शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

जीव मुठीत घेऊन ते मोजत आहेत दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

गावातील प्रभाग क्रमांक-२ मधील रहिवासी रवी रामा वाघाडे हे ७८ वर्षाच्या आपल्या आईसह, पत्नी व लेकरांना घेऊन जीर्ण घरात राहत आहे. त्यांच्या घराची अवस्था म्हणजे जणू पत्यांचा बंगला असून धक्का दिला तरी पडून जाईल अशी अवस्था आहे. ४ वर्षांचा कालावधी लोटुनही आश्वासना पलीकडे त्यांना काहीच मिळाले नाही. अल्पभूधारक असलेले रवी गुराख्याचा पारंपारिक व्यवसाय करायचे.

ठळक मुद्देवाघाडे ४ तर पात्रेंना ८ वर्षांपासून प्रतीक्षा : घरकुल अभावी जीर्ण घरातच वास्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : ‘गरिबाची गत नाही आणि कुणी जगू देत नाही’ या म्हणीतील वास्तविकतेची झळ येथील वाघाडे व पात्रे कुटुंबियांना सोसावी लागत आहे. उन्हाळा, हिवाळा व पावसाळ््याचा फटका सहन करीत हे कुटुंबीय आपला जीव मुठीत घेऊन जीर्ण घरात एक-एक दिवस मोजत आहेत. यातील वाघाडे यांना ४ तर पात्रे कुटुंबीयांना८ वर्षे झाली असूनही त्यांना घरकुल मिळालेले नाही.गावातील प्रभाग क्रमांक-२ मधील रहिवासी रवी रामा वाघाडे हे ७८ वर्षाच्या आपल्या आईसह, पत्नी व लेकरांना घेऊन जीर्ण घरात राहत आहे. त्यांच्या घराची अवस्था म्हणजे जणू पत्यांचा बंगला असून धक्का दिला तरी पडून जाईल अशी अवस्था आहे. ४ वर्षांचा कालावधी लोटुनही आश्वासना पलीकडे त्यांना काहीच मिळाले नाही. अल्पभूधारक असलेले रवी गुराख्याचा पारंपारिक व्यवसाय करायचे. मात्र गावातील गुरे-ढोरं व शेळ््या पाळण्याचे प्रमाण कमी झाल्याने हे कामही सुटले व आता पोट भरण्यासाठी मिळेल ते काम करीत आहेत. कधीही पडणार एवढे जीर्ण झालेले घर असल्याने रात्रीला डोळा लागत नसल्याचे रवी सांगतात. सरपंचांना राहण्याची व्यवस्था कुठेतरी करा अशी विनंती केली मात्र त्यांनीही लक्ष दिले नाही अशी कैफियतही त्यांनी मांडली. जगण्याचा प्रश्न गंभीर झाला तर घर बांधायला पैसे कुठून आणायचे हा खरा सवाल रवीच्या डोळ््यासमोर उभा आहे. ज्यांना राहायला घर आहेत, ते पक्के घर पाडून घरकुल बांधतात. परंतु मला गरज असून घर मिळत नाही. मुलगी बाराव्या वर्गात तर मुलगा दहावीत मात्र गेल्या ४ वर्षांपासून घरात हक्काची वीज नसल्याचेही सांगतात.हीच अवस्था प्रभाग क्र मांक-५ मधील शकून व भारती रामदास पात्रे यांची आहे. या भूमीहीन भारती व तिचे कुटुंबीय गेल्या ८ वर्षांपासून घरकुलाची प्रतीक्षा करीत आहेत. ८ वर्षांत अनेक उन्हाळे-पावसाळे रात्रंदिवस सोबतीला घेऊन जुन्या पडक्या ते घरात गुजराण करीत आहे. ग्रामपंचायतचे उंबरठे झिजवून झाले. पंचायत समितीच्या कितीतरी फेऱ्या झाल्या. परंतु घरकुलाचे योग त्यांच्या नशिबी आले नाही. ग्रामपंचायतचे कर्मचारी वर्षभरापूर्वी येऊन गेले. परिस्थिती पाहून फोटो काढून नेला. परंतु भारती व शकुन गेल्या ८ वर्षांपासून वेटिंगवरच आहेत. भारती पात्रे या म्हातारी सासू, दोन मुली तर त्यांची जाऊ शकून महादेव पात्रे याही विधवा आहेत. मुसळधार पाऊस आला की पावसाच्या धारा भांड्यात झेलत रात्र काढतात. घरची कर्ती माणसं मरण पावल्यामुळे पारंपारिक कुंभार व्यवसाय मोडकळीस आला. त्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करीत उदरनिर्वाह करायचा. मुलाबाळांच्या शिक्षणासोबतच म्हाताºया डोळ््याला न दिसणाºया सासूचा औषधोपचारही करायचा अशी बेताची परिस्थिती त्यांची आहे. यासाठी दोघी मोलकरणीचे काम करून उदरिनर्वाह चालवतात. जीवन जगण्याला पैसे पुरत नाही, तर मग घर बांधायला पैसे आणायचे कुठून? हा या कुटूंबासमोर यक्ष प्रश्न.गावात आणखी असे लोक आहेत की, ज्यांना तातडीने घरकुलाची गरज आहे. परंतु ‘सरकारी काम, घडीभर थांब’ या म्हणीनुसार त्यांची परवड होत आहे. यामुळेच आज त्यांची परिस्थिती ‘नटसम्राट’ नाटकातील ख्यातनाम नाट्यकलावंत आप्पासाहेब बेलवलकर यांच्यावर जशी कुणी घर देता का घर? राहायला घर असे म्हणण्याची पाळी आल्यास नवल वाटू नये.मागील वर्षी अतिवृष्टीमध्ये ज्यांची घरे पडली व जी पडण्याच्या मार्गावर आहेत अशा रवी वाघाडे सह एकूण २३ लाभार्थ्यांचे घरकुलाचे प्रस्ताव पंचायत समितीला पाठविले आहेत. ते प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून अद्याप मंजूर झाले नाहीत. पुनर्वसन करण्याचे काम तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे आहे.-अनिरु द्ध शहारेसरपंच, ग्रामपंचायत नवेगावबांध.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना