शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीव्र भूकंपाची शक्यता नाहीच

By admin | Updated: July 25, 2015 01:32 IST

अवघ्या ३ सेकंदाच्या धरणीकंपाने हादरून गेलेल्या जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी गुरूवारची रात्र मोठ्या भितीयुक्त वातावरणात काढली.

भूगर्भतज्ज्ञांचा निर्वाळा : दहशतीखालील नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वासगोंदिया : अवघ्या ३ सेकंदाच्या धरणीकंपाने हादरून गेलेल्या जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी गुरूवारची रात्र मोठ्या भितीयुक्त वातावरणात काढली. शुक्रवारी दिवसभरही सर्वत्र भूकंपाचीच चर्चा होती. मात्र २४ तासात पुन्हा भूकंपाचा कोणताही धक्का अनुभवायला न मिळाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान जिल्ह्यातील भूगर्भात असलेल्या दगडांचा थर पाहता तीव्र स्वरूपाच्या आणि नुकसानकारक अशा भूकंपाची शक्यता जिल्ह्यात नसल्याचा निर्वाळा भूगर्भतज्ज्ञांनी दिला आहे.गेल्या अनेक वर्षात गोंदिया जिल्हावासीयांनी भूकंपाचा धक्का अनुभवला नाही. यापूर्वी जे काही धक्के बसले असतील त्याची तीव्रता कमी असल्यामुळे अनेकांना ते धक्के जाणवलेही नव्हते. मात्र गुरूवारच्या रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी जाणवलेला धक्का सर्वांनीच अनुभवला. आभाळ गडगडल्यासारखा आवाज करीत जमिनीला ३ सेकंदपर्यंत हादरे बसल्याने तळमजल्यासह उंच इमारतीत राहणाऱ्यांनाही भुकंपाच्या धक्क्यांचा अनुभव घेता आला. हा भूकंप रिस्टर स्केलवर ३.९ एवढ्या तीव्रतेचा होता. याचा केंद्रबिंदू जमिनीखाली १० किलोमीटर खोलवर होता. (जिल्हा प्रतिनिधी)भूकंपानंतर देवरी रुग्णालयातून १५ रुग्ण पसारदेवरी : गुरूवारी रात्री आलेल्या भूकंपानंतर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती असलेले १५ रुग्ण रुग्णालयातून पसार झाले. काहींनी तेव्हाच काढता पाय घेतला तर काहींनी आपण स्वत:च्या जबाबदारीवर जात असल्याचे लिहून देत रुग्णालय सोडणे पसंत केले. त्यामुळे शुक्रवारी या रुग्णालयात एकही रुग्ण भरती नसल्याचे चित्र दिसत होते.देवरीतील ग्रामीण रुग्णालयात विविध आजारांनी ग्रस्त असलेले १५ रुग्ण भरती होते. त्यात काही पुरूष व काही महिला होत्या. भूकंपाच्या धक्क्यात त्यांनी रुग्णालयाची दारे, खिडके हलल्याचे पाहिले. त्यातच रात्री पुन्हा भूकंप येण्याची वार्ता पसरल्याने ते आणखीच घाबरले. रुग्णालयाचे इमारत जीर्ण असल्याने रुग्णांमध्ये घबराट पसरली व त्यांनी तेथून निघून जाणेच पसंत केले.गेल्या ४० वर्षापूर्वी बांधलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत पावसाचे पाणी गळते. ठिकठिकाणी भिंतींना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रुग्णच नाही तर डॉक्टरांना सुद्धा या ठिकाणी काम करताना भिती वाटते. या इमारतीचे नव्याने बांधकाम करण्यासाठी कळविल्यानंतरही बांधकाम विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.मध्य भारतासह विदर्भातील भूगर्भात टणक दगड आहेत. याभागात तीव्र स्वरूपाच्या भूकंपाची शक्यता नसते. जमिनीत खूप खोलवर मोठ्या प्रमाणात पाणी मुरून जमिनीचा स्तर खचला तरच भूकंप येतो. पण तशी परिस्थिती या भागात नाही. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.- प्रा.सुरेश चोपणे, भूगर्भतज्ज्ञ, चंद्रपूर‘ती’ अफवाच ठरलीरात्री ८ वाजून ५ मिनिटांनी बसलेल्या भुकंपाच्या धक्क्यानंतर पुन्हा रात्री १२ ते १ च्या सुमारास तीव्र स्वरूपाचा भुकंपाचा धक्का बसणार असल्याचा संदेश मोबाईलवरून सर्वत्र फिरत होता. या संदेशाची खात्री करण्यासाठी ‘लोकमत’कडेही शेकडो लोकांनी विचारणा केली. मात्र जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी त्या शक्यतेबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे स्पष्ट करीत कोणीही घाबरून न जाण्याचे आवाहन केल्यानंतर अनेकांचा जीव भांड्यात पडला. मात्र तरीही बहुतांश नागरिकांचा भितीमुळे डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी सर्वकाही ठिक असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांना हायसे वाटले.विदर्भात मोठा भूकंप नाहीभारतात दोन प्रकारे भूकंप होतो. एका प्रकारात भारतीय भूखंडाची प्लेट युरेशियन प्लेटला टक्कर देते. त्या भूकंपाची तीव्रता जास्त असते. मात्र मध्य भारतात आणि विदर्भातील भूकंप दुसऱ्या प्रकारात मोडतात. दख्खनच्या पठारातील खडकांच्या या प्रदेशात भूकंपाची तीव्रता कमी असते.विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचाजवळ ४.५ रिस्टर स्केल तिव्रतेचा भूकंप झाला होता. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यात वणीजवळ तसेच नागपूर जिल्ह्यात भुकंप झाले आहेत. मात्र त्याची तीव्रता कमी होती.