शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

‘टिल्लूं’नी वाढविले टेंशन

By admin | Updated: May 17, 2016 01:35 IST

पाण्यासाठी हाहाकार माजला असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून गोंदियात अनेक वर्षानंतर एक वेळा पाणी

गोंदिया : पाण्यासाठी हाहाकार माजला असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून गोंदियात अनेक वर्षानंतर एक वेळा पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. मात्र कमी वेळासाठी होणाऱ्या पाणी पुरवठ्यातून पुरेसे पाणी मिळावे म्हणून अर्धेअधिक नळधारक टिल्लूपंपांनी पाणी खेचत आहेत. परिणामी अनेक जणांना, विशेषत: उंच भागातील रहिशांना पाणीच मिळणे कठीण झाले आहे. राजरोसपणे हा प्रकार सुरू असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधीकरण याला आळा घालण्यात हतबल दिसून येत आहे. जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत आटत चालल्यामुळे पाणी टंचाईची समस्या गडद झाली आहे. आता जेमतेम मे महिना सुरू असून एक महिनातरी पाऊस जोर धरणार नाही. त्यामुळे एवढे दिवस नागरिकांना पाणी पुरवठा करता यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे शहरवासीयांना ठरवून दिलेल्या वेळात पाणी भरून ठेवावे लागत आहे. मात्र सर्वच नळ कनेक्शन धारकांना पाणी मिळत नसल्याचेही चित्र बघावयास मिळत आहे. याचे कारण असे की, शहरात असलेल्या नळ कनेक्शनधारकांमधील बहुतांश नळधारकांकडे आज टुल्लूपंप असून ते पंपद्वारे पाणी खेचून घेत आहेत. परिणामी ज्यांच्याकडे टुल्लूपंप नाही अशांपर्यंत पाणी पोहचू शकत नाही. यामुळे त्यांना थोडेफार पाणीच मिळत आहे. याबाबत अशा नागरिकांकडून तक्रार केली जात आहे. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून या प्रकारावर कारवाई शून्य दिसून येत आहे. मजीप्राच्या या भूमिकेमुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांना कोरड्या घशानेच राहावे लागण्याची गत आली आहे. (शहर प्रतिनिधी)पुरवठा काळात भारनियमन करा४टिल्लू पंपाद्वारे पाणी खेचण्याचा हा प्रकार जोमात सुरू असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सोमवारी (दि.१६) पाणी पुरवठा काळात भारनियमन करण्यात यावे, अशी मागणी केली. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी यांनी महावितरणला तसे निर्देश दिल्याची माहिती मजीप्राचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी दिली. मात्र महावितरण त्यावर कधी अंमलबजावणी करते यावर बरेच काही अवलंबून आहे.४शहरात महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे १२०७४ कनेक्शनधारक आहेत. एक अंदाज लावला असता यातील अर्ध्याधीकांकडे टुल्लूपंप आहे. नळाव्दारे येत असलेल्या पाण्याला फोर्स राहत नसल्यामुळे शिवाय नळ कधी येणार नाही याचा नेम नसल्याने हे टुल्लूपंपधारक पंपलावून पाईपलाईनमधील पाणी खेचून साठवून ठेवतात. त्यांचा हा प्रकार मात्र गरिबांना पाण्यासाठी तडफडत सोडून देत आहे. या काळात मजीप्राने शोध मोहीम राबविणे गरजेचे होते. मात्र मनुष्यबळाचा अभाव असल्याने प्रत्येक भागात जाणे शक्य नाही. मात्र तक्रार आल्यावर यासंदर्भात नक्कीच कारवाई केली जाईल. शिवाय पोलिसांतही तक्रार नोंदवून कारवाई करणार आहोत. - राजेंद्र मडके उपविभागीय अभियंता, मजीप्रा.