शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अशक्त दक्षता समित्यांना सक्रिय करण्याची गरज

By admin | Updated: June 11, 2014 00:07 IST

राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याकरिता गावागावात दक्षता समित्या गठित करण्यात आल्या आहेत. मात्र तालुक्यातील दक्षता समित्यांमध्ये गावातील शासकीय स्वस्त धान्य

रावणवाडी : राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याकरिता गावागावात दक्षता समित्या गठित करण्यात आल्या आहेत. मात्र तालुक्यातील दक्षता समित्यांमध्ये गावातील शासकीय स्वस्त धान्य वितरकाच्या मर्जीतील लोकांचा भरणा करण्यात आल्याने समित्या अशक्त झाल्या आहेत. स्वस्त धान्य दुकानात अनेक घोटाळे केले जातात. पण ते प्रकार कधीच सामान्य नागरिकांना कळून येत नाही. या पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना माहिती असूनसुध्दा याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेतील दक्षता समित्या स्थापन करण्याचा हेतू काय, असा सवाल गावागावातील सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत. शासकीय स्वस्त धान्य दुकानातून गरजू लाभार्थ्यांना धान्याचा आणि इतर वस्तूंचा पुरवठा योग्य प्रमाणात नियमित होते किंवा नाही. शिधापत्रिका धारकांना योग्य भावात धान्य दिले जाते किंवा नाही आदी बऱ्याच लहान-मोठ्या गोेष्टींवर विशेष लक्ष ठेवण्याकरिता राज्य शासनाचा अन्न नागरी पुरवठा विभाग व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयान्वये जिल्हास्तरावर, नगर पालिका स्तरावर व गावस्तरावर सदर समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले. गावस्तरावरील दक्षता समित्यांमध्ये गावचा सरपंच पदसिध्द अध्यक्ष तर गावचा तलाठी त्या समितीचा सचिव असतो. पोलीस पाटील, ग्रामसेवक, अनुसूचित जाती-जमातीमधील सदस्य, महिला सदस्य आणि इतर सदस्य मिळून १० च्या संख्येत सदस्यांचा कार्यकारिणीत समावेश करण्याचे निर्देश आहेत. दक्षता समितीची कार्यकारिणी तयार करताना अशासकीय सदस्यांची निवड ग्रामसेवकाच्या शिफारसीनुसारच निवड करणे बंधनकारक आहे. तसे आदेश तालुक्याच्या तहसीदलारांना पारित करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र जिल्ह्यात दक्षता समित्या स्थापन करण्याचा शासनाच्या निर्देशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. शासकीय स्वस्त धान्य दुकानदार ग्रामसेवकाला आपल्या हाताशी घेऊन दक्षता समितीत आपल्या पसंतीच्या व्यक्तींनाच स्थान देतो. मात्र दक्षता समित्यांचे सदस्य राहूनही सदस्यांना आपण दक्षता समितीमध्ये समाविष्ट आहोत, याची कल्पनासुध्दा त्यांना नसते. ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा घेऊन दक्षता समित्या स्थापन करणे बंधनकारक होते. परंतु शासनाचा या नियमांना बगल देऊन बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये दक्षता समित्यांची स्थापनाच करण्यात आली नसल्याचे सामान्य नागरिकांकडून बोलल्या जात आहे. ग्रामपंचायत स्तरावरील बहुतेक दक्षता समित्या फक्त कागदोपत्रीच असल्याचे नागरिकांना जाणवते. गरजू शिधा पत्रिकाधारकांना वितरणाकरिता येणारा रेशन किती प्रमाणात वितरीत करण्यात आला, किती प्रमाणात उर्वरित आहे, याची साधी पाहणीसुध्दा समित्यांकडून करण्यात येत नाही. त्यामुळे रेशन विक्रेत्यांचे चांगलेच फावते. रेशन वितरक काही ठराविक वेळेत रेशन वाटप करून उर्वरित रेशन खुल्या बाजारात विकतात. याकडे स्थानिक पुरवठा विभागाने जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. तेव्हाच सार्वजनिक वितरण व्यवस्थेत होणाऱ्य काळाबाजारावर अंकुश ठेवणे सोईस्कर होईल. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये समिती स्थापन केल्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्याची जाणीव करून समिती सक्रिय करणे, तेवढेच गरजेचे झाले आहे. (वार्ताहर)