शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

१० वर्षांपासून खळबंदा जलाशय वनवासात

By admin | Updated: July 16, 2014 00:15 IST

गोंदिया तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प खळबंदा जलाशय ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षापासून खळबंदा जलाशयात धापेवाडा प्रकल्प टप्पा दोनचे पाणी पाईपव्दारे पोहचण्यात यावे,

परसवाडा : गोंदिया तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प खळबंदा जलाशय ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षापासून खळबंदा जलाशयात धापेवाडा प्रकल्प टप्पा दोनचे पाणी पाईपव्दारे पोहचण्यात यावे, अशी मागणी तिरोडा तालुक्यातील अर्जुनी, चांदोरी खुर्द व जलाशयाअंतर्गत येत असलेल्या गावांतील नागरिकांनी केली आहे. लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे जलाशयाची पाईप लाईन अजूनही अपूर्ण आहे. खळबंदा जलाशय हे ब्रिटीशकालीन आहे. या जलाशयापासून पूर्वीच्या काळात चांदोरी खुर्दपर्यंत पाणी जात होते. मुबलक सिंचन होत होते. भाजपा-सेनेच्या काळात तत्कालीन पाटबंधारे मंत्री महादेवराव शिवणकर यांनी पुजारीटोला धरणाचे पाणी खळबंदा जलाशयात सोडण्यासाठी कालवे तयार केले. कोट्यवधी रुपये वाया गेले व एक थेंब पाणी कालव्याने गेले नाही. केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल असताना धापेवाडा टप्पा दोनचे पाणी पाईप लाईनव्दारे टाकण्याचे आश्वासन दिले होते. पण पाईप अपुर्ण असल्यामुळे मृतावस्थेत पाईपलाईन पडून आहे. धापेवाडा टप्पा दोन बॅरेजचे लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजीत पवार आले होते. प्रफुल्ल पटेल यांनी जून महिन्यात खळबंदा जलाशयात पाणी सोडले जाईल, काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले होते. पण राज्य शासनाने पाठपुरावा केला नसल्याने काहीच झाले नाही. तत्कालीन आ.दिलीप बन्सोड यांनी पाणी जलाशयात पाच वर्षातच मिळेल, अशी खात्री दिली होती. पण समोर संधी न मिळाल्याने त्यांनी ही वरिष्ठाच्या माथ्यावर मारले. नवनिर्वाचित खासदार, आमदार असताना बोट दुसऱ्याकडे दाखवित होते. आंदोलन मोर्चे काढीत होते पण निवडून आल्याच्या दिवशीपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी दुष्काळावर एकही शब्द निघाला नाही.निसर्गाच्या भरवशावर राहून खरीप पिके घेऊनच आपला उदरनिर्वाह येथील शेतकऱ्यांना चालवावा लागतो. उन्हाळ्याच्या दिवसात रोजगाराच्या शोधात जिल्ह्यातील शेतकरी नागपूर, मुंबई, गुजरात, तेंदूपत्ता व मोठ्या शहराच्या ठिकाणी जावे लागते. सिंचनाची नियमित सोय झाल्यास गावातच काम मिळाले असते. शेतकरी सुजलाम, सुफलाम झाला असता, जिल्ह्यात आमदार, खासदार, केंद्रात व राज्यात वजन आहे. पण कुणीही मनाला लावून घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. फक्त निवडणुकीच्या काळात आश्वासन व्यतिरीक्त काहीच पदरात पडत नाही. ही वस्तुस्थिती पुढे येत आहे. खळबंधा जलाशयात पाणी नाही. दुष्काळी परिस्थिती दिसत आहे. पाण्याने दडी मारली पण वैनगंगेत पाणी मुबलक आहे. धापेवाडा टप्पा दोनचे पाणी सोडले तर शेतकरी सुजलाम होईल. यावर्षी पाणी न दिल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे. (वार्ताहर)