शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

साडेतीन कोटींचे धान यावर्षीही मातीमोल होणार

By admin | Updated: May 8, 2014 23:51 IST

सालेकसा तालुक्यात एकूण पाच ठिकाणी आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकारक्षेत्रात आदिवासी सहकार सोसायटीच्या वतीने वर्ष २०१३-१४ च्या खरीप हंगामात धान खरेदी करण्यात आले

विजय मानकर - सालेकसा

सालेकसा तालुक्यात एकूण पाच ठिकाणी आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकारक्षेत्रात आदिवासी सहकार सोसायटीच्या वतीने वर्ष २०१३-१४ च्या खरीप हंगामात धान खरेदी करण्यात आले. हा २४ हजार क्विंटल धान असून आतापर्यंत त्या धानाची उचल झालेली नाही. विशेष म्हणजे हा धान उघड्यावर असल्यामुळे यंदाचाही धान पुढे मातीमोल तर होणार नाही ना, अशी भिती व्यक्त केली जात आहे. आता पावसाळा जेमतेम दिड महिन्यावर येवून ठेपला आहे. त्यापूर्वीच सतत वादळवारे वाहत आहेत. त्यामुळे धानाला सुरक्षित ठेवण्याचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. २०१०-११ च्या खरीप हंगामातील धानाची उचल आज चार वर्षे लोटूनही झाली नाही. त्यामुळे त्यावर्षीचे पाचही सरकारी सोसायटीतील एकूण जवळपास एक कोटी रुपयाचे धान मातीमोल झाले आहेत. ते धान आता तर जनावरांना सुध्दा खाण्यालायक राहीलेले नाही. उलट त्या ठिकाणी उंदीर, साप, विंचवाचे वास्तव्य बनले आहेत. धान सडल्यामुळे तो माल एवढा विषारी झाला आहेत की तो धान अनावधानाने खाणारी जनावरे सुध्दा मृत्युमुखी पडत आहेत, अशी माहिती पिपरिया येथील सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी दिली. २०११-११ च्या खरीप हंगामाचे खरेदी केलेले धान सालेकसा येथे १७०० क्विंटल, गोरे येथे ४ हजार क्विंटल, पिपरिया येथे साडे चार हजार क्विंटल आणि लोहारा येथे २०० क्विंटल असे जवळपास १० हजार क्विंटलपेक्षा जास्त धान आजही पडून आहे. मागील चार वर्षापासून उघड्यावर असल्याने धानाच्या पोत्यावर झाकण्यात आलेले तिरपालसुध्दा फाडून विखुरलेले आहे. तसेच सतत चार वर्षे पावसाचा मारा पडल्याने पाणी आतपर्यंत शिरून धान पूर्ण सडून मातीमोल झाले आहे.

पावसाळ्यामुळे त्या धानाची विल्हेवाट लावली नाही तर त्या धानापासून एवढी दुर्गंधी पसरेल की, परिसरात रोगराईचा प्रकोप वाढल्याशिवाय राहणार नाही. दुर्गंधीमुळे लोकांंना धान ठेवलेल्या परिसरात जगणे कठीण होऊन जाईल. दुसरीकडे त्या धानाची राखणदारी करीत स्थानिक सोसायटींना लाखो रुपयांचा भुर्दंड बसत असल्याचे दिसून येत आहे. पिपरिया येथील सोसायटीचे सचिव टी.एन. किरसान यांनी सांगितले की, धानाच्या देखरेखीवर आतापर्यंत २ लाख रुपयापेक्षा जास्त खर्च आलेला आहे. सालेकसा येथेही एक ते सवा लाख रु. खर्च आल्याचे येथील अध्यक्ष मूलचंद गावराने यांनी सांगितले. हीच परिस्थिती गोर्रे आणि लोहारा येथील सोसायटीत आहे, अशी माहिती गावराने यांनी दिली. तालुक्यातील सोसायटींच्या पदाधिकार्‍यांना यंदा दुहेरी चिंता वाढली आहे. एक तर २०१०-११ च्या हंगामातील धान सडून मातीमोल झाले आहेत.

त्याचबरोबर यंदाचा २०१३-१४ च्या खरीप हंगामाचे जवळपास २४ हजार क्विंटल धान, ज्याची किंमत अंदाजे ३ कोटी ६० लाख रुपयाच्या वर आहे, त्याची उचल आतापर्यंत झालेली नाही. यात सालेकसा येथील सोसायटीत ६ हजार क्विंटल, गोर्रे सोसायटीत ३ हजार क्विंटल, लोहारा सोसायटीत ८ हजार क्विंटल, दर्रेकसा सोसायटीत ४ हजार क्विंटल आणि पिपरीया सोसायटीत जवळपास ३ हजार क्विंटल धान खरेदी करून उघड्यावर पडले आहे. अशातच आता उन्हाळी पिकाचे धान कापणीला सुरूवात झाली आहे. पुन्हा शेतकरी आपले धान सोसायटीवर घेवून येतील. अशा परिस्थितीला धान खरेदी करून ठेवणे मोठे अडचणीचे ठरणार आहे, असे सोसायटीचे पदाधिकारी सांगत आहेत. धानाची वेळेवर उचल होत नसल्याने धान उघड्यावर पडून राहिल्याने महामंडळाला कोट्यवधी रुपयाचे नुकसान भोगावे लागते. जर सोसायटीच्या ठिकाणी शासनाने गोडाऊन तयार केले तर धानाला सुरक्षितपणे वाचवून ठेवता येवू शकतो.