शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’वर १० हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:50 IST

आता वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट अधिक दंड, अपघातग्रस्तांना नुकसान भरपाईची तरतूद असणारे बहुचर्चित मोटार वाहन विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. लवकरच हे विधेयक राज्यात लागू होणार आहे.

ठळक मुद्देबहुचर्चित मोटार वाहन विधेयकाला मंजुरी : रस्ता सुरक्षेमध्ये आमूलाग्र बदलाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आता वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट अधिक दंड, अपघातग्रस्तांना नुकसान भरपाईची तरतूद असणारे बहुचर्चित मोटार वाहन विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. लवकरच हे विधेयक राज्यात लागू होणार आहे. या नव्या विधेयकात मद्यपान करून वाहन चालविल्यास १० हजार रुपये दंड, वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास पाच हजार रुपये दंड, धोकादायक वाहन चालविल्यास पाच हजार रुपये दंड, परवाना नसताना वाहन चालविल्यास पाच हजार रुपये दंड केला जाणार आहे. यामुळे वाहतुकीचे नियम पाळले जाऊन अपघात कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.देशात ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे होतात. हे टाळण्यासाठी व बेशिस्त वाहनचालकांना चाप बसावा, या उद्देशाने मोटार वाहन विधेयकात अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सातत्याने या सुधारित मोटार वाहन विधेयकासाठी प्रयत्न चालविले होते. अखेर हे विधेयक संसदेत बुधवारी मंजूर झाले. यामुळे रस्ता सुरक्षेमध्ये आमूलाग्र बदल होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. सोबतच वाहनांचे परवाने काढणे, त्यांची मुदत वाढवणे, वाहनांची नोंदणी यासारखी महत्त्वाची कामे आॅनलाईन पद्धतीने केली जाणार आहेत.अल्पवयीन मुलाचा हातून अपघात झाल्यास पालकांना तुरुंगवासअल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास सध्या केवळ ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. परंतु नव्या विधेयकात अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळून आल्यास थेट गाडीची नोंदणी रद्द होणार आहे. याशिवाय अल्पवयीन मुलाच्या हातून अपघात झाल्यास पालकांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. सध्याच्या कायद्यात ही तरतूद नव्हती.परवान्यासाठी शिक्षणाची अट रद्दपरवाना मिळविण्यासाठी पूर्वी आठवा वर्ग उत्तीर्ण असणे बंधनकारक होते. मात्र नव्या विधेयकात ही अटच काढून टाकण्यात आली आहे. यामुळे ड्रायव्हिंग स्कूलमधून मिळवलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे वाहनचालक परवाना मिळवता येईल. शिवाय, परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी आता एक वर्षांची मुदत दिली जाणार आहे.‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’वर वचक बसेलदारू पिऊन वाहन चालविल्यास रस्त्यावरील अपघात वाढतात. यावर आळा घालण्यासाठी ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई केली जाते. दोषी वाहनचालकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात दाखल होते. तीन हजार रुपयांचा दंडही आकारला जातो, असे असतानाही ही प्रकरणे कमी होताना दिसून येत नाही. दरवर्षी सुमारे २० हजारावर अशी प्रकरणे समोर येतात. परंतु नव्या कायद्यात १० हजाराचा दंड आकारला जाणार आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस