शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

वाघ व्यवस्थापन निद्रावस्थेत

By admin | Updated: March 18, 2015 01:04 IST

आमगाव येथील बाघ व्यवस्थापन उपविभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बेबंदशाहीमुळे कालव्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

आमगाव : आमगाव येथील बाघ व्यवस्थापन उपविभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बेबंदशाहीमुळे कालव्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. आमगाव-देवरी मार्गावरील राज्य मार्ग ओलांडून जाणाऱ्या कालव्यावर मोठे भगदाड पडल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. संबंधित विभागाने तक्रारींकडे पाठ फिरविल्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. वाघ इटियाडोह पाटबंधारे उपविभागीय कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू आहे. प्रशासनाने हात वर केल्याने या विभागांतर्गत येणाऱ्या वाघ कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वाघ कालव्यांच्या जागेवर अगोदरच खासगी लोकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले. तर अनेक व्यक्तींनी वाघ कालव्यातील जागेची विक्रीही केली आहे. त्यामुळे कालवे खासगी वापरात आले आहेत. वाघ इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या माध्यमाने वाघ कालव्यांचे योग्य व्यवस्थापन व्हावे, याकरिता शासनाकडून निधीची तरतूद करण्यात येते. सिंचन सुविधा नियोजनामुळे शेतकऱ्यांना या कालव्यांद्वारे होणारे सिंचन लाभाचे ठरले आहे. परंतु विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे वाघ कालवे संपुष्टात येत आहे. त्यामुळे भविष्यात वाघ कालव्यातून मिळणाऱ्या सिंचनाच्या पाण्यापासून शेतकऱ्यांना वंचित व्हावे लागणार आहे. वाघ कालव्यांच्या व्यवस्थापनावर शासकीय निधी योग्यरीत्या हाताळण्यात येत नाही. वाघ कालवे दुरूस्तीअभावी जर्जर झालेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे राज्यमार्ग ओलांडून जाणारे कालवे खड्ड्यांत रुपांतरीत झाले आहेत. या खड्ड्यांमुळे राज्य मार्गावरील रस्ते अपघाताला आमंत्रण देत आहेत. परंतु कुंभकर्णी अवस्थेत असलेला विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र पुढे आहे. (शहर प्रतिनिधी)