शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘टिल्लूं’नी वाढविले टेंशन

By admin | Updated: May 17, 2016 01:35 IST

पाण्यासाठी हाहाकार माजला असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून गोंदियात अनेक वर्षानंतर एक वेळा पाणी

गोंदिया : पाण्यासाठी हाहाकार माजला असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून गोंदियात अनेक वर्षानंतर एक वेळा पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. मात्र कमी वेळासाठी होणाऱ्या पाणी पुरवठ्यातून पुरेसे पाणी मिळावे म्हणून अर्धेअधिक नळधारक टिल्लूपंपांनी पाणी खेचत आहेत. परिणामी अनेक जणांना, विशेषत: उंच भागातील रहिशांना पाणीच मिळणे कठीण झाले आहे. राजरोसपणे हा प्रकार सुरू असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधीकरण याला आळा घालण्यात हतबल दिसून येत आहे. जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत आटत चालल्यामुळे पाणी टंचाईची समस्या गडद झाली आहे. आता जेमतेम मे महिना सुरू असून एक महिनातरी पाऊस जोर धरणार नाही. त्यामुळे एवढे दिवस नागरिकांना पाणी पुरवठा करता यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे शहरवासीयांना ठरवून दिलेल्या वेळात पाणी भरून ठेवावे लागत आहे. मात्र सर्वच नळ कनेक्शन धारकांना पाणी मिळत नसल्याचेही चित्र बघावयास मिळत आहे. याचे कारण असे की, शहरात असलेल्या नळ कनेक्शनधारकांमधील बहुतांश नळधारकांकडे आज टुल्लूपंप असून ते पंपद्वारे पाणी खेचून घेत आहेत. परिणामी ज्यांच्याकडे टुल्लूपंप नाही अशांपर्यंत पाणी पोहचू शकत नाही. यामुळे त्यांना थोडेफार पाणीच मिळत आहे. याबाबत अशा नागरिकांकडून तक्रार केली जात आहे. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून या प्रकारावर कारवाई शून्य दिसून येत आहे. मजीप्राच्या या भूमिकेमुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांना कोरड्या घशानेच राहावे लागण्याची गत आली आहे. (शहर प्रतिनिधी)पुरवठा काळात भारनियमन करा४टिल्लू पंपाद्वारे पाणी खेचण्याचा हा प्रकार जोमात सुरू असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सोमवारी (दि.१६) पाणी पुरवठा काळात भारनियमन करण्यात यावे, अशी मागणी केली. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी यांनी महावितरणला तसे निर्देश दिल्याची माहिती मजीप्राचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी दिली. मात्र महावितरण त्यावर कधी अंमलबजावणी करते यावर बरेच काही अवलंबून आहे.४शहरात महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे १२०७४ कनेक्शनधारक आहेत. एक अंदाज लावला असता यातील अर्ध्याधीकांकडे टुल्लूपंप आहे. नळाव्दारे येत असलेल्या पाण्याला फोर्स राहत नसल्यामुळे शिवाय नळ कधी येणार नाही याचा नेम नसल्याने हे टुल्लूपंपधारक पंपलावून पाईपलाईनमधील पाणी खेचून साठवून ठेवतात. त्यांचा हा प्रकार मात्र गरिबांना पाण्यासाठी तडफडत सोडून देत आहे. या काळात मजीप्राने शोध मोहीम राबविणे गरजेचे होते. मात्र मनुष्यबळाचा अभाव असल्याने प्रत्येक भागात जाणे शक्य नाही. मात्र तक्रार आल्यावर यासंदर्भात नक्कीच कारवाई केली जाईल. शिवाय पोलिसांतही तक्रार नोंदवून कारवाई करणार आहोत. - राजेंद्र मडके उपविभागीय अभियंता, मजीप्रा.