शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
4
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
5
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
6
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
7
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
8
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
9
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
10
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
11
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
12
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
13
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
14
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
15
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
16
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
17
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
18
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
19
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
20
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षांपासून खळबंदा जलाशय वनवासात

By admin | Updated: July 16, 2014 00:15 IST

गोंदिया तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प खळबंदा जलाशय ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षापासून खळबंदा जलाशयात धापेवाडा प्रकल्प टप्पा दोनचे पाणी पाईपव्दारे पोहचण्यात यावे,

परसवाडा : गोंदिया तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प खळबंदा जलाशय ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षापासून खळबंदा जलाशयात धापेवाडा प्रकल्प टप्पा दोनचे पाणी पाईपव्दारे पोहचण्यात यावे, अशी मागणी तिरोडा तालुक्यातील अर्जुनी, चांदोरी खुर्द व जलाशयाअंतर्गत येत असलेल्या गावांतील नागरिकांनी केली आहे. लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे जलाशयाची पाईप लाईन अजूनही अपूर्ण आहे. खळबंदा जलाशय हे ब्रिटीशकालीन आहे. या जलाशयापासून पूर्वीच्या काळात चांदोरी खुर्दपर्यंत पाणी जात होते. मुबलक सिंचन होत होते. भाजपा-सेनेच्या काळात तत्कालीन पाटबंधारे मंत्री महादेवराव शिवणकर यांनी पुजारीटोला धरणाचे पाणी खळबंदा जलाशयात सोडण्यासाठी कालवे तयार केले. कोट्यवधी रुपये वाया गेले व एक थेंब पाणी कालव्याने गेले नाही. केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल असताना धापेवाडा टप्पा दोनचे पाणी पाईप लाईनव्दारे टाकण्याचे आश्वासन दिले होते. पण पाईप अपुर्ण असल्यामुळे मृतावस्थेत पाईपलाईन पडून आहे. धापेवाडा टप्पा दोन बॅरेजचे लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजीत पवार आले होते. प्रफुल्ल पटेल यांनी जून महिन्यात खळबंदा जलाशयात पाणी सोडले जाईल, काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले होते. पण राज्य शासनाने पाठपुरावा केला नसल्याने काहीच झाले नाही. तत्कालीन आ.दिलीप बन्सोड यांनी पाणी जलाशयात पाच वर्षातच मिळेल, अशी खात्री दिली होती. पण समोर संधी न मिळाल्याने त्यांनी ही वरिष्ठाच्या माथ्यावर मारले. नवनिर्वाचित खासदार, आमदार असताना बोट दुसऱ्याकडे दाखवित होते. आंदोलन मोर्चे काढीत होते पण निवडून आल्याच्या दिवशीपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी दुष्काळावर एकही शब्द निघाला नाही.निसर्गाच्या भरवशावर राहून खरीप पिके घेऊनच आपला उदरनिर्वाह येथील शेतकऱ्यांना चालवावा लागतो. उन्हाळ्याच्या दिवसात रोजगाराच्या शोधात जिल्ह्यातील शेतकरी नागपूर, मुंबई, गुजरात, तेंदूपत्ता व मोठ्या शहराच्या ठिकाणी जावे लागते. सिंचनाची नियमित सोय झाल्यास गावातच काम मिळाले असते. शेतकरी सुजलाम, सुफलाम झाला असता, जिल्ह्यात आमदार, खासदार, केंद्रात व राज्यात वजन आहे. पण कुणीही मनाला लावून घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. फक्त निवडणुकीच्या काळात आश्वासन व्यतिरीक्त काहीच पदरात पडत नाही. ही वस्तुस्थिती पुढे येत आहे. खळबंधा जलाशयात पाणी नाही. दुष्काळी परिस्थिती दिसत आहे. पाण्याने दडी मारली पण वैनगंगेत पाणी मुबलक आहे. धापेवाडा टप्पा दोनचे पाणी सोडले तर शेतकरी सुजलाम होईल. यावर्षी पाणी न दिल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे. (वार्ताहर)