शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारण्याची आहे गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:00 IST

भारतीय किसान संघाचे प्रांतीय तिसरे अधिवेशन गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे. किसान संघाच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अधिवेशनात घेतलेल्या ठरावांबाबत माहिती देत होते. वैनगंगा ते पैनगंगा या दोन नद्यांना जोडून सहा जिल्ह्यांचा सिंचनाचा प्रश्न संपुष्टात येऊ शकतो. या दोन्ही नद्यांना जोडणारा प्रकल्प उभारण्याची गरज आहे. विदर्भात सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, या उद्देशाने किसान संघाने सिंचन शोध यात्रा राबविली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मराठवाडा किंबहुना महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात सिंचनाचा बॅकलॉग वाढत चालला आहे. फक्त ८ टक्के शेतजमीन सिंचनाखाली आहे, तर ९२ टक्के शेतजमीन कोरडवाहू आहे. त्यामुळे विदर्भात सिंचनाची पर्याप्त व्यवस्था करणे केंद्र व राज्य सरकारला गरजेचे आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भात सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करण्याची गरज आहे, असा ठराव एकमताने शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी पारीत केला. याशिवाय शेतकऱ्यांच्या दशा व दिशा या बाबीवर सविस्तर चर्चा करीत इतर पाच ठराव घेण्यात आले.भारतीय किसान संघाचे प्रांतीय तिसरे अधिवेशन गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे. किसान संघाच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अधिवेशनात घेतलेल्या ठरावांबाबत माहिती देत होते. वैनगंगा ते पैनगंगा या दोन नद्यांना जोडून सहा जिल्ह्यांचा सिंचनाचा प्रश्न संपुष्टात येऊ शकतो. या दोन्ही नद्यांना जोडणारा प्रकल्प उभारण्याची गरज आहे. विदर्भात सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, या उद्देशाने किसान संघाने सिंचन शोध यात्रा राबविली. या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील ४० प्रकल्प अपूर्ण असल्याची माहिती समोर आली. गोसी खुर्द सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाचे फक्त २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. याशिवाय अनेक प्रकल्प रखडली आहेत. म्हणून अपूर्ण प्रकल्पांची कामे पूर्ण करावे व सिंचन क्षेत्रात वाढ करावी, या मागणीचा ठराव प्रामुख्यानेघेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी २४ तास विद्युतपुरवठा करावा, विदर्भात शेतमालावर प्रक्रिया उद्योगाची उभारणी करावी, विदर्भामध्ये प्रामुख्याने भात, संतरा, लिंबू, ऊस, तूर ही पिके घेतली जातात. शिवाय भाजीपाल्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, विदर्भात एकही प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतमाल कवडीमोल भावात विक्री केला जातो. यासाठी विदर्भात केंद्र व राज्य सरकारने प्रक्रिया उद्योगाची उभारणी करावी. 

महागाईमुळे शेती संकटात - व्यवसायाच्या लागवड खर्चामध्ये वाढ होत चालली आहे. मात्र, त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नाही. यामुळे दिवसेंदिवस शेतकरी आर्थिकदृष्ट्या हवालदिल होत चालला आहे. शेतमालाला लागवडीपेक्षा किमान दीडपट अधिक भाव पाहिजे, असे सांगितले. यावेळी प्रांतीय अध्यक्ष राजेश राणे, महामंत्री बाबुराव देशमुख, उपाध्यक्ष बाबाराव कपिले, मावळते अध्यक्ष नानासाहेब आकरे, संघटन मंत्री कैलास ढोले, उपाध्यक्ष पांडुरंग गायकी उपस्थित होते.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र