शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी संस्कृती व परंपरेच्या जपणुकीसाठी काम करणार

By admin | Updated: February 7, 2016 02:28 IST

कचारगडचे महत्व केवळ आदिवासींचे एक धार्मिक स्थळ किंवा पर्यटकांसाठी कुतूहलाचे ठिकाण नाही तर आदिवासी संस्कृतीची ओळख आहे.

विजय मानकर सालेकसाकचारगडचे महत्व केवळ आदिवासींचे एक धार्मिक स्थळ किंवा पर्यटकांसाठी कुतूहलाचे ठिकाण नाही तर आदिवासी संस्कृतीची ओळख आहे. शासनाच्या मदतीने येथील वनसंपत्ती, औषधीयुक्त वृक्ष, वन्यजीवांच्या संरक्षणासोबतच आदिवासी संस्कृती व परंपरेची जपणूक केली जाऊ शकते. त्यासाठी पुढाकार घेण्याची देवस्थान समितीची तयारी आहे. त्यासाठी कचारगड देवस्थानसह संपूर्ण ५५.२४ हेक्टरचा जंगल परिसर कचारगड देवस्थान समितीच्या स्वाधीन करावा, अशी अपेक्षा पारी कुपार लिंगो देवस्थान समिती कचारगडचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी व्यक्त केली.कचारगड यात्रेची सुरूवात कशी झाली, केव्हापासून झाली याबद्दल विचारले असता कोकोडे म्हणाले, कचारगड देवस्थान हे संपूर्ण भारतातील आदिवासी समाजाचे श्रध्दास्थान आहे. कचारगडच्या शोध आदिवासी संशोधक के.बा. मरस्कोल्हे यांनी १९८४ मध्ये लावला. त्यानंतर धर्माचार्य मोतीरावण कंगाली यांनी या ठिकाणी कचारगड यात्रेला सुरूवात केली. कचारगडचा उल्लेख १९०८ च्या भंडारा जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये पण असल्याची माहिती कोकोडे यांनी दिली.१९८४ मध्ये काही मोजक्या लोकांनी यात्रेला व पूजेला सुरूवात केली. जसजसी माहिती मिळत गेली भाविक वाढत गेले. आज येथे जवळपास १४ राज्यांचे पाच लाखांपेक्षा जास्त भाविक माघ पौर्णिमेच्या यात्रेत येतात. आदिवासी समाजाच्या दृष्टीने या पुजेला मोठे महत्व असते. तिला बडादेव पूजा म्हणतात. गोंडी भाषेत याला ‘कोया पूनेम’ कार्यक्रम म्हणतात त्याला आता महोत्सवाचे स्वरूप आले आहे. देवाचे प्रतिक म्हणून त्रिशुलाची पूजा केली जाते. त्याला हळद तांदळाचा आडवा टिका उजवीकडून डावीकडे लावला जातो. पृथ्वीच्या फिरण्याचा नियमाच्या आधारे ते केले जाते. तसेच पूजेत मोहफुल आणि राड (धूप) हे पूजेचे साहित्य असतात. नारळाचा वापर होत नाही, हे या पुजेचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.दिवसेंदिवस वाढत असलेली भाविकांची संख्या पाहता कोणत्या सोयी व्हाव्या, याबद्दल ते म्हणाले, भाविकांची संख्या व त्यांना होणारा त्रास पाहून शासनाने यंदा येथे छोट्या गुफेपर्यंत पक्के रस्ते बनविले ही चांगली बाब आहे. योसबत दोन भक्त निवास, एक सांस्कृतिक मंचसुद्धा आहे. परंतु ही सोय पुरेशी नाही. सर्वप्रथम दर्रेकसा रेल्वे स्टेशनवर यात्रेदरम्यान पाच दिवस सर्व एक्सप्रेस गाड्या थांबल्या पाहिजे. पाण्याची पुरेशी व्यवस्था, आरोग्य, निवास, फिरते शौचालय, पुरेशी विद्युत व्यवस्था इत्यादी व्यवस्थेकडे शासनाने लक्ष द्यावे, असे कोकोडे म्हणाले. सर्वप्रथम शासनाने हा संपूर्ण परिसर समितीकडे सुपूर्द केला पाहिजे. यामुळे येथे एक बॉटनिकल गार्डन येथे लावता येईल. या गार्डनमध्ये औषधीयुक्त वनस्पतींचा समावेश असेल. यामुळे परिसरातील वृक्षांची कत्तल थांबविता येईल. तसेच वन्यजीव वाचविण्यातही मदत मिळेल. या ठिकाणी शासनाच्या मदतीने वस्तुसंग्रहालय बनविण्याची गरज आहे. १७०० वर्षे राज्य करणाऱ्या आदिवासींचे शस्त्र, वेशभूषा, साहित्य, अलंकार, बाण इत्यादींची ओळख नवीन पिढीला होण्यासाठी आणि त्यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी हे संग्रहालय उपयोगी ठरेल, असे कोकोडे म्हणाले. आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून दोन लाखांची मदत मिळते, परंतु येथे १५ ते २० लाखांचा खर्च असतो. लोक प्रतिनिधींनी शासनातून व स्वत:चा विकास निधी देवून पुरेशी व्यवस्था करण्यात पुढाकार घेतला पाहिजे. कला संस्कृतीचे दर्शन घडविणारे प्रवेशद्वार व स्मारक बनविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.