शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

५७ हजार वीज ग्राहकांकडे १0 कोटींचे बिल थकीत

By admin | Updated: June 8, 2014 00:02 IST

एकीकडे भारनियमनाला घेऊन वीज ग्राहकांत ओरड सुरू आहे. दुसरीकडे वीज बिल भरण्यात दिरंगाईचे धोरण अवलंबल्या जात आहे. कृषी पंपधारकांसह घरगुती वीज ग्राहक आणि शासकीय कार्यालयांकडेदेखील

गोंदिया : एकीकडे भारनियमनाला घेऊन वीज ग्राहकांत ओरड सुरू आहे. दुसरीकडे वीज बिल भरण्यात दिरंगाईचे धोरण अवलंबल्या जात आहे. कृषी पंपधारकांसह घरगुती वीज ग्राहक आणि शासकीय कार्यालयांकडेदेखील थकबाकी शिल्लक आहे. जिल्ह्यात ५७ हजार वीज ग्राहकांवर महावितरणच्या ९ कोटी ७६ लाख ४४२ रुपयांची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महावितरणच्या नियमाप्रमाणे फीडर तयार करून ज्या फीडरवर वीजबिल भरणा कमी किंवा तूट जास्त आहे. अशा फीडरवर भारनियमन केले जाते. जिल्ह्यात कृषी पंपधारक २१ हजार ९८७ ग्राहक आहेत. एप्रिल २0१२ ते मार्च २0१४ पर्यंंत त्यांना १३ कोटी ६१ लाख रुपयांचे वीज बिल देण्यात आले. यापैकी १२ हजार ९५७ ग्राहकांनी ७ कोटी ४0 लाख रुपये वीज बिल भरणा केला, तर ९ हजार ३ ग्राहकांनी अद्याप ४ कोटी २६ लाख रुपये भरणाच केला नाही. सर्वाधिक थकबाकीचे ग्राहकात कृषिपंपधारकांचा अव्वल क्रमांक लागत असला तरी घरगुती व दारिद्रयरेषेखालील २ लाख १ हजार ३२ ग्राहकांना ५ कोटी ६४ लाख ७0 हजार रुपयांची वीज बिल देण्यात आले. यातील १ लाख ५८ हजार २३९ ग्राहकांना ४ कोटी १८ लाख पाच हजार रुपयांचा भरणा केली. ४३ हजार ३९३ वीज ग्राहकांवर अद्याप एक कोटी ७२ लाख ५0 हजार रुपयाची थकबाकी आहे. यासह व्यावसायिक ग्राहकांची संख्या जिल्ह्यात १0 हजारांपेक्षा अधिक आहे. त्यांच्यावर १ कोटी ७३ लाख ३३ हजार रुपयाच वीज बिल आकारण्यात आले. त्यापैकी ७ हजार ५४३ ग्राहकांनी आतापर्यंत १ कोटी १६ लाख ५८ हजार रुपयाचा वीज बिल भरणा केला आहे. ३ हजार १२४ ग्राहकांवर ३१ लाख ७१ हजार रुपयांची थकबाकी आहे. जिल्ह्यात औद्योगिक ग्राहक दोन हजाराच्या वर आहेत. त्यांना २ कोटी ६६ लाख ४१ हजार रुपयांचे वीज बिल देण्यात आले. त्यापैकी १ कोटी ९५ लाख १0 हजार रुपयांचे वीज बिल भरणा झाला असून ७0 लाख ७७ हजार रुपयांची थकबाकी या ग्राहकांवर आहे. शहर व ग्रामीण भागातील ४५0 पाणीपुरवठा ग्राहकांना महावितरणाकडून २२ लाख १२ हजार रुपयांचे बिल देण्यात आले. त्यापैकी ७ लाख ५९ हजार रुपयांचा भरणा तर १५ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी आहे. पोल्ट्रीफार्मच्या ५४ ग्राहकांना १ लाख ९0५ रुपयांचा वीज पुरविण्यात आली. पैकी ५७ हजार ९३0 रुपयांचे वीज बिल आतापर्यंंत ग्राहकांनी भरलेला आहे. असे एकूण २ लाख ३७ हजार ग्राहकांनी २३ कोटी ८८ लाख ७४ हजार ९0५ रुपयांचे वीज बिल देण्यात आले. पैकी एक लाख ८0 हजार ग्राहकांनी १४ कोटी ७७ लाख ८९ हजार रुपयाच विद्युत बिल भरलेला असून ५६ हजार ग्राहकांवर ७ कोटी १६ लाख ५९ हजार रुपयाचे विजेच्या बिलाचे थकबाकी आहे. शहरी व ग्रामीण भागातील पथदिव्यांचे पावणेसातशे ग्राहकांवर २ कोटी ५९ लाख ५५ हजार, तर शासकीय कार्यालयांवर ५५ हजार रुपयांची थकबाकी आहे. (तालुका प्रतिनिधी)