शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

शेतकऱ्यांचे ११ कोटींचे चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:48 IST

आधीच नैसर्गिक संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना आता शासकीय दप्तर दिंरगाईमुळे आर्थिक संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देशासकीय धान खरेदी केंद्र : मागील वर्षीच्या तुलनेत धान खरेदीत घट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आधीच नैसर्गिक संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना आता शासकीय दप्तर दिंरगाईमुळे आर्थिक संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे तब्बल ११ कोटी रुपयांचे चुकारे पंधरा दिवसांपासून थकल्याची बाब पुढे आली आहे.हमीभावापेक्षा शेतकऱ्यांना कमी दर मिळू नये, यासाठी शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा सर्वसाधारणाला धानाला प्रती क्विंटल १५५० आणि अ दर्जाच्या धानाला १५९० रुपये प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. मात्र यंदा कमी पाऊस आणि धान पिकांवर कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. त्याचा धानाच्या दर्जावर देखील काही प्रमाणात परिणाम झाला. धानाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला जात होता. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, याकरिता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत जिल्ह्यात ५७ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर आत्तापर्यंत २ लाख ८३ हजार ६५४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी २६०० शेतकºयांचे ११ कोटी रुपयांचे चुकारे मागील पंधरा दिवसांपासून थकल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करुन बँकेचे कर्ज आणि उधार उसणवारी फेडू अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण, धानाची विक्री करुन चुकारे मिळण्यासाठी पंधरा ते वीस दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात आले आहे. चुकारे केव्हा मिळतील यासाठी शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्राच्या पायºया झिजवित असल्याचे चित्र आहे. मात्र त्यांना दप्तर दिंरगाईचा फटका सहन करावा लागत आहे.एकीकडे शासनाने शासकीय केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना एक ते दोन दिवसात चुकारे देण्याचे आश्वासन दिले होते. दुसरीकडे मात्र त्यांना पंधरा पंधरा दिवस चुकारे मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. या संदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी येत्या चार पाच दिवसात सर्व शेतकऱ्यांना चुकारे देण्यात येणार असल्याचे सांगितले.मागील वर्षीच्या तुलनेत घटकमी पाऊस आणि कीडरोगांचा धानपिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. परिणामी शासकीय धान खरेदी केंद्रावरील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. मागील वर्षी याच तारखेपर्यंत ४ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली होते. तर यंदा २ लाख ८३ हजार ६५४ क्विंटल धान खरेदी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १ लाख क्विंटल धान खरेदीत घट झाली.

टॅग्स :Farmerशेतकरी