शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
2
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
3
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
5
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
6
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
7
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
8
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
9
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
10
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
11
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
12
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
13
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
14
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
15
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
16
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
17
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
18
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
19
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
20
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचे तापमान ४५ डिग्रीच्या घरात

By admin | Updated: June 8, 2014 00:01 IST

शनिवारपासून मृग नक्षत्राला सुरूवात झाली असली तरी जिल्ह्यात पाऊस काही फिरकलेला नाही. उलट तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ३१ मे रोजी जिल्ह्यात

गोंदिया : शनिवारपासून मृग नक्षत्राला सुरूवात झाली असली तरी जिल्ह्यात पाऊस काही फिरकलेला नाही. उलट तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ३१ मे रोजी जिल्ह्यात सर्वाधिक ४५.१ एवढी तापमानाची नोंद घेण्यात आली होती. मागील दिवसांत मात्र हा रिकॉर्ड तुटला असून आता पारा ४५.३ च्या घरात गेल्याची नोंद शासकीय यंत्रणेने घेतली आहे. तर कमाल तापमानासह किमान तापमान सुद्धा चढले असून २९.८ एवढी नोंद घेण्यात आली आहे. एप्रिलच्या सुरूवातीच्या पंधरवड्यानंतर उन्हाळा आपल्या रंगात आला, तर मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली. यावर्षी ३१ मे रोजी सर्वाधिक तापमान ४५.१ अं.से. पेक्षा जास्त नोंदविण्यात आले. यामुळे उष्णतेच्या लाटेने जनजीवनावर तीव्र परिणाम झाला. दुपारी १२ वाजतानंतर घराबाहेर पडणे नागरिकांनी बंद केले आहे. शहरातील रस्ते व बाजारपेठ १२ ते ५ या वेळेत सामसूम असते. एकंदरीत शहरात अघोषित संचारबंदी असते. गेल्या आठ दिवसांपासून सतत गोंदियाचे तापमान ४३ अंशांपेक्षा जास्त राहत असल्यामुळे दुपारी १२ वाजतानंतर कोणीच घराबाहेर पडताना दिसत नाही.नवतपाचा हा कहर म्हणता आला असला तरीही आता नवतपा नसतानासुद्धा तापमान वाढतच चालले आहे.  कारण ६ जून रोजी कमाल तापमान ४५.३ अं.से. नोदण्यात आले होते. तर उन्हाची तीच दाहकता ७ जून रोजीही दिसून आली. ७ जून रोजी कमाल तापमान ४५.३ एवढे नोंदण्यात आले. विशेष म्हणजे किमान तापमानही चांगलेच वाढल्याचीही नोंद घेण्यात आली. कमाल तापमान २९.८ अं.से. एवढे नोंद घेण्यात आले. उष्णतेच्या या लाटेने गोंदिया चांगलाच तापत असून अशात कुलरसुद्धा काम करीत नसल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. उष्णतेचा कोप सुरू असतानाच त्यात वेळी-अवेळी होत असलेले भारनियमन जखमेवर मिठाचे काम करीत आहे. उकाड्याने अंगाची लाही-लाही होत असल्याने नागरिक बाहेर निघणे टाळत आहेत. तर भारनियमनामुळे घरात जीव गुदमरू लागला असून नागरिकांसाठी इकडे-आड व तिडके विहीर अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. मान्सून आणखी चार दिवसांनी दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यामुळे आणखी चार दिवस या भट्टीत काढावेच लागणार आहेत. यात ही  विशेष बाब म्हणजे दिवस तर कडक उष्णतेत कापावा लागतच आहे. मात्र   किमान तापमानही २९.८ अं.से. पर्यंत  पोहोचल्याने रात्रीही उष्ण लपटांचे चटके बसतच आहे. आता असह्या झालेल्या या उष्णतेपासून मुक्तता मिळावी यासाठी सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)