शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
6
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
7
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
8
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
10
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
11
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
12
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
13
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
14
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
15
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
16
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
17
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
18
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
19
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
20
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय

हजारावर गाळेधारक अत्यल्प भाड्यावर

By admin | Updated: July 29, 2014 23:53 IST

नगर पालिकेच्या उत्पन्नातील महत्वाचे साधन असलेल्या गोंदिया शहरातील हजारांवर गाळ््यांमधील (दुकान) भाडेकरी अनेक वर्षांपासून अत्यल्प भाडे देऊन नगर परिषदेला महिन्याकाठी लाखो रुपयांचा चुना

महिन्याकाठी लाखोंचे नुकसान : नाममात्र भाडे देणारे भाडेकरीच झाले मालककपिल केकत - गोंदियानगर पालिकेच्या उत्पन्नातील महत्वाचे साधन असलेल्या गोंदिया शहरातील हजारांवर गाळ््यांमधील (दुकान) भाडेकरी अनेक वर्षांपासून अत्यल्प भाडे देऊन नगर परिषदेला महिन्याकाठी लाखो रुपयांचा चुना लावत आहेत. कित्येक वर्षांपूर्वी ठरवून दिलेल्या भाड्यावरच ते अजूनही बस्तान मांडून गाळ्यांवर आपला हक्का सांगत आहेत. त्यामुळे हे भाडेकरीच आता गाळ्यांचे मालक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हा गंभीर प्रकार नगर परिषद प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून केवळ हतबल होऊन निमूटपणे पाहात असल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळे गोंदिया नगर पालिकेला सुमारे ११०० गाळ््यांमधून येणाऱ्या मिळकतीमध्ये महिन्याला लाखोंचे नुकसान सहन करावे लागत आहे. आधीच कर वसुलीअभावी तोट्यात कारणाभर करणाऱ्या या नगर परिषदेचा हा उदारपणा नेमका कोणासाठी? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. नगर पालिकेच्या मालकीचे शहरात सुमारे ११०० गाळे आहेत. भाडेतत्वावर ंही सर्व दुकाने देण्यात आली आहेत. यातील कित्येक भाडेकरी मागील ३०-४० वर्षांपासून या दुकानांत आपले बस्तान मांडून आहेत. या भाडेकरूंपैकी अनेकांना त्यावेळी दुकान देताना ठरवून देण्यात भाड्याच्या रकमेत अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे दुकान भाडेकरू २०-३० वर्षांपूर्वीचेच भाडे मोजून या दुकानांवर आपला हक्क बजावत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शहरात इंदिरा गांधी स्टेडियम, स्टेडियम समोरील फुटपाथ, बाजार परिसर, जयस्तंभ चौक, टाऊन स्कुल, लोहा लाईन, रामनगर बाजार चौक, प्रितम चौक, मटन मार्केट परिसरात पालिकेच्या मालकीचे गाळे आहेत. सुमारे ११०० गाळे आजघडीला नगर पालिकेकडे आहेत. विशेष म्हणजे काही लोकांना आजच्या दरानेसुद्धा भाडे आकारण्यात येत आहे. त्यामुळे एकासाठी एक, तर दुसऱ्यासाठी दुसरा नियम लावण्याचा हा प्रकार न समजण्यापलिकडचा झाला आहे. पालिकेला घर कर व शहरातील गाळे हे दोन मुख्य आर्थिक स्त्रोत आहेत. असे असतानाही पालिका कर वसुलीतही माघारलेली आहे. गाळ््यांच्या भाड्यापासूनही मुकली आहे. यावरून ‘गरिबी मे गिला आटा’ असला प्रकार पालिकेसोबत घडत आहे. विशेष म्हणजे नियमानुसार दर तीन वर्षांनी दुकानांच्या गाळ््यांचा लिलाव करायला पाहिजे. मात्र पालिकेकडून या नियमांची पायमल्ली करून अनेक वर्षांपासून गाळ्यांचा लिलावच केलेला नाही. पालिकेचा हा दुर्लक्षितपणा रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मात्र जीवावर उठला आहे. पालिकेची आवक कमी व खर्च जास्त होत असल्याने शासनाकडून रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यास नकार दिला जात आहे. यामुळे मागील कित्येक वर्षांपासून पालिकेला आपली सेवा देणारे रोजंदारी कर्मचारी आजही आपल्या हक्कासाठी झगडत आहे. जोपर्यंत पालिकेची आवक वाढणार नाही तोपर्यंत खर्च नियंत्रणात येणार नाही व रोजंदारी कर्मचारी स्थायी होणार नाही हे ही तेवढेच सत्य आहे. पालिकेच्या या अजब-गजब कारभाराचा फायदा दुकानांचे भाडेकरी घेत आहेत. पालिकेने काही दुकानांचे बांधकाम व दुरूस्ती करवून दिल्याने अशांचे भाडे पाच पटीने वाढविण्यात आले आहेत. मात्र ज्यांची दुकाने आहे त्याच अवस्थेत आहेत त्यांचे भाडे मात्र जुन्याच दराने सुरू असल्याचीही माहिती आहे. अशात पालिका प्रशासनाचे डोळे कधी उघडतील व होत असलेली लाखोंची हानी भरून काढण्यासाठी पालिका प्रशासन कधी पुढे पाऊल टाकेल याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.चोर तर चोर वर शिरजोरनगर पालिकेच्या मालकीच्या दुकानांसाठी कमीत कमी भाडे आकारण्याचा हा प्रकार सुरू असतानाच यातील कित्येक दुकानदारांनी त्यांना न.प.कडून आकारल्या जाणाऱ्या भाड्याच्या चौपट जास्त दराने परस्पर आपले दुकान इतरांना भाड्याने दिले आहे. केवळ नगर पालिकेच्या नाकर्तेपणामुळे हे दुकानधारक चौपट भाडे कमावीत असल्याची माहिती हाती आली आहे.