शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

ग्रीन यादीत जिल्ह्यातील ४६ हजार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 22:19 IST

दोन दिवसांपूर्वी बँकेने जिल्ह्यातील ३९ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने कर्जमाफीच्या ग्रीन यादीत ४६ हजार २८३ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आल्याचे जाहीर केले.

ठळक मुद्देप्रशासनाने जाहीर केली यादी : लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दोन दिवसांपूर्वी बँकेने जिल्ह्यातील ३९ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने कर्जमाफीच्या ग्रीन यादीत ४६ हजार २८३ शेतकºयांचा समावेश करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे ऐवढ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी शासन विविध योजना, उपक्र म व अभियान राबवित आहे. विविध प्रयोग शेतीत करून शेतकºयांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहुतांश शेती ही वरथेंबी पाण्यावर अवलंबून आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटातील शेतकऱ्यांना कर्जाच्या जोखडातून मुक्त करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण निर्णय घेवून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून केली आहे.कर्जमाफी योजनेतंर्गत जिल्ह्यातील ४६ हजार २८३ शेतकऱ्यांचा ग्रीन यादीत समावेश करण्यात आला आहे. १४ हजार २२ शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. तर ३ हजार ९५ शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे १ एप्रिल २०१९ ते ३० जून २०१६ पर्यंतच्या दीड लाख रूपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ होणार आहे. ज्या शेतकºयांनी सन २०१५-१६ व सन २०१६-१७ या कालावधीमध्ये पिक कर्जाची विहीत मुदतीत कर्जफेड केली आहे.अशा शेतकºयांना घेतलेल्या कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार रुपये यापैकी कमी असलेल्या रक्कमेचा प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. पात्र शेतकºयांना योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही प्रक्रि या सुरूच राहणार आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही मुख्यत: शेतीवर अवलंबून आहे. शेतीसाठी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी आणि पिकांची लावणी व कापणी करण्यासाठी खर्च येत असल्यामुळे शेतकरी बँकांचे कर्ज घेतात. कधी अतिवृष्टी, गारपीट, वादळ, रोगराई, तर कधी दुष्काळी स्थितीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.१३१ बँक शाखेतून प्रक्रियाजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३१ शाखा, विदर्भ-कोकण ग्रामीण विकास बँकेच्या २२ शाखा आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या ७८ शाखा अशा एकूण १३१ बँक शाखेतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे.उर्वरित २७ हजार शेतकऱ्यांचे कायसुरूवातीला बँका आणि सहकार निबंधक कार्यालयाने जिल्ह्यातील ७३ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र यापैकी अंतीम: केवळ ४६ हजार शेतकरी पात्र ठरल्याचे जाहीर केले. त्यामुळे उर्वरित २७ हजार शेतकऱ्यांचे काय असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी