शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

२०४७ मध्ये विकसित नवभारताचे स्वप्न पूर्ण होणार !

By अंकुश गुंडावार | Updated: February 11, 2024 19:11 IST

उपराष्ट्रपती जगदीप धनखड : गोंदिया येथे मनोहरभाई पटेल जयंती सोहळा.

 गोंदिया : जगातील अर्थव्यवस्थेत भारत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. तर पुढील दोन तीन वर्षांत भारत तिसऱ्या क्रमांकावर राहणार असून जर्मनी आणि जपानच्या सुध्दा पुढे गेलेला असेल. भारताचा झपाट्याने विकास होत असून भारत देश एक महासत्ता म्हणून जगात पुढे येत आहे. मिशन २०४७ विकसीत भारताचे स्वप्न पुर्ण करण्याच्या दृष्टीने महामॅरेथॉनला सुरुवात झाली असून विकसीत भारताचे स्वप्न पुर्ण होवून नवा भारत निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

गोंदिया-भंडारा जिल्ह्यांचे शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवारी (दि. ११) स्थानिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, डॉ. सुदीप धनखड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय व उच्च तंत्रशिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, खा. प्रफुल्ल पटेल, खा. श्रीकांत शिंदे, खा. एम.रमेश, खा. राहूल कासलीवाल, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल उपस्थित होते. मनोहरभाई पटेल यांच्या तैलचित्राला मार्ल्यापण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, मागील दहा वर्षांत देशाने झपाट्याने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळे भारत देश एक महासत्ता म्हणून पुढे येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात असून यातून सर्वसामान्यांच्या जीवनात बदल होत आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल झाला तर खऱ्या अर्थाने देशाचा विकास होतो. त्याच दृष्टीने आपल्या देशाची वाटचाल सुरु आहे. शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांमुळे स्वत:चा उदरनिर्वाह कसा होईल असा विचार करणार व्यक्ती आता इतरांना रोजगार देत असल्याचे चित्र आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सर्वसामान्यांची वास्तविकता जाणून त्या दृष्टीने काम करणारे असल्याने २०४७ मध्ये विकसीत आणि नव भारताचे स्वप्न नकीच होईल यात कुठलेही दुमत नसल्याचे ते म्हणाले....................................

धानाचे मुल्यवर्धन होणे गरजेचेशिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांचे शिक्षण क्षेत्रासह कृषी आणि सिंचन क्षेत्रात सुध्दा व्यापक योगदान आहे. गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा असून येथे दर्जेदार प्रतिचा तांदूळ होतो. त्याच्या विविध प्रजातींची माहिती सुध्दा मला येथील कृषी प्रदर्शनीला भेट दिल्यानंतर मिळाली. धानावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची स्थापना करुन धानाचे मुल्यवर्धन केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचा आर्थिकस्तर सुधारण्यास निश्चित मदत होईल म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केले.

.............................मनोहरभाई पटेल भवनसाठी ३० कोटींची घोषणा

गोंदिया येथील नगर परिषदेच्या परिसरात मनोहरभाई पटेल भवन उभारण्यासाठी ३० कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. तसेच गोंदिया भंडारा जिल्ह्यातील विकासात्मक कामासाठी निधीची कमी पडू देणार नसून विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही दिली..................................

महायुतीत जाण्याचे संकेत मागच्यावर्षीच दिले होतेमागील वर्षी ९ फेब्रुवारी मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. तेव्हाच आम्ही अप्रत्यक्षपणे महायुतीत सहभागी होणार असल्याचे संकेत दिले होते. पण ते अनेकांना ते कळले नाही. महायुतीच्या माध्यमातून गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अनेक विकासात्मक कामे भविष्यातही सुरुच राहतील असे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले.

टॅग्स :gondiya-acगोंदिया