शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

लोधीटोल्यात तांत्रिक पद्धतीने शेती

By admin | Updated: July 21, 2014 23:56 IST

तिरोडा तालुक्याच्या लोधीटोला येथील प्रगतीशील शेतकरी राधेश्याम नागपुरे हे तिरोडा कृषी विभागाच्या मार्गदर्शनात शेती करून भरपूर उत्पन्न काढत आहेत. नऊ वर्षापासून संपूर्ण शेती श्री पद्धतीने

काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या लोधीटोला येथील प्रगतीशील शेतकरी राधेश्याम नागपुरे हे तिरोडा कृषी विभागाच्या मार्गदर्शनात शेती करून भरपूर उत्पन्न काढत आहेत. नऊ वर्षापासून संपूर्ण शेती श्री पद्धतीने लागवड करीत आहेत. नोकरीपेक्षा शेती परवडण्यासारखी असल्याचे त्यांनी ठामपणे शेतकऱ्यांना सांगितले आहे. लोधीटोला येथील प्रगतीशील शेतकरी राधेश्याम नागपुरे यांनी सांगितले की, तिरोडा कृषी विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे, प्रशिक्षण व प्रत्यक्ष जावून मार्गदर्शन घेवून शेती करीत असल्याने आपल्याला शेतीतून भरपूर लाभ मिळतो. ‘राबेल त्याची शेती’ असेही ते म्हणाले. आपण सन २००५ पासून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने श्री पद्धतीने धानाची लागवड करीत असून दीड पटीने उत्पन्नात वाढ होताना दिसून आले आहे. यावर्षी १७ एकर शेतात श्री पद्धतीने लागवड केली असून कृषी सहायिका नूतन पानतावने यांनी वेळोवेळी शेतात भेटी देवून मार्गदर्शन केल्याचे सांगितले. श्री पद्धतीतून एकरी २८ ते ३५ क्विंटल (४० त९ी ४५ पोती) धानाचे उत्पन्न मिळते, असेही त्यांनी सांगितले. धानाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने खोल नांगरणी करावी, धसकटे व काडीकचरा जाळणे, बियाणे बीजप्रक्रिया करून गादीवाफ्यावर रोपे तयार करून लावणे, त्याचबरोबर रोवणी करण्यापूर्वी चिखलावर झिंक सल्फेट घालून २५ बाय २५ सेमी अंतरावर रोपांची लागवड करावी. तसेच गिरीपुष्पाची पाने व फांद्या तोडून चिखलात टाकल्याने नत्राची मात्रा अधिक प्रमाणात मिळते. नियंत्रित रोपांची लागवड करून निंदन व खताची योग्य मात्रा देवून काळजी घेतली तर उत्पन्न भरपूर मिळू शकते, असा सल्ला राधेश्याम नागपुरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. आपण परंपरागत शेती पद्धतीला बगल देवून आधुनिक पद्धतीने शेती करीत असल्याने आपल्याला समाधान वाटत असून त्यासाठी कृषी सहायिका नूतन पानतावने यांचे सहकार्य व मार्गदर्शन मोलाचे ठरल्याने ते म्हणाले. धानाच्या शेतीसोबत तांत्रिक मार्गदर्शनातून हरभरा, गहू, भाजीपाला, वांगी, टमाटर, मिरची यासारख्या पिकांचे उत्त्पन्न घेतल्या जात आहे. तालुका कृषी अधिकारी पी.व्ही. पोटदुखे, मंडळ कृषी अधिकारी के.आर. रहांगडाले, कृषी पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांच्या वेळोवेळी देण्यात येणाऱ्या भेटी व मार्गदर्शनातून शेतात सुधारणा करण्याची संधी मिळाली, असे शेतकरी नागपुरे यांनी सांगितले.