शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

शासनाकडून कोंडवाड्याची मनाई, गौशाळाही नाही

By admin | Updated: November 23, 2014 23:20 IST

शासनाने नुकताच एक निर्णय काढून जप्त करण्यात आलेल्या जनावरांना कोंडवाड्यात ठेऊ नका असे सांगत गौशाळेत ठेवण्याचे सूचविले आहे. मात्र जिल्ह्यात एकही शासकीय गौशाळा नसल्यामुळे जनावरांना कोंडवाड्यात

प्रश्न पकडलेल्या जनावरांचा : पोलीस ठाण्यात ठेवायचे काय?नरेश रहिले - गोंदियाशासनाने नुकताच एक निर्णय काढून जप्त करण्यात आलेल्या जनावरांना कोंडवाड्यात ठेऊ नका असे सांगत गौशाळेत ठेवण्याचे सूचविले आहे. मात्र जिल्ह्यात एकही शासकीय गौशाळा नसल्यामुळे जनावरांना कोंडवाड्यात ठेवायचे नाही तर पोलीस ठाण्यात ठेवायचे काय? असा प्रश्न जिल्ह्यातील पोलिसांना पडला आहे.प्राण्यांना निदर्यतेने वागवू नये यासाठी शासनाने कडक कायद्याची निर्मिती केली. तरीहीे हल्लीच्या काळात काही लोक जनावरांना वाहनात डांबून त्यांची रवानगी कत्तलखान्यात करतात. कत्तलखान्यात जनावरांना नेताना पोलिसांनी पकडले तर त्या जनावरांना ठेवायचे कुठे हा प्रश्न पोलिसांपुढे पडतो. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात जनावरांना वाहनात डांबून त्यांची रवानगी कत्तलखान्यात केली जाते. शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात जनावरांची खरेदी करून त्यांना वाहनांत डांबून चारा व पाण्याविना वाहतूक केली जाते. दररोज जिल्ह्यातील १० ते १५ वाहनांत जनावरांना डांबून नले जाते. जनावरांची सर्वाधिक वाहतूक रात्रीच्यावेळी केली जाते. या वाहनांवर पोलीस विभागाकडून कारवाई केली जाते. प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याच्या कायद्यान्वये कारवाई केली जाते. मात्र या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या जनावरांची सोय कशी करावी हा प्रश्न पोलिसांपुढे पडतो. शासनाने एक निर्णय काढून पकडलेल्या जनावरांना कोंडवाड्यात ठेवू नये, त्यांना चारा, पाणी उपलब्ध होईल अशा गौशाळेत ठेवण्याचे सुचविले. परंतु जिल्ह्यात शासकीय एकही गौशाळा नसल्यामुळे कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांना पकडल्यास ठेवायचे कुठे हा मोठा प्रश्न पोलिसांपुढे पडतो.शासनाने हा निर्णय काढण्यापूर्वी जप्त केलेली जनावरे कोंडवाड्यात ठेवण्यात येत होती. मात्र जप्त करण्यात आलेल्या जनावरांना कोंडवाड्यात चारा व पाणी मिळत नव्हता त्यामुळे उपासमारीने अनेक जनावरांचा मृत्यू होत होता. ही बाब शासनाच्या लक्षात आल्याने शासनाने जनावरांना कोंडवाड्यात न ठेवता गौशाळेत ठेवण्याच्या सूचना केल्या. मात्र जिल्ह्यात एकही शासकीय गौशाळा नसल्याने पोलिसांची इकडे ाड व तिडके विहीर अशी स्थिती झाल्याचे दिसून येत आहे. अशात पकडलेली जनावरे ठेवायची कोठे हा प्रश्न पडत आहे.