शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

३०० ब्रास रेतीचा केला साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 22:37 IST

तालुक्यातील ग्राम पिपरटोला येथील वाघ नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जात आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकाराकडे तहसीलदार दुर्लक्ष करीत असल्याने रेतीमाफीयांनी मोठ्या प्रमाणात रेती चोरुन नेली आहे. तर ३०० ब्रास रेतीचा साठा गावात करुन ठेवला आहे.

ठळक मुद्देवाघ नदीच्या पात्रातून उपसा : ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील ग्राम पिपरटोला येथील वाघ नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जात आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकाराकडे तहसीलदार दुर्लक्ष करीत असल्याने रेतीमाफीयांनी मोठ्या प्रमाणात रेती चोरुन नेली आहे. तर ३०० ब्रास रेतीचा साठा गावात करुन ठेवला आहे.शासनाने ज्या रेती घाटांचा लिलाव केला. त्या घाटातील रेती काढणे सुरु आहे. परंतु ज्या ठिकाणच्या रेतीचा घाटांचा लिलाव झाला नाही. त्या घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करुन रेती विक्री केली जात असल्याचे चित्र आहे. नियमाला धाब्यावर बसवून रात्री ९ ते पहाटे ४ वाजतापर्यंत मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जातो. यासंदर्भात ग्रामपंचायत पिपरटोलाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत रेतीचा उपसा करु नका अशी ताकीद रेती माफीयांना दिल्यामुळे रेती माफीयांनी उलट त्यांनाच ठार मारण्याची धमकी दिली आहे. वाघ नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती चोरण्यात आली. चोरलेल्या रेतीपैकी ३०० ब्रास रेतीचा साठा पिपरटोला येथे करुन ठेवल्याचे सरपंचांनी सालेकसाचे ठाणेदार, आमगावचे तहसीलदार, देवरी येथील उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्षरेतीचा उपसा करणाऱ्या रेतीमाफीयांना महसूल विभागाचे पाठबळ असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार किंवा तहसीलदार हे रेती माफीयांवर कारवाई करीत नसल्यामुळे नागरिकांमध्ये महसूल विभागाप्रती आक्रोश आहे. गावकऱ्यांच्या तक्रारीनंतरही रेती माफीयांवर कारवाई केली जात नसल्याने याप्रकराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे.१ लाख १५ हजारांचा एकही दंड नाहीरेती माफीयावर अंकुश बसावा यासाठी शासनाने रेती चोरणाऱ्यांना १ लाख १५ हजार ४०० रुपयांचा दंड करावा असे शासन निर्णयात म्हटले आहे. हा शासन निर्णय निघण्यापूर्वी येथील तहसीलदारांनी रेती चोरणाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला होता. परंतु यंदा चार कोटींचा महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट असताना एकही रेती माफीयाकडून १ लाख १५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला नाही. शासन निर्णय निघून चार-पाच महिन्यांचा कालावधी लोटला तरी एकावर ही दंड झाला नाही. त्यामुळे नक्कीच कुठेतरी पाणी मुरत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :sandवाळू