शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’वर १० हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:50 IST

आता वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट अधिक दंड, अपघातग्रस्तांना नुकसान भरपाईची तरतूद असणारे बहुचर्चित मोटार वाहन विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. लवकरच हे विधेयक राज्यात लागू होणार आहे.

ठळक मुद्देबहुचर्चित मोटार वाहन विधेयकाला मंजुरी : रस्ता सुरक्षेमध्ये आमूलाग्र बदलाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आता वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट अधिक दंड, अपघातग्रस्तांना नुकसान भरपाईची तरतूद असणारे बहुचर्चित मोटार वाहन विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. लवकरच हे विधेयक राज्यात लागू होणार आहे. या नव्या विधेयकात मद्यपान करून वाहन चालविल्यास १० हजार रुपये दंड, वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास पाच हजार रुपये दंड, धोकादायक वाहन चालविल्यास पाच हजार रुपये दंड, परवाना नसताना वाहन चालविल्यास पाच हजार रुपये दंड केला जाणार आहे. यामुळे वाहतुकीचे नियम पाळले जाऊन अपघात कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.देशात ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे होतात. हे टाळण्यासाठी व बेशिस्त वाहनचालकांना चाप बसावा, या उद्देशाने मोटार वाहन विधेयकात अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सातत्याने या सुधारित मोटार वाहन विधेयकासाठी प्रयत्न चालविले होते. अखेर हे विधेयक संसदेत बुधवारी मंजूर झाले. यामुळे रस्ता सुरक्षेमध्ये आमूलाग्र बदल होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. सोबतच वाहनांचे परवाने काढणे, त्यांची मुदत वाढवणे, वाहनांची नोंदणी यासारखी महत्त्वाची कामे आॅनलाईन पद्धतीने केली जाणार आहेत.अल्पवयीन मुलाचा हातून अपघात झाल्यास पालकांना तुरुंगवासअल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास सध्या केवळ ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. परंतु नव्या विधेयकात अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळून आल्यास थेट गाडीची नोंदणी रद्द होणार आहे. याशिवाय अल्पवयीन मुलाच्या हातून अपघात झाल्यास पालकांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. सध्याच्या कायद्यात ही तरतूद नव्हती.परवान्यासाठी शिक्षणाची अट रद्दपरवाना मिळविण्यासाठी पूर्वी आठवा वर्ग उत्तीर्ण असणे बंधनकारक होते. मात्र नव्या विधेयकात ही अटच काढून टाकण्यात आली आहे. यामुळे ड्रायव्हिंग स्कूलमधून मिळवलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे वाहनचालक परवाना मिळवता येईल. शिवाय, परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी आता एक वर्षांची मुदत दिली जाणार आहे.‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’वर वचक बसेलदारू पिऊन वाहन चालविल्यास रस्त्यावरील अपघात वाढतात. यावर आळा घालण्यासाठी ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई केली जाते. दोषी वाहनचालकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात दाखल होते. तीन हजार रुपयांचा दंडही आकारला जातो, असे असतानाही ही प्रकरणे कमी होताना दिसून येत नाही. दरवर्षी सुमारे २० हजारावर अशी प्रकरणे समोर येतात. परंतु नव्या कायद्यात १० हजाराचा दंड आकारला जाणार आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस