शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

त्यांना गढूळ पाण्याने भागवावी लागते तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 23:24 IST

बाबाटोली येथे दोन बोअरवेल आणि नळ योजनेच्या माध्यमातून येथील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. मात्र सध्या स्थितीत हे दोन्ही साधने नाममात्र ठरत आहे. येथील फकीर समाजाच्या लोकांना गढूळ पाण्याने आपली तहान भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देबोअरवेल नादुरुस्त : बाबाटोलीवासीयांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : बाबाटोली येथे दोन बोअरवेल आणि नळ योजनेच्या माध्यमातून येथील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. मात्र सध्या स्थितीत हे दोन्ही साधने नाममात्र ठरत आहे. येथील फकीर समाजाच्या लोकांना गढूळ पाण्याने आपली तहान भागवावी लागत आहे. परिणामी बाबाटोलीवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सालेकसा नगर पंचायतमध्ये समावेश झालेली बाबाटोली यापूर्वी आमगाव खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येत होती. या टोलीमध्ये आतापर्यंत केवळ दोन बोअरवेल खोदण्यात आले. बोअरवेल काही दिवस चालले त्यानंतर त्या बंद पडल्या आहेत. मात्र तेव्हापासून या बोअरवेलची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे दोन्ही बोअरवेल आजही नादुरुस्त आहेत. एवढेच नाही तर त्या बोअरवेलचे काही साहित्य सुद्धा गायब झालेले आहे. अशात रेकार्डवर जरी दोन बोअरवेलची नोंद असली तरी प्रत्यक्षात मात्र त्याचा काहीच उपयोग नाही. बाबाटोलीवासीयांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून यापूर्वी स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रयत्नाने मुख्य मार्गालगत एका बोअरवेलमध्ये पाईपद्वारे पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या बोअरवेलची पाण्याची पातळी खोलवर गेली. त्यामुळे फार कमी प्रमाणात पाणी मिळते. परिणामी सुरुवातीच्या दहा बारा घरांना काही प्रमाणात पाणी मिळते. त्यानंतरच्या घरातील लोकांना पाणीच मिळत नाही. नळ योजनेची पाईप लाईनसुद्धा अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. येथील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांनी खड्डे खोदले. तसेच या खड्डयातील गढूळ पाण्याने ते आपली तहान भागवित असल्याचे चित्र आहे. बरेचदा याच पाण्याचा उपयोग स्वयंपाक व पिण्यासाठी करावा लागत असल्याचे येथील महिलांनी सांगितले. मात्र त्यांच्या समस्येकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेले नाही. काही लोक आपल्या गरजेसाठी ग्रामीण रुग्णालय परिसरातून पाणी आणायला जातात. मात्र येथील लोक त्यांना आपल्या मोहल्यात पाण्यासाठी येऊ देत नाही. अशात बाबाटोलीवासीयांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.पाण्याच्या टाकीची सोय करुन त्याद्वारे पाणी पुरवठा केल्यास पाणी सहजतेने बाबाटोलीत पोहोचू शकते. यासाठी पाईप लाईनची दुरूस्ती करण्याची गरज आहे. तेव्हाच प्रत्येक घरापर्यंत पाणी मिळू शकले.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण