शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

गोंदिया जिल्ह्यात तूर व हरभराला ढगा‌ळ वातावरणापासून धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 15:50 IST

Gondia news agriculture अवका‌‌ळी पाऊस व किडरोगांमुळे धानाच्या नासाडीचा फटका सहन केल्यानंतर रब्बीतून काही हाती घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोटावर आता लाथ मारण्यासाठी ढगा‌ळ वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : अवका‌‌ळी पाऊस व किडरोगांमुळे धानाच्या नासाडीचा फटका सहन केल्यानंतर रब्बीतून काही हाती घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोटावर आता लाथ मारण्यासाठी ढगा‌ळ वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात मागील २-४ दिवसांपासून ढगा‌ळ वातावरण निर्माण झाले असल्याने रब्बी पीक धोक्यात आल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांनी हरभरा, लाखोळी, जवस, ज्वारी, गहू व अन्य रब्बीपिकांची लागवड केली आहे. यातून तरी काही हाती येणार अशी अपेक्षा बाळगून धडपडत असलेल्या शेतकऱ्याला आता ढगाळ वातावरणाने टेंशन दिले आहे. जिल्ह्यात १९ हजार हेक्टरमध्ये यंदा रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यातही हरभरा व लाखोळीवर शेतकरी विसंबून दिसतो. यामुळेच सर्वाधिक ५११२ हेक्टरमध्ये हरभरा तर ६५४३ हेक्टरमध्ये लाखोळीची लागवड करण्यात आली आहे. मात्र ढगाळ वातावणारमुळे ही पिके धोक्यात दिसून येत असल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. ढगाळ वातावरण व त्यातच पाऊस बरसल्यास या पिकांवर किडरोगांची लागण होणार असल्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. यामध्ये गव्हाला तर कमी मात्र तूर, हरभरा व अन्य पिकांना जास्त धोका दिसून येत आहे.

पाऊस झाल्यास लाखोळी व हरभराला फटका

जिल्ह्यात मागील ४-५ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे रब्बीपिक धोक्यात दिसून येत आहेत. अशात पाऊस झाल्यास हरभरावर घट्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर सध्या तूर लागली असल्याने शेंगा पोखरणारी अ‌ळी लागू शकते.

शेतकऱ्यांनी काय-काय काळजी घ्यावी

ढगाळ वातावरण व पावसाची स्थिती बघता शेतकऱ्यांनी कामगंध सापळे लावावे. तसेच पक्षी थांब्यांची व्यवस्था करावी. यानंतरही किडरोगांचा प्रादुर्भाव जाणवत असल्यास कडुलिंबांच्या किटकनाशकाचा वापर करावा असे जिल्हा कृषी अधीक्षक गणेश घोरपडे यांनी सांगीतले.

उपाययोजनांची गरज

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर किडरोगांचा धोका दिसत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन उपाययोजना करण्याची गरज दिसून येत आहे.

- गणेश घोरपडे

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेती