शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अन् त्यांनी चक्क विमानतळाच्या प्रवेशव्दारासमोरच केले घराच्या बांधकामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 12:42 IST

मंगळवारी बिरसी विमानतळाच्या प्रवेशव्दारासमोरील जागेवर घराच्या बांधकामाचे भूमिपूजन करुन कामाला सुरुवात केली. यावेळी प्रकल्पग्रस्तांचे कुटुंबीयसुध्दा उपस्थित होते. मात्र, यानंतरही प्रशासनातर्फे कुठलीच हालचाल करण्यात आली नाही.

ठळक मुद्देविमानतळ परिसरात तणावाचे वातावरण उद्यापासून उभारणार टेंट

खातिया (गोंदिया) : मागील पंधरा वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याच्या नावावर वेळ मारुन नेण्याच्या धोरणामुळे कंटाळलेल्या बिरसी येथील १०६ प्रकल्पग्रस्तांनी कंटाळून अखेर मंगळवारी (दि. २२) बिरसी विमानतळाच्या प्रवेशव्दारासमोरील मोकळ्या जागेवर घराच्या बांधकामाचे भुमिपूजन करुन कामाला सुरुवात केली. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला होता.

गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळामुळे प्रकल्पग्रस्त झालेली १०६ कुटुंब मागील पंधरा वर्षांपासून पुनर्वसनाची वाट पाहत आहेत. यासाठी त्यांनी अनेकदा जिल्हा प्रशासन व बिरसी विमानतळ प्राधिकरणाला अनेकदा निवेदन दिले. पण, त्यांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आले नाही. परिणामी त्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.

आपल्या हक्काचा निवारा हिरावल्याने मागील पंधरा वर्षांपासून झोपड्यांमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. पण, या घरांची स्थितीसुद्धा आता बिकट झाली असून, ते केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर दुसरीकडे या प्रकल्पग्रस्तांना शासनाने घरे बांधण्यासाठी प्लाॅट उपलब्ध करून दिले नाहीत, तर ते कधी उपलब्ध करून देणार, याबाबत कुठलेच आश्वासन दिले नाही. त्यामुळे अजून किती दिवस असे जीवन जगायचे, असा सवाल करीत प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी विमानतळाच्या प्रवेशव्दारासमोरील जागेवर घराच्या बांधकामाचे भूमिपूजन करुन कामाला सुरुवात केली. यावेळी प्रकल्पग्रस्तांचे कुटुंबीयसुध्दा उपस्थित होते. मात्र, यानंतरही प्रशासनातर्फे कुठलीच हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे बुधवारपासून विमानतळाच्या परिसरात टेंट उभारुन त्यात राहण्यास सुरुवात करू, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

सर्व लोकप्रतिनिधींची केवळ पोकळ आश्वासने

विमानतळामुळे प्रकल्पग्रस्त झालेल्यांना मागील पंधरा वर्षांपासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून केवळ पोकळ आश्वासने देऊन वेळ मारुन नेली जात आहे. त्यामुळे या दोघांवर आता आपला विश्वास राहिला नसल्याचे सांगत प्रकल्पग्रस्तांनी संताप व्यक्त केला. तसेच यापुढची लढाई स्वत:च्या भरवशावर लढू, असे सांगितले.

प्रकल्पग्रस्तांना प्लाॅट देण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अद्याप आमचे पुनर्वसन झाले नाही. घरे बांधण्यासाठी जागा केव्हा उपलब्ध करून देणार, हे अद्याप प्रशासनाने स्पष्ट सांगितले नाही. त्यामुळे याबाबत प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा.

- प्रकल्पग्रस्त

टॅग्स :Airportविमानतळagitationआंदोलन