शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

धानाचे तीन पुंजणे जळून खाक

By admin | Updated: December 21, 2014 23:01 IST

सालेकसा तालुक्यातील कारूटोला ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या ग्राम सलंगटोला येथे शेतात ठेवलेले धानाचे तीन पुंजणे जळून खाक झाले. २० डिसेंबर रोजी रात्री घडलेल्या या घटनेमुळे मात्र

साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील कारूटोला ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या ग्राम सलंगटोला येथे शेतात ठेवलेले धानाचे तीन पुंजणे जळून खाक झाले. २० डिसेंबर रोजी रात्री घडलेल्या या घटनेमुळे मात्र शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले. प्राप्त माहितीनुसार, सलंगटोला येथील शेतकरी मोतीराम डोमा भांडारकर यांची नऊ एकर शेती आहे. यंदा त्यांनी जय श्रीराम व आरपी प्रजातीचे धान लावले होते व दोन-तीन दिवसांपूर्वीच त्यांची कटाई झाली होती. कटाई करण्यात आलेल्या धानाची मळणी करावयाची असल्याने भांडारकर यांनी क टाई केलेला धान शेतातच तीन पुंजणे तयार करून ठेवला होता. २१ डिसेंबर रोजी सकाळी ते शेतात गेल्यावर त्यांना धानाचे तिन्ही पुंजणे जळून खाक झाल्याचे दिसले. संपूर्ण धान जळाल्याने भांडारकर यांच्यावर आभाळच फाटले असून यामध्ये त्यांचे सुमारे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सरपच मिलींद गजभिये व पटवाऱ्यांनी घटनास्थळारव जाऊन पंचनामा केला. विशेष म्हणजे धानाचे पुंजणे ज्या ठिकाणी लावण्यात आले होते. त्या ठिकाणापासून बऱ्याच अंतरावर कुणाचेही घर नसून शिवाय तेथून विद्युत वाहिनीही जात नाही. अशात कुणीतरी जाणून पुंजण्याला आग लावल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. नेमका प्रकार काय तो तपासानंतरच उघडकीस येणार मात्र भांडारकर यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)