शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:34 IST

जिल्ह्यातील ८२ हजारांवर शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी आॅनलाईन अर्ज सादर केले. परंतु आतापर्यंत जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकेतील मिळून ५० हजारांवर शेतकऱ्यांचीच ग्रीनलिस्ट आली आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम तोंडावर : कर्जमाफीअभावी पीककर्ज अडले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ८२ हजारांवर शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी आॅनलाईन अर्ज सादर केले. परंतु आतापर्यंत जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकेतील मिळून ५० हजारांवर शेतकऱ्यांचीच ग्रीनलिस्ट आली आहे. उर्वरित ३२ हजारांवर शेतकºयांना अद्याप कर्जमाफीची प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्या दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून ग्रीनलिस्टच जाहीर झालेली नाही. त्यामुळे कर्जमाफीची माहिती कळत नाही. खरीप हंगाम तोंडावर आला तरी नवीन कर्ज मिळेना, अशा द्विधा अवस्थेत शेतकरी अडकला आहे.गतवर्षी शेतकºयांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर राज्य शासनाने जून अखेरीस शेतकऱ्यांना अटी व शर्थीच्या अधीन राहून कर्जमाफीची घोषणा केली. या घोषनेनंतर त्यात सातत्याने बदलणारे निकष, नवीन आदेश आदी कारणांमुळे प्रत्यक्षात पहिली ग्रीनलिस्ट जाहीर होण्यास अडीच ते तीन महिने लागले.त्यावेळी ओरड वाढल्यानंतर दिवाळीपर्यंत कर्जमाफी शेतकºयांच्या पदरात पडेल, असे ठोक आश्वासन मुख्यमंत्र्यासह सहकारमंत्र्यांनी दिले होते. परंतु ११ महिने लोटले तरी अद्याप ३० टक्के शेतकऱ्यांना आपण कर्जमाफीस पात्र ठरलो की नाही, याबाबत साशंकता कायम आहे. त्यातच आता खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.एकीकडे आॅनलाईन अर्ज करुनही कर्जमाफीच्या ग्रीनलिस्टमध्ये नाव नाही. दीड महिन्यापासून नवीन ग्रीनलिस्ट जाहीर नाही. त्यामुळे मानगुटीवर कर्जाचा भार कायम आहे. असे असताना बँकांकडून नवीन कर्जासाठी दारातही उभे केले जात नाही.त्यामुळे खरिपाची पेरणी करायची कशी? असा प्रश्न हजारो शेतकऱ्यांना पडला आहे.हजारो शेतकरी हवालदिलडझनभर शासन निर्णय, सूचनापत्रे काढल्यानंतर ग्रीनलिस्ट जाहीर होऊन रक्कमही वर्ग करण्यास प्रारंभ झाले. त्यानुसार दोन महिन्यात प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात आठ महिने झाले तरी हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. सुरुवातीला टप्पाटप्याने जाहीर होणारी ग्रीनलिस्ट गेल्या दीड महिन्यापासून जाहीरच झाली नाही. त्यामुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत.सरकारसोबत विरोधकही गप्पसुरुवातीला कर्जमाफीच्या घोषणेनंतर सत्ताधाऱ्यांनी याचा मोठा गाजावाजा केला. त्यानंतर ग्रीनलिस्टला होणारा उशीर व सततच्या बदलत्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली. मात्र सध्या खरिपाचा हंगाम तोंडावर असल्याने कर्जमाफीबाबत अर्ज केलेल्या शेतकºयांना वस्तुस्थिती कळणे गरजेचे आहे. मात्र याबाबत दीड महिन्यापासून प्रक्रिया ठप्प असताना ना सत्ताधारी काही सांगत आहेत ना विरोधक आवाज उठवत आहेत.