शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
3
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
4
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
5
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
6
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
7
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
8
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
9
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
10
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
11
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
12
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
13
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
14
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
15
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
16
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
17
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
18
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
19
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
20
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा

चार तालुक्यात झाली अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 05:00 IST

रोवणीनंतर पाऊस गायब झाल्याने धान पीक धोक्यात आले होते. तर पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात ४७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. त्यामुळे पावसाअभावी वाळण्याच्या मार्गावर आलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. गेल्या चोवीस तासात सडक अर्जुनी, गोरेगाव, सालेकसा आणि देवरी या चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर उर्वरित चार तालुक्यांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.यंदा हवामान विभागाने पावसाचे वर्तविलेले अंदाज वारंवार खोटे ठरले. तर, जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत केवळ ६८ टक्के पाऊस झाला होता. सिंचन प्रकल्पांमध्ये सुद्धा ३५ टक्के पाणीसाठा होता. तर रोवणीनंतर पाऊस गायब झाल्याने धान पीक धोक्यात आले होते. तर पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात ४७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, आठपैकी चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे संकटातील धान पिकांना दिलासा मिळाला आहे.

पुजारीटोला धरणाचे ६ दरवाजे उघडले- मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. तर, मध्यप्रदेश आणि धरण क्षेत्रात सुद्धा चांगला पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुजारीटोला धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने या धरणाचे सहा दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले आहे.

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण