शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारण्याची आहे गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:00 IST

भारतीय किसान संघाचे प्रांतीय तिसरे अधिवेशन गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे. किसान संघाच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अधिवेशनात घेतलेल्या ठरावांबाबत माहिती देत होते. वैनगंगा ते पैनगंगा या दोन नद्यांना जोडून सहा जिल्ह्यांचा सिंचनाचा प्रश्न संपुष्टात येऊ शकतो. या दोन्ही नद्यांना जोडणारा प्रकल्प उभारण्याची गरज आहे. विदर्भात सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, या उद्देशाने किसान संघाने सिंचन शोध यात्रा राबविली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मराठवाडा किंबहुना महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात सिंचनाचा बॅकलॉग वाढत चालला आहे. फक्त ८ टक्के शेतजमीन सिंचनाखाली आहे, तर ९२ टक्के शेतजमीन कोरडवाहू आहे. त्यामुळे विदर्भात सिंचनाची पर्याप्त व्यवस्था करणे केंद्र व राज्य सरकारला गरजेचे आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भात सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करण्याची गरज आहे, असा ठराव एकमताने शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी पारीत केला. याशिवाय शेतकऱ्यांच्या दशा व दिशा या बाबीवर सविस्तर चर्चा करीत इतर पाच ठराव घेण्यात आले.भारतीय किसान संघाचे प्रांतीय तिसरे अधिवेशन गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे. किसान संघाच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अधिवेशनात घेतलेल्या ठरावांबाबत माहिती देत होते. वैनगंगा ते पैनगंगा या दोन नद्यांना जोडून सहा जिल्ह्यांचा सिंचनाचा प्रश्न संपुष्टात येऊ शकतो. या दोन्ही नद्यांना जोडणारा प्रकल्प उभारण्याची गरज आहे. विदर्भात सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, या उद्देशाने किसान संघाने सिंचन शोध यात्रा राबविली. या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील ४० प्रकल्प अपूर्ण असल्याची माहिती समोर आली. गोसी खुर्द सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाचे फक्त २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. याशिवाय अनेक प्रकल्प रखडली आहेत. म्हणून अपूर्ण प्रकल्पांची कामे पूर्ण करावे व सिंचन क्षेत्रात वाढ करावी, या मागणीचा ठराव प्रामुख्यानेघेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी २४ तास विद्युतपुरवठा करावा, विदर्भात शेतमालावर प्रक्रिया उद्योगाची उभारणी करावी, विदर्भामध्ये प्रामुख्याने भात, संतरा, लिंबू, ऊस, तूर ही पिके घेतली जातात. शिवाय भाजीपाल्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, विदर्भात एकही प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतमाल कवडीमोल भावात विक्री केला जातो. यासाठी विदर्भात केंद्र व राज्य सरकारने प्रक्रिया उद्योगाची उभारणी करावी. 

महागाईमुळे शेती संकटात - व्यवसायाच्या लागवड खर्चामध्ये वाढ होत चालली आहे. मात्र, त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नाही. यामुळे दिवसेंदिवस शेतकरी आर्थिकदृष्ट्या हवालदिल होत चालला आहे. शेतमालाला लागवडीपेक्षा किमान दीडपट अधिक भाव पाहिजे, असे सांगितले. यावेळी प्रांतीय अध्यक्ष राजेश राणे, महामंत्री बाबुराव देशमुख, उपाध्यक्ष बाबाराव कपिले, मावळते अध्यक्ष नानासाहेब आकरे, संघटन मंत्री कैलास ढोले, उपाध्यक्ष पांडुरंग गायकी उपस्थित होते.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र