शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

१० वर्षांपासून खळबंदा जलाशय वनवासात

By admin | Updated: July 16, 2014 00:15 IST

गोंदिया तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प खळबंदा जलाशय ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षापासून खळबंदा जलाशयात धापेवाडा प्रकल्प टप्पा दोनचे पाणी पाईपव्दारे पोहचण्यात यावे,

परसवाडा : गोंदिया तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प खळबंदा जलाशय ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षापासून खळबंदा जलाशयात धापेवाडा प्रकल्प टप्पा दोनचे पाणी पाईपव्दारे पोहचण्यात यावे, अशी मागणी तिरोडा तालुक्यातील अर्जुनी, चांदोरी खुर्द व जलाशयाअंतर्गत येत असलेल्या गावांतील नागरिकांनी केली आहे. लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे जलाशयाची पाईप लाईन अजूनही अपूर्ण आहे. खळबंदा जलाशय हे ब्रिटीशकालीन आहे. या जलाशयापासून पूर्वीच्या काळात चांदोरी खुर्दपर्यंत पाणी जात होते. मुबलक सिंचन होत होते. भाजपा-सेनेच्या काळात तत्कालीन पाटबंधारे मंत्री महादेवराव शिवणकर यांनी पुजारीटोला धरणाचे पाणी खळबंदा जलाशयात सोडण्यासाठी कालवे तयार केले. कोट्यवधी रुपये वाया गेले व एक थेंब पाणी कालव्याने गेले नाही. केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल असताना धापेवाडा टप्पा दोनचे पाणी पाईप लाईनव्दारे टाकण्याचे आश्वासन दिले होते. पण पाईप अपुर्ण असल्यामुळे मृतावस्थेत पाईपलाईन पडून आहे. धापेवाडा टप्पा दोन बॅरेजचे लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजीत पवार आले होते. प्रफुल्ल पटेल यांनी जून महिन्यात खळबंदा जलाशयात पाणी सोडले जाईल, काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले होते. पण राज्य शासनाने पाठपुरावा केला नसल्याने काहीच झाले नाही. तत्कालीन आ.दिलीप बन्सोड यांनी पाणी जलाशयात पाच वर्षातच मिळेल, अशी खात्री दिली होती. पण समोर संधी न मिळाल्याने त्यांनी ही वरिष्ठाच्या माथ्यावर मारले. नवनिर्वाचित खासदार, आमदार असताना बोट दुसऱ्याकडे दाखवित होते. आंदोलन मोर्चे काढीत होते पण निवडून आल्याच्या दिवशीपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी दुष्काळावर एकही शब्द निघाला नाही.निसर्गाच्या भरवशावर राहून खरीप पिके घेऊनच आपला उदरनिर्वाह येथील शेतकऱ्यांना चालवावा लागतो. उन्हाळ्याच्या दिवसात रोजगाराच्या शोधात जिल्ह्यातील शेतकरी नागपूर, मुंबई, गुजरात, तेंदूपत्ता व मोठ्या शहराच्या ठिकाणी जावे लागते. सिंचनाची नियमित सोय झाल्यास गावातच काम मिळाले असते. शेतकरी सुजलाम, सुफलाम झाला असता, जिल्ह्यात आमदार, खासदार, केंद्रात व राज्यात वजन आहे. पण कुणीही मनाला लावून घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. फक्त निवडणुकीच्या काळात आश्वासन व्यतिरीक्त काहीच पदरात पडत नाही. ही वस्तुस्थिती पुढे येत आहे. खळबंधा जलाशयात पाणी नाही. दुष्काळी परिस्थिती दिसत आहे. पाण्याने दडी मारली पण वैनगंगेत पाणी मुबलक आहे. धापेवाडा टप्पा दोनचे पाणी सोडले तर शेतकरी सुजलाम होईल. यावर्षी पाणी न दिल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे. (वार्ताहर)