शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दरोडेखोरांनी केला सात लाखांचा माल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST

डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक-१७, प्रगती कॉलनी, आर. के. पेट्रोल पंपासमोर सोमवारी (दि. ४) मध्यरात्री १ ते ३.३० च्या दरम्यान आरोपींनी मनीष गुरूप्रसाद गुप्ता (वय ५२, रा. प्रगती कॉलनी) यांच्या पत्नी व मुलीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल तसेच बेडरूममधील लाकडी आलमारीतील रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल  असा ३ लाख ८४ हजार रुपयांचा माल चोरून नेला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सडक-अर्जुनी शहरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्रीत दोन घरफोड्या व एका ठिकाणी दरोडा घालून सात लाख सात हजार रुपयांचा माल पळवून नेला आहे. लोखंडी रॉडचा धाक दाखवून त्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लुटून नेली. या कृत्यात सात आरोपींचा समावेश आहे. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक-१७, प्रगती कॉलनी, आर. के. पेट्रोल पंपासमोर सोमवारी (दि. ४) मध्यरात्री १ ते ३.३० च्या दरम्यान आरोपींनी मनीष गुरूप्रसाद गुप्ता (वय ५२, रा. प्रगती कॉलनी) यांच्या पत्नी व मुलीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल तसेच बेडरूममधील लाकडी आलमारीतील रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल  असा ३ लाख ८४ हजार रुपयांचा माल चोरून नेला. तेथीलच पुष्पकला पुरषोत्तम बोरकर (५६) यांच्या घरासमोरील दाराचे कुलूप तोडून दोन लाख १४ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला. त्यांच्या घरासमोरील धनराज शंकर डहारे (३८) यांच्या घरासमोरील दाराचे इंटरलॉक तोडून एक लाख आठ हजार ५०० रुपयांचा माल असा एकूण सात लाख सात हजार रुपयांचा माल चोरून नेला. यासंदर्भात सातजणांवर डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ३९५, ४५७, ३८०, ४२७ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलीस निरीक्षक सचिन वांगळे करीत आहेत.

नागपूरवरून परतताच सातजणांनी लुटले -  सोमवारी रात्री १२.३० वाजतादरम्यान मनीष गुप्ता हे परिवारासह नागपूर येथून घरी परतले असता, दोनजण  हातात रॉड घेऊन त्यांच्या घरासमोरील पोर्चमध्ये दिसले. गुप्ता यांनी कोण आहात, असे विचारल्यावर त्याचवेळी त्यांच्या घरातून आणखी पाचजण बाहेर आले. त्या सातजणांनी लोखंडी रॉडने त्यांच्या गाडीच्या काचा फोडून गाडीचे नुकसान केले. तसेच गाडीत बसलेल्या त्यांच्या पत्नी व मुलीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. डुग्गीपार पोलीस सुस्त; चोर चुस्त...- सडक-अर्जुनी शहरात डुग्गीपार पोलिसांची गस्त होत नसल्याने याचा फायदा दरोडेखोरांनी घेतला. डुग्गीपार पोलीस सुस्त असल्याने दरोडेखोरांनी एकाच रात्री सात लाखांहून अधिक रुपयांची मालमत्ता लुटून नेली. कुणी कॉल केला, तरी पोलीस ठाण्याचा क्रमांक कुणी उचलत नाही. ठाणेदारांना, वरिष्ठांना खूश करण्यासाठीच वेळ कमी पडतो, यात गस्त कोण घालणार? असा सवाल नागरिक करीत आहे. सडक-अर्जुनी येथे झालेल्या एका रात्रीत तीन चोरीच्या घटनांमुळे नागरिक धास्तावलेले असून, ठाणेदारांची बदली करण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी