शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:34 IST

जिल्ह्यातील ८२ हजारांवर शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी आॅनलाईन अर्ज सादर केले. परंतु आतापर्यंत जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकेतील मिळून ५० हजारांवर शेतकऱ्यांचीच ग्रीनलिस्ट आली आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम तोंडावर : कर्जमाफीअभावी पीककर्ज अडले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ८२ हजारांवर शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी आॅनलाईन अर्ज सादर केले. परंतु आतापर्यंत जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकेतील मिळून ५० हजारांवर शेतकऱ्यांचीच ग्रीनलिस्ट आली आहे. उर्वरित ३२ हजारांवर शेतकºयांना अद्याप कर्जमाफीची प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्या दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून ग्रीनलिस्टच जाहीर झालेली नाही. त्यामुळे कर्जमाफीची माहिती कळत नाही. खरीप हंगाम तोंडावर आला तरी नवीन कर्ज मिळेना, अशा द्विधा अवस्थेत शेतकरी अडकला आहे.गतवर्षी शेतकºयांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर राज्य शासनाने जून अखेरीस शेतकऱ्यांना अटी व शर्थीच्या अधीन राहून कर्जमाफीची घोषणा केली. या घोषनेनंतर त्यात सातत्याने बदलणारे निकष, नवीन आदेश आदी कारणांमुळे प्रत्यक्षात पहिली ग्रीनलिस्ट जाहीर होण्यास अडीच ते तीन महिने लागले.त्यावेळी ओरड वाढल्यानंतर दिवाळीपर्यंत कर्जमाफी शेतकºयांच्या पदरात पडेल, असे ठोक आश्वासन मुख्यमंत्र्यासह सहकारमंत्र्यांनी दिले होते. परंतु ११ महिने लोटले तरी अद्याप ३० टक्के शेतकऱ्यांना आपण कर्जमाफीस पात्र ठरलो की नाही, याबाबत साशंकता कायम आहे. त्यातच आता खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.एकीकडे आॅनलाईन अर्ज करुनही कर्जमाफीच्या ग्रीनलिस्टमध्ये नाव नाही. दीड महिन्यापासून नवीन ग्रीनलिस्ट जाहीर नाही. त्यामुळे मानगुटीवर कर्जाचा भार कायम आहे. असे असताना बँकांकडून नवीन कर्जासाठी दारातही उभे केले जात नाही.त्यामुळे खरिपाची पेरणी करायची कशी? असा प्रश्न हजारो शेतकऱ्यांना पडला आहे.हजारो शेतकरी हवालदिलडझनभर शासन निर्णय, सूचनापत्रे काढल्यानंतर ग्रीनलिस्ट जाहीर होऊन रक्कमही वर्ग करण्यास प्रारंभ झाले. त्यानुसार दोन महिन्यात प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात आठ महिने झाले तरी हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. सुरुवातीला टप्पाटप्याने जाहीर होणारी ग्रीनलिस्ट गेल्या दीड महिन्यापासून जाहीरच झाली नाही. त्यामुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत.सरकारसोबत विरोधकही गप्पसुरुवातीला कर्जमाफीच्या घोषणेनंतर सत्ताधाऱ्यांनी याचा मोठा गाजावाजा केला. त्यानंतर ग्रीनलिस्टला होणारा उशीर व सततच्या बदलत्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली. मात्र सध्या खरिपाचा हंगाम तोंडावर असल्याने कर्जमाफीबाबत अर्ज केलेल्या शेतकºयांना वस्तुस्थिती कळणे गरजेचे आहे. मात्र याबाबत दीड महिन्यापासून प्रक्रिया ठप्प असताना ना सत्ताधारी काही सांगत आहेत ना विरोधक आवाज उठवत आहेत.