शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

शासनाकडून कोंडवाड्याची मनाई, गौशाळाही नाही

By admin | Updated: November 23, 2014 23:20 IST

शासनाने नुकताच एक निर्णय काढून जप्त करण्यात आलेल्या जनावरांना कोंडवाड्यात ठेऊ नका असे सांगत गौशाळेत ठेवण्याचे सूचविले आहे. मात्र जिल्ह्यात एकही शासकीय गौशाळा नसल्यामुळे जनावरांना कोंडवाड्यात

प्रश्न पकडलेल्या जनावरांचा : पोलीस ठाण्यात ठेवायचे काय?नरेश रहिले - गोंदियाशासनाने नुकताच एक निर्णय काढून जप्त करण्यात आलेल्या जनावरांना कोंडवाड्यात ठेऊ नका असे सांगत गौशाळेत ठेवण्याचे सूचविले आहे. मात्र जिल्ह्यात एकही शासकीय गौशाळा नसल्यामुळे जनावरांना कोंडवाड्यात ठेवायचे नाही तर पोलीस ठाण्यात ठेवायचे काय? असा प्रश्न जिल्ह्यातील पोलिसांना पडला आहे.प्राण्यांना निदर्यतेने वागवू नये यासाठी शासनाने कडक कायद्याची निर्मिती केली. तरीहीे हल्लीच्या काळात काही लोक जनावरांना वाहनात डांबून त्यांची रवानगी कत्तलखान्यात करतात. कत्तलखान्यात जनावरांना नेताना पोलिसांनी पकडले तर त्या जनावरांना ठेवायचे कुठे हा प्रश्न पोलिसांपुढे पडतो. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात जनावरांना वाहनात डांबून त्यांची रवानगी कत्तलखान्यात केली जाते. शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात जनावरांची खरेदी करून त्यांना वाहनांत डांबून चारा व पाण्याविना वाहतूक केली जाते. दररोज जिल्ह्यातील १० ते १५ वाहनांत जनावरांना डांबून नले जाते. जनावरांची सर्वाधिक वाहतूक रात्रीच्यावेळी केली जाते. या वाहनांवर पोलीस विभागाकडून कारवाई केली जाते. प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याच्या कायद्यान्वये कारवाई केली जाते. मात्र या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या जनावरांची सोय कशी करावी हा प्रश्न पोलिसांपुढे पडतो. शासनाने एक निर्णय काढून पकडलेल्या जनावरांना कोंडवाड्यात ठेवू नये, त्यांना चारा, पाणी उपलब्ध होईल अशा गौशाळेत ठेवण्याचे सुचविले. परंतु जिल्ह्यात शासकीय एकही गौशाळा नसल्यामुळे कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांना पकडल्यास ठेवायचे कुठे हा मोठा प्रश्न पोलिसांपुढे पडतो.शासनाने हा निर्णय काढण्यापूर्वी जप्त केलेली जनावरे कोंडवाड्यात ठेवण्यात येत होती. मात्र जप्त करण्यात आलेल्या जनावरांना कोंडवाड्यात चारा व पाणी मिळत नव्हता त्यामुळे उपासमारीने अनेक जनावरांचा मृत्यू होत होता. ही बाब शासनाच्या लक्षात आल्याने शासनाने जनावरांना कोंडवाड्यात न ठेवता गौशाळेत ठेवण्याच्या सूचना केल्या. मात्र जिल्ह्यात एकही शासकीय गौशाळा नसल्याने पोलिसांची इकडे ाड व तिडके विहीर अशी स्थिती झाल्याचे दिसून येत आहे. अशात पकडलेली जनावरे ठेवायची कोठे हा प्रश्न पडत आहे.