शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पाऊस थांबला, फरक वाढला, आता सरासरी १०९ मिमीची तूट

By कपिल केकत | Updated: August 7, 2023 19:38 IST

शुक्रवारी होती ७७.९ मिमीवर

गोंदिया : बुधवार ते शुक्रवारपर्यंत संततधार बरसलेल्या पावसामुळे यंदाची तूट भरून निघत होती. मात्र, शुक्रवारनंतर परत पावसाचा लहरीपणा सुरू झाला व पाऊस थांबताच हा फरक वाढत चालला आहे. शुक्रवारी (दि. ४) तुटीचा फरक ७७.९ मिमी होता. मात्र, आता त्यात वाढ झाली असून, सोमवारी (दि. ७) हाच फरक वाढून १०९ मिमीवर गेल्याचे दिसले.

यंदा सर्वच ऋतू लहरीपणा करताना दिसत आहेत. उन्हाळ्याने जून महिन्याच्या शेवटपर्यंत पिच्छा सोडला नाही. त्यानंतर कोठे जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात पावसाळा सुरू झाला. जुलै महिन्यात पावसाने साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांना खरिपाचा हंगाम घेता येणार असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मात्र, सुरुवातीपासून पावसाने हजेरी न लावल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाऊस तुटीचा ठरला. सुरुवातीपासून पडलेली ही तूट भरता भरत नव्हती. मात्र, बुधवारपासून (दि. २) पावसाने संततधार सुरू केली व थेट शुक्रवारपर्यंत (दि. ४) झड लागली होती.

या संततधार पावसामुळे शुक्रवारी हा फरक सरासरी ७७.९ मिमीवर आला होता. यानंतर आता ही तूट भरून निघणार असे वाटत होते. मात्र, शुक्रवारनंतर पावसाने उघाड दिली व मधामधात हजेरी लावणे सुरू केले. यामुळे हा फरक परत एकदा वाढला असून, सोमवारी (दि. ७) सरासरी १०९ मिमी एवढा हा फरक दिसून आला.

आतापर्यंत सरासरी ६९३.१ मिमी. पावसाची नोंद

जिल्ह्यात सोमवारपर्यंत सरासरी ६९३ मिमी पाऊस बरसल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील वर्षी या दिवसापर्यंत म्हणजेच, ७ ऑगस्टपर्यंत सरासरी ८०२.६ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. म्हणजेच, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी १०९ मिमी पाऊस कमी बरसला आहे. मागील वर्षी दमदार बरसलेल्या पावसामुळे यंदा पाणी टंचाई भासली नाही. शिवाय, शेतकऱ्यांना रब्बीचा हंगामही घेता आला. अशात यंदासुद्धा ही तूट भरून निघणे गरजेचे आहे.