शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

बाघ कालव्याच्या जमिनीची विल्हेवाट?

By admin | Updated: November 1, 2014 23:09 IST

तालुक्यातील बाघ व्यवस्थापन विभागाच्या अभियंत्यांच्या मध्यस्तीने बाघ कालव्यातील जमिनीवर खाजगी अतिक्रमणाला मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधेला बंद

आमगाव : तालुक्यातील बाघ व्यवस्थापन विभागाच्या अभियंत्यांच्या मध्यस्तीने बाघ कालव्यातील जमिनीवर खाजगी अतिक्रमणाला मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधेला बंद करण्याचा प्रताप संबंधित विभागाकडून होत आहे. जमिनीची विल्हेवाट लावताना मोठी देवाणघेवाण झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.आमगाव येथील बाघ व्यवस्थापन सिंचन विभागाकडून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी शासनाने उपलब्ध करून दिलेली बाघ कालव्यांची जमीन परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. आमगाव, सालेकसा, देवरी या तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने बाघ कालव्यांची निर्मिती केली. बाघ कालव्यांच्या लगत नदीची संसाधने उपलब्ध करून दिली. यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करुन योजना पूर्ण केली.परंतु आमगाव तालुक्यात बाघ कालव्यांच्या जमिनीवर अनेक व्यक्तींनी पक्क्या इमारती, कुंपण घातले. तसेच अनेकांनी या भूखंडाची विक्रीच करून घेतली. या बाबीकडे संबंधित विभागाचे लक्ष अनेकदा वळवण्यात आले.परंतु अधिकारी व अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींचे साटेलोटे असल्याने या प्रकरणाकडे विभागाने पाठ दाखविली. आमगाव येथील संबंधित विभागातील उपविभागीय अभियंता एस.टी. राठोड यांचा कार्यकाळ प्रारंभीपासूनच तीनही तालुक्यात कालव्यांच्या जमिनीवर अतिक्रमणाची सुरुवात मोठ्या प्रमाणात झाली. या जमिनीवर भूखंड व्यवसायिकांनी अतिक्रमण करून परस्पर विक्रीही केल्याची बाब समोर आली आहे. अनेक व्यक्तींनी कालव्याच्या जागेवर पक्के रस्ते निर्माण करून कालवे गोठवण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध होणारी पाण्याची उपलब्धता बंद झाली. अनेक नागरिक वस्तीमधून जाणारे कालवे पावसाळ्यात पुरापासून बचावाकरिता सोईचे होते. परंतु कालव्यांवरील अतिक्रमणामुळे पावसाचे पाणी नागरिक वस्त्यांमध्ये शिरून पुराची अवस्था निर्माण होते. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी देवाण-घेवाण प्रकरणात गुंतले असल्याने त्यांना शेतकऱ्यांची सिंचन सोय व होणाऱ्या पूर परिस्थितीकडे डोळेझाक केली आहे. दरम्यान कालव्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरूध्द तसेच अधिकाऱ्यांविरूध्द कारवाईसाठी सदर प्रश्न विधानसभेत रेटून धरण्यात येईल अशी माहिती आ.संजय पुराम यांनी ‘लोकमत’ला दिली. (शहर प्रतिनिधी)