शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

चक्क मृताच्या नावे मंजूर केले घरकुल; नवेगावबांध ग्रामपंचायतीमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 13:06 IST

या प्रकरणाची चौकशी करुन दाेषींवर कारवाई करावी, अशी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत म्हणते मृतकाला नव्हे त्यांच्या वारसाला घरकुल

नवेगावबांध (गोंदिया) : नवेगावबांध ग्रामपंचायती अंतर्गत पंतप्रधान आवास योजना सन २०१९ - २०मध्ये श्री रामकृष्ण इस्तारी पुराम यांना घरकुल मंजूर करण्यात आले. परंतु त्यांचा १२ ऑगस्ट २०१३ रोजी मृत्यू झाला आहे. मग ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांनी ग्रामसभा ठराव क्रमांक ११ नुसार २९ ऑगस्ट २०१६ रोजी तब्बल तीन वर्षानंतर ठराव घेऊन पंतप्रधान आवास योजनेत निवड करून लाभ दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या व्यक्तीचे जुने घर क्रमांक ८१७ वाॅर्ड क्रमांक २ मध्ये आहे. नवेगावबांध येथील उपसरपंचांच्या वॉर्डात आहे. मात्र, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचे बांधकाम न करताच सर्व निधीची उचल करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे सरपंचाच्या गावातील मृत व्यक्तीचे घर चोरीला गेले असून, त्याचा शोध आता स्वर्गात जाऊन घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दाेषींवर कारवाई करावी, अशी मागणी चंद्रभान बर्वे यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. तर प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गोंदिया यांच्याकडून गटविकास अधिकारी अर्जुनी मोरगाव यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याची निर्देश दिले आहेत. ग्रामपंचायत अधिनियमाची पायमल्ली करणाऱ्या सरपंच व सचिवावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारकर्त्याने केली आहे.

मृतक व्यक्तीच्या नावे घरकुल मंजूर झाले असल्यास त्यांच्या वारसदाराला घरकुल देण्याचा नियम शासकीय जीआरमध्ये आहे. याबाबत सर्व तपासणी करण्याचे अधिकार पंचायत समिती स्तरावरील अधिकाऱ्यांना असून, या प्रकरणांमध्ये ग्रामपंचायतीचा कुठलाही संबंध येत नाही.

- पी. आर. चव्हाण, सचिव, ग्रामपंचायत, नवेगावबांध.

मृत व्यक्तीचे नाव यादीमध्ये होते व वारसदारांनी मागणी केल्यानंतर त्या व्यक्तीचे घरकुल वारसदारांना देण्याची तरतूद असल्यामुळे ते घर त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे मृत व्यक्तिला घरकुल नसून ते त्यांच्या वारसाला दिलेले आहे. सर्व प्रक्रिया ही नियमानुसारच करण्यात आली आहे. तक्रारकर्त्यांनी केलेले आरोप हे तथ्यहीन आहेत.

-अनिरुद्ध शहारे, सरपंच, ग्रामपंचायत, नवेगावबांध

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत