शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आढावा बैठकीच्या माध्यमातून गावांचा समतोल विकास शक्य

By admin | Updated: March 30, 2015 01:18 IST

ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधीची प्रमुख जबाबदारी असते.

बोंडगावदेवी : ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधीची प्रमुख जबाबदारी असते. स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत गावखेड्याचा विकास साधून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणता येते. प्रभाग समितीच्या आढावा बैठकीतून गावपातळीवरच्या विकासाभिमुख कार्याला गती देता येते. अनेक समस्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून मार्गी लावल्या जावू शकतात. जिल्हा परिषद प्रभाग समितीच्या नियमितपणे घेतल्या जाणाऱ्या आढावा बैठकीतून क्षेत्रातील गावांचा समतोल विकास साधल्या जावू शकतो, असे प्रतिपादन बोंडगावदेवी जि.प. क्षेत्राचे सदस्य तथा जि.प. प्रभाग समितीचे अध्यक्ष अरविंद शिवणकर यांनी केले. बोंडगावदेवी जि.प. प्रभाग समितीच्या १९ व्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पिंपळगाव-खांबी येथील जि.प. व प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या प्रभाग समितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य अरविंद शिवणकर होते. याप्रसंगी पिंपळगावचे प्रज्ञा डोंगरे, निमगावचे देवाजी डोंगरे, बाक्टीचे सरपंच जितेंद्र शेंडे, सिलेझरीचे धार्मिक गणवीर, खांबीचे शारदा खोटेले उपस्थित होते. या बैठकीला क्षेत्रातील सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य, शिक्षण कृषी, ग्रामीण पाणी पुरवठा, वनविभाग, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना शिवणकर म्हणाले की, शासनाचा विकास कामांसाठी भरपूर निधी येतो. तो निधी आपल्या क्षेत्रात आणण्यासाठी ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. जागरूक लोकप्रतिनिधी असला तर विकासाला खिंड पडू शकत नाही. प्रभाग समितीची आढावा बैठक नियमित घेणे गरजेचे आहे. आपल्या जि.प. क्षेत्राचा सर्वांगिण विकास व्हावा, ग्रामीण जनतेच्या समस्यांची पूर्तता व्हावी, विविध शासकीय योजनांची माहिती गावपातळीवरील सामान्य माणसाला सहज उपलब्ध होऊन लाभ मिळावा यासाठी बोंडगावदेवी जि.प. प्रभागाची आढावा बैठक नियमित घेण्याचा आपला माणस असल्याचे ते म्हणाले. या बैठकीच्या माध्यमातून क्षेत्रातील ग्रामीण भागाचा समतोल विकास साधणे सहज शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. काही कामचुकार अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीमुळे गावातील सामान्य माणसाला व्यवसायापासून दूर राहावे लागते ही शोकांतिका आहे. विषय प्रमुखांनी जनतेच्या प्रश्नाला अग्रक्रम देऊन विकासात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीची कारवाई प्रभाग समितीचे सचिव तथा पं.स. कृषी अधिकारी ऊईके यांनी पार पाडली. आढावा बैठकीत आरोग्य विभागाचे डॉ.ए.सी.सिरसाट, पशुसंवर्धन विभागाचा डॉ. वाघाये, शिक्षण विभागाचा केंद्रप्रमुख बी.डब्ल्यु. भानारकर, खेताडे, रतनपुरे, अभियंता ए.आर.शेख उपस्थित होते. (वार्ताहर)