नियमित आल्या. मात्र त्यानंतर मोठे अंतर पडले आहे. याद्या लांबविण्यामागे राजकीय हेतू असल्याची चर्चा आहे. बँकाचे अधिकारी यावर अधिक बोलण्यास तयार नाही. त्यामुळे याद्या लांबविण्याचे नेमके कारण गुलदस्त्यात आहे.

महाआॅनलाईनकडून बँकाना अद्यापही दहावी ग्रीन यादी प्राप्त झाली नाही. त्यामुळे जवळपास २५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. याद्या प्राप्त होताच रक्कम जमा केली जाईल.- सुरेश टेटे, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा बँक गोंदिया.कर्जमाफीची दहावी ग्रीन यादी अद्यापही आली नाही. काही तांत्रिक अडचणीमुळे याद्यांना विलंब होत असल्याची माहिती आहे.अनिल गोस्वामीे, प्रभारी उपनिबंधक गोंदिया.

टॅग्स :Farmerशेतकरी