शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

आदिवासी संस्कृती व परंपरेच्या जपणुकीसाठी काम करणार

By admin | Updated: February 7, 2016 02:28 IST

कचारगडचे महत्व केवळ आदिवासींचे एक धार्मिक स्थळ किंवा पर्यटकांसाठी कुतूहलाचे ठिकाण नाही तर आदिवासी संस्कृतीची ओळख आहे.

विजय मानकर सालेकसाकचारगडचे महत्व केवळ आदिवासींचे एक धार्मिक स्थळ किंवा पर्यटकांसाठी कुतूहलाचे ठिकाण नाही तर आदिवासी संस्कृतीची ओळख आहे. शासनाच्या मदतीने येथील वनसंपत्ती, औषधीयुक्त वृक्ष, वन्यजीवांच्या संरक्षणासोबतच आदिवासी संस्कृती व परंपरेची जपणूक केली जाऊ शकते. त्यासाठी पुढाकार घेण्याची देवस्थान समितीची तयारी आहे. त्यासाठी कचारगड देवस्थानसह संपूर्ण ५५.२४ हेक्टरचा जंगल परिसर कचारगड देवस्थान समितीच्या स्वाधीन करावा, अशी अपेक्षा पारी कुपार लिंगो देवस्थान समिती कचारगडचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी व्यक्त केली.कचारगड यात्रेची सुरूवात कशी झाली, केव्हापासून झाली याबद्दल विचारले असता कोकोडे म्हणाले, कचारगड देवस्थान हे संपूर्ण भारतातील आदिवासी समाजाचे श्रध्दास्थान आहे. कचारगडच्या शोध आदिवासी संशोधक के.बा. मरस्कोल्हे यांनी १९८४ मध्ये लावला. त्यानंतर धर्माचार्य मोतीरावण कंगाली यांनी या ठिकाणी कचारगड यात्रेला सुरूवात केली. कचारगडचा उल्लेख १९०८ च्या भंडारा जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये पण असल्याची माहिती कोकोडे यांनी दिली.१९८४ मध्ये काही मोजक्या लोकांनी यात्रेला व पूजेला सुरूवात केली. जसजसी माहिती मिळत गेली भाविक वाढत गेले. आज येथे जवळपास १४ राज्यांचे पाच लाखांपेक्षा जास्त भाविक माघ पौर्णिमेच्या यात्रेत येतात. आदिवासी समाजाच्या दृष्टीने या पुजेला मोठे महत्व असते. तिला बडादेव पूजा म्हणतात. गोंडी भाषेत याला ‘कोया पूनेम’ कार्यक्रम म्हणतात त्याला आता महोत्सवाचे स्वरूप आले आहे. देवाचे प्रतिक म्हणून त्रिशुलाची पूजा केली जाते. त्याला हळद तांदळाचा आडवा टिका उजवीकडून डावीकडे लावला जातो. पृथ्वीच्या फिरण्याचा नियमाच्या आधारे ते केले जाते. तसेच पूजेत मोहफुल आणि राड (धूप) हे पूजेचे साहित्य असतात. नारळाचा वापर होत नाही, हे या पुजेचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.दिवसेंदिवस वाढत असलेली भाविकांची संख्या पाहता कोणत्या सोयी व्हाव्या, याबद्दल ते म्हणाले, भाविकांची संख्या व त्यांना होणारा त्रास पाहून शासनाने यंदा येथे छोट्या गुफेपर्यंत पक्के रस्ते बनविले ही चांगली बाब आहे. योसबत दोन भक्त निवास, एक सांस्कृतिक मंचसुद्धा आहे. परंतु ही सोय पुरेशी नाही. सर्वप्रथम दर्रेकसा रेल्वे स्टेशनवर यात्रेदरम्यान पाच दिवस सर्व एक्सप्रेस गाड्या थांबल्या पाहिजे. पाण्याची पुरेशी व्यवस्था, आरोग्य, निवास, फिरते शौचालय, पुरेशी विद्युत व्यवस्था इत्यादी व्यवस्थेकडे शासनाने लक्ष द्यावे, असे कोकोडे म्हणाले. सर्वप्रथम शासनाने हा संपूर्ण परिसर समितीकडे सुपूर्द केला पाहिजे. यामुळे येथे एक बॉटनिकल गार्डन येथे लावता येईल. या गार्डनमध्ये औषधीयुक्त वनस्पतींचा समावेश असेल. यामुळे परिसरातील वृक्षांची कत्तल थांबविता येईल. तसेच वन्यजीव वाचविण्यातही मदत मिळेल. या ठिकाणी शासनाच्या मदतीने वस्तुसंग्रहालय बनविण्याची गरज आहे. १७०० वर्षे राज्य करणाऱ्या आदिवासींचे शस्त्र, वेशभूषा, साहित्य, अलंकार, बाण इत्यादींची ओळख नवीन पिढीला होण्यासाठी आणि त्यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी हे संग्रहालय उपयोगी ठरेल, असे कोकोडे म्हणाले. आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून दोन लाखांची मदत मिळते, परंतु येथे १५ ते २० लाखांचा खर्च असतो. लोक प्रतिनिधींनी शासनातून व स्वत:चा विकास निधी देवून पुरेशी व्यवस्था करण्यात पुढाकार घेतला पाहिजे. कला संस्कृतीचे दर्शन घडविणारे प्रवेशद्वार व स्मारक बनविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.