शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

आदिवासी संस्कृती व परंपरेच्या जपणुकीसाठी काम करणार

By admin | Updated: February 7, 2016 02:28 IST

कचारगडचे महत्व केवळ आदिवासींचे एक धार्मिक स्थळ किंवा पर्यटकांसाठी कुतूहलाचे ठिकाण नाही तर आदिवासी संस्कृतीची ओळख आहे.

विजय मानकर सालेकसाकचारगडचे महत्व केवळ आदिवासींचे एक धार्मिक स्थळ किंवा पर्यटकांसाठी कुतूहलाचे ठिकाण नाही तर आदिवासी संस्कृतीची ओळख आहे. शासनाच्या मदतीने येथील वनसंपत्ती, औषधीयुक्त वृक्ष, वन्यजीवांच्या संरक्षणासोबतच आदिवासी संस्कृती व परंपरेची जपणूक केली जाऊ शकते. त्यासाठी पुढाकार घेण्याची देवस्थान समितीची तयारी आहे. त्यासाठी कचारगड देवस्थानसह संपूर्ण ५५.२४ हेक्टरचा जंगल परिसर कचारगड देवस्थान समितीच्या स्वाधीन करावा, अशी अपेक्षा पारी कुपार लिंगो देवस्थान समिती कचारगडचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी व्यक्त केली.कचारगड यात्रेची सुरूवात कशी झाली, केव्हापासून झाली याबद्दल विचारले असता कोकोडे म्हणाले, कचारगड देवस्थान हे संपूर्ण भारतातील आदिवासी समाजाचे श्रध्दास्थान आहे. कचारगडच्या शोध आदिवासी संशोधक के.बा. मरस्कोल्हे यांनी १९८४ मध्ये लावला. त्यानंतर धर्माचार्य मोतीरावण कंगाली यांनी या ठिकाणी कचारगड यात्रेला सुरूवात केली. कचारगडचा उल्लेख १९०८ च्या भंडारा जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये पण असल्याची माहिती कोकोडे यांनी दिली.१९८४ मध्ये काही मोजक्या लोकांनी यात्रेला व पूजेला सुरूवात केली. जसजसी माहिती मिळत गेली भाविक वाढत गेले. आज येथे जवळपास १४ राज्यांचे पाच लाखांपेक्षा जास्त भाविक माघ पौर्णिमेच्या यात्रेत येतात. आदिवासी समाजाच्या दृष्टीने या पुजेला मोठे महत्व असते. तिला बडादेव पूजा म्हणतात. गोंडी भाषेत याला ‘कोया पूनेम’ कार्यक्रम म्हणतात त्याला आता महोत्सवाचे स्वरूप आले आहे. देवाचे प्रतिक म्हणून त्रिशुलाची पूजा केली जाते. त्याला हळद तांदळाचा आडवा टिका उजवीकडून डावीकडे लावला जातो. पृथ्वीच्या फिरण्याचा नियमाच्या आधारे ते केले जाते. तसेच पूजेत मोहफुल आणि राड (धूप) हे पूजेचे साहित्य असतात. नारळाचा वापर होत नाही, हे या पुजेचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.दिवसेंदिवस वाढत असलेली भाविकांची संख्या पाहता कोणत्या सोयी व्हाव्या, याबद्दल ते म्हणाले, भाविकांची संख्या व त्यांना होणारा त्रास पाहून शासनाने यंदा येथे छोट्या गुफेपर्यंत पक्के रस्ते बनविले ही चांगली बाब आहे. योसबत दोन भक्त निवास, एक सांस्कृतिक मंचसुद्धा आहे. परंतु ही सोय पुरेशी नाही. सर्वप्रथम दर्रेकसा रेल्वे स्टेशनवर यात्रेदरम्यान पाच दिवस सर्व एक्सप्रेस गाड्या थांबल्या पाहिजे. पाण्याची पुरेशी व्यवस्था, आरोग्य, निवास, फिरते शौचालय, पुरेशी विद्युत व्यवस्था इत्यादी व्यवस्थेकडे शासनाने लक्ष द्यावे, असे कोकोडे म्हणाले. सर्वप्रथम शासनाने हा संपूर्ण परिसर समितीकडे सुपूर्द केला पाहिजे. यामुळे येथे एक बॉटनिकल गार्डन येथे लावता येईल. या गार्डनमध्ये औषधीयुक्त वनस्पतींचा समावेश असेल. यामुळे परिसरातील वृक्षांची कत्तल थांबविता येईल. तसेच वन्यजीव वाचविण्यातही मदत मिळेल. या ठिकाणी शासनाच्या मदतीने वस्तुसंग्रहालय बनविण्याची गरज आहे. १७०० वर्षे राज्य करणाऱ्या आदिवासींचे शस्त्र, वेशभूषा, साहित्य, अलंकार, बाण इत्यादींची ओळख नवीन पिढीला होण्यासाठी आणि त्यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी हे संग्रहालय उपयोगी ठरेल, असे कोकोडे म्हणाले. आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून दोन लाखांची मदत मिळते, परंतु येथे १५ ते २० लाखांचा खर्च असतो. लोक प्रतिनिधींनी शासनातून व स्वत:चा विकास निधी देवून पुरेशी व्यवस्था करण्यात पुढाकार घेतला पाहिजे. कला संस्कृतीचे दर्शन घडविणारे प्रवेशद्वार व स्मारक बनविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.