शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘धादरी’ गाव तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:20 IST

उन्हाळ्याची धग आता जाणवू लागली आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू झाली. मात्र तिरोडा तालुक्यातील धादरी येथे पाण्याचा मुबलक साठा असूनही पाणीपुरवठा योजना बंद असल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा योजना बंद : बोअरवेलमधून येते पिवळसर पाणी, महिलांची पायपीट

देवानंद शहारे।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळ्याची धग आता जाणवू लागली आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू झाली. मात्र तिरोडा तालुक्यातील धादरी येथे पाण्याचा मुबलक साठा असूनही पाणीपुरवठा योजना बंद असल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. प्रशासनासह पदाधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष असल्याने गावकऱ्यांमध्ये चांगलाच रोष व्याप्त आहे.धादरी-उमरी येथे सन २०१४-१५ मध्ये ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरूवात करण्यात आली. वाहत्या नाल्याला समांतर भागातच पाण्याची टाकी तयार करण्यात आली. टाकीच्या नळांचे व पाईप लाईनचे कार्यसुद्धा त्याच काळात पूर्ण झाले. उरलेले कार्य सन २०१५-१६ मध्ये पूर्ण करण्यात आले. तब्बल दोन वर्षांनी पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम पूर्ण झाले. आता आपल्या घरापर्यंत पाणी पोहचेल. त्यामुळे पायपीट थांबेल, अशी आशा महिलांसह गावकऱ्यांमध्ये होती. त्यानुसार सन २०१७ च्या जून महिन्यात पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, केवळ पंधरा दिवस पाणी पुरवठा केल्यानंतर पाणी पुरवठा योजनाच बंद झाली. तेव्हापासून आजतागायत पाणी पुरवठा योजना बंदच आहे. वर्षभरापेक्षा अधिक काळापासून योजना बंद असल्याने आता गावकऱ्यांना बोअरवेलमधून पाणी काढून पाणी प्यावे लागत आहे. बोअरवेलला पिवळसर पाणी येत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धादरी-उमरी गावातून मोठा नाला वाहतो. नाल्यात पाण्याचा मुबलक साठा आहे. याच पाण्यावर अनेक शेतकरी दुबार पीकसुद्धा घेतात. पाणी पुरवठा योजना यशस्वी व्हावी, गावकऱ्यांना पाण्याचा तुटवडा जाणवू नये, म्हणूनच थेट नाल्याच्या पात्रातच टाकीचे निर्माण करण्यात आले. मात्र थातूरमातूर काम झाल्याने योजना अल्पावधीत बंद पडल्याची चर्चा गावात रंगली आहे. शासनाने जलयुक्त शिवार ही योजना राबवून गावकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी मोठा निधी सुद्धा देण्यात आला. धादरी-उमरी येथील योजनेसाठी शासनाचे लाखो रूपये खर्च झाले. परंतु प्रशासनाचे वेळकाढू धोरण व पदाधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे शासनाच्या लाखो रूपयांवर पाणी फेरले आहे. या संदर्भात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता कुठलेच उत्तर मिळत नसल्याची तक्रारसुद्धा गावकºयांनी केली आहे. योजनेची चौकशी करून तात्काळ सुरूवात करण्याची मागणी गावकºयांची आहे.प्रकल्पाचे दूषित पाणीधादरी-उमरी येथून वाहणाऱ्या नाल्यात वीज प्रकल्पाचे पाणी सोडले जाते. हेच पाणी नळ योजनेच्या टाकीमध्ये झिरपते. विशेष म्हणजे प्रकल्पाच्या पाण्यामुळे अनेकवेळा नाल्यातील मासे मेलेली आढळत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेवर पाणी शुद्धीकरण यंत्र लावण्याची गरज आहे. नळ योजना सुरू असताना गढूळ पाणी आले असल्याचे सुद्धा गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी वीज प्रकल्पाने या ठिकाणी फिल्टर अथवा आरओ लावण्याची मागणी करीत प्रकल्पाच्या वेळकाढू धोरणावरसुद्धा गावकºयांनी रोष व्यक्त केला आहे.पाण्यासाठी जीव द्यायचा का?वयाची पंच्याहत्तरी उलटली. घरात दोघेच पतीपत्नी आहेत. त्यातही पत्नी आजारी आहे. अशात घरातील सर्वच कामाची जबाबदारी पार पाडत या वयात शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागते. नळाला पाणी येत नसल्याने बोअरवेलवरून भर उन्हात पाणी आणताना धापा लागतात. प्रसंगी पिण्यासाठी सहा किलोमीटर अंतरावरील तिरोडा येथून पाणी विकत आणावे लागते. या संदर्भात अनेकवेळा ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करूनही ग्रामपंचायतीकडून योग्य उत्तर मिळत नाही. आता पाण्यासाठी जीव द्यावा का? असा सवाल सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक ताराचंद चव्हाण यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Waterपाणी