शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

परदेशी पाहुण्यांचे आगमन लांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2022 22:35 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यावर निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. येथे नवेगावबांध तलाव, इटियाडोह धरण व सिरेगावबांध हे मोठे तलाव आहेत. तलावांची संख्या भरपूर आहे. येथील हिवाळा ऋतूतील वातावरण पक्ष्यांना पोषक असे आहे. खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सर्व बाबी पोषक असल्याने विदेशी पक्षी स्थलांतर करीत येथे दरवर्षी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. त्यांचे आगमन साधारणतः ऑक्टोबर महिन्यात होते.

संतोष बुकावनलोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : पोषक वातावरण व खाद्याच्या आकर्षणामुळे परदेशी पाहुणे आकाशातून उडत-उडत जिल्ह्यातील जलाशयांवर साधारणतः ऑक्टोबर महिन्यात दाखल होतात. मात्र, या वर्षी त्यांचे आगमन लांबले आहे. पानवठ्यावर केवळ तुरळक प्रजातीच्या पक्ष्यांचेच आगमन झाले आहे. अनेक पाणवठ्यांवर तर अद्याप पक्षी आलेच नाहीत. परदेशी पाहुण्यांचे आगमन का लांबले, हा प्रश्न पक्षी निरीक्षक व अभ्यासकांना पडला आहे. जे स्थलांतरित पक्षी आले आहेत ते सध्या लक्ष वेधून घेत आहेत. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानानजीकच्या बीड-भुरसीटोला तलावावर शेकडोंच्या संख्येत पक्षी दाखल झाले आहेत.अर्जुनी-मोरगाव तालुक्यावर निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. येथे नवेगावबांध तलाव, इटियाडोह धरण व सिरेगावबांध हे मोठे तलाव आहेत. तलावांची संख्या भरपूर आहे. येथील हिवाळा ऋतूतील वातावरण पक्ष्यांना पोषक असे आहे. खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सर्व बाबी पोषक असल्याने विदेशी पक्षी स्थलांतर करीत येथे दरवर्षी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. त्यांचे आगमन साधारणतः ऑक्टोबर महिन्यात होते. ते ज्या प्रदेशात वावरतात तेथील कडक हिवाळा, बर्फवृष्टी व खाद्याची कमतरता यामुळे ते स्थलांतर करतात. भरपूर खाद्य व पोषक वातावरणाच्या शोधात ते भारतासारख्या समशीतोष्ण प्रदेशात साता समुद्रापार येऊन राहतात. प्रतिकूल परिस्थितीत जगणे, प्रजननातील अडचणी हेसुद्धा स्थलांतराचे एक कारण मानले जाते.स्थलांतरित पक्षी युरोप, सायबेरिया, मंगोलिया तसेच हिमालयाकडून भारतात प्रवेश करतात. जलाशय व पाणवठ्यावरील पक्ष्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप होत असल्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याचे दिसून येते. गतवर्षी चोरखमारा तलावात विषारी खाद्य व जल प्राशनामुळे पक्षी मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली होती. तलाव व जलाशयांच्या काठावर शेतीचे अतिक्रमण वाढले आहे. या शेतीत होणाऱ्या विषारी कीटकनाशक द्रव्यांचे सेवन केल्यानेही पक्षी मृत्युमुखी पडतात. प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करीत असल्याचे जाणवते. काही भागात विदेशी पक्ष्यांची शिकारसुद्धा होत असते. याकडे प्रशासनाने कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे.

पक्षी हा जीव आहे. विज्ञान विषयाच्या अभ्यासाचा एक भाग आहे. हजारो मैल स्थलांतर करून ते आपल्या देशात क्षणिक वास्तव्यास येतात. यामुळे आकर्षण वाढते. पक्षी अभ्यासक व पक्षिप्रेमींसाठी हा काळ पर्वणी ठरतो. त्यांच्या संरक्षणाची सुजाण नागरिक म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे. यापासून आपले कोणतेही नुकसान नाही. एक कर्तव्य म्हणून पक्षी संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे.                  - प्रा. अजय राऊत, पक्षी अभ्यासक, अर्जुनी-मोर.या वर्षी पावसाळा लांबला आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस लांबल्याने शेतीची कामेसुद्धा लांबली. पाहिजे त्या प्रमाणात  थंडी सुरू झाली नाही. आपल्या तालुक्यातील विविध पानवठ्यांवर अनेक प्रजातींचे पक्षी दाखल होतात. कदाचित या कारणांमुळेच स्थलांतरित पक्ष्याचे आगमन झाले नसावे. या वर्षी त्यांचा उशिरा मुक्कामसुद्धा वाढू शकतो.- प्रा. डॉ. शरद मेश्राम, पक्षी अभ्यासक, अर्जुनी-मोर

दरवर्षी या पक्ष्यांचे होते आगमन- तालुक्याच्या विविध पाणवठ्यांवर यंदा पिंटेल व ग्रे लग गुज या पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. केवळ या दोनच प्रजातींचे पक्षी सध्यातरी दिसून येत आहेत. यासोबतच दरवर्षी पिटलेस, कॉमन पोचार्ड, व्हाईट आय पोचार्ड, युरेशियन विजन, मलार्ड गार्गणी, कोंब डक, लेसर विसलिंग डक, कुडस, विजन, गार्गणी, युरोप, आशिया, जपान व चीन देशात आढळणारे कॉमन टिल तसेच युरोप, आशिया व अमेरिकेत आढळणारे पिंटेल, टपटेल, पोचार्ड, लिटल ग्रेब, वुडसॅड पायपर (छोटी तुतवार), युरेशियन कर्लू, लिटिल स्टिंट, रिंगप्लेवर, मार्स हेरीयर, पेंटेड स्नाईप, कोम्बडक (नाकेर) आदी प्रजातींचे पक्षी आपल्या परिसरात येतात. मात्र, त्यांचे आगमन अद्याप झालेले नाही.

 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य