शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

शाळा फुलविणाऱ्या शिक्षिका दीक्षा फुलझेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 21:49 IST

तेजस्वी राष्ट्र घडविण्यासाठी आदर्श शिक्षक हवेत. जिद्द, चिकाटी, सातत्य हे विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी खर्च केले तर कार्याचे चिज होते. विद्यार्थी घडलेत तर गुरूंचे नावलौकीक होतो. विद्यार्थ्यांना घडवितांना आपला आदर्श देखील उभा राहायला हवा, असे कार्य गुरूजींच्या हातून घडावे हे समाजाला अपेक्षित असते.

ठळक मुद्देअल्पवयात लग्न झाल्यानंतर सासरी शिक्षण घेऊन झाल्या शिक्षिका

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कतेजस्वी राष्ट्र घडविण्यासाठी आदर्श शिक्षक हवेत. जिद्द, चिकाटी, सातत्य हे विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी खर्च केले तर कार्याचे चिज होते. विद्यार्थी घडलेत तर गुरूंचे नावलौकीक होतो. विद्यार्थ्यांना घडवितांना आपला आदर्श देखील उभा राहायला हवा, असे कार्य गुरूजींच्या हातून घडावे हे समाजाला अपेक्षित असते. त्याच दिशेने शिक्षकी पेशात दीक्षा फुलझेले यांनी काम केले आहे.आमगाव तालुक्याच्या कुंभारटोली येथे कार्यरत सहाय्यक शिक्षिका दीक्षा महादेव फुलझेले यांचा जन्म वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील सोनेगाव येथे झाला.त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. त्यांचे वडील शेतकरी होते. पालक निरक्षर होते. इयत्ता १ ते ४ वर्ग सोनेगाव येथे शिक्षण घेतले. ५ वी ते १० वी पर्यंतचे जिवनापूर येथे दोन कि.मी.पायी जाऊन शिकल्या. १ ली ते ९ वीपर्यंत प्रथम क्रमांक घेऊन पास झाल्या.१० वी मध्ये शिकत असताना आजारामुळे गणित विषयात त्या नापास झाल्या.त्यांच्या वडीलांनी त्यांचे लग्न वयाच्या १७ व्या वर्षी कुही येथील फुलचंद राऊत यांच्याशी सन १९८५ करून दिले. ते भंडारा जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील चिचगड येथे राहत होते. अल्पवयात झालेले त्यातच घरात फारसे कुणाचे शिक्षण नसतांना इतरांना शिक्षणासंदर्भात गोडीही नव्हती. परंतु दिक्षा यांनी शिक्षणाशी गोडी लावून लग्नानंतर १२ वी पास केले. सासरीच राहून विद्यार्थ्याना ज्ञानी कसे बनविता येईल यासाठी त्या झटल्या.रामाटोला हे खेडेगाव असल्याने तेथील विद्यार्थ्याचे पालक निरक्षर होते. तेथे साक्षरतेचे सायंकाळी खूप दिवस वर्ग लावले. सन २००२ मध्ये सर्वाना साक्षर केले. शिक्षण कार्याव्यतिरिक्त सन २००५ मध्ये गावाला हागणदारी गाव मुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळीे शाळेला ‘साने गुरुजी स्वच्छ शाळा’ ही स्पर्धा जाहीर केली. शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले. झाडे लावले, बगीचा, वाचन कोपरा तयार केला. गांडूळ यात नॅडम खत खड्डा, विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती व १०० प्रगती स्वेच्छेने सर्व संदेश यामध्ये सर्व उपक्रम तयार केले. त्यांनी जिव्ह्याळ्यातून शाळेला फुलविल्यामुळे तत्कालीन आयुक्त भालचंद भोसले यांच्या तपासणीत शाळेचा प्रथम क्रमांक मिळाला. विद्यार्थ्यांचे जीवन यशस्वी व्हावे यासाठी योगेश्वरी जियालाल राऊत हिला दत्तक घेतले. तिला अभ्यासाचे मार्गदर्शन व इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर अंजोरा येथे त्यांची बदली झाली. तेथे सुध्दा अप्रगत विद्यार्थ्याकरीता जास्तीचे वर्ग घेऊन १०० टक्के उपस्थिती व प्रगती हे ध्येय गाठले. तेथे १ ते ८ वर्ग असल्यामुळे खो-खो कबड्डी सारखे खेळाचे सामने घेतले. सांस्कृतिक कार्यक्रम, महिला मेळाव्यातून महिला सक्षमीकरणाचे काम केले. हे त्यांचे कार्य पाहता जिल्हा परिषदेने सन २०१५ साली सावित्रीबाई फुले पुरस्कार त्यांना प्रदान केला. त्यानंतरही त्यांनी स्वत:चे शिक्षण चालू ठेवून त्या पदवीधर झाल्या.लग्नानंतर घेतले शिक्षणसासरी गेल्यानंतर दिक्षा १० वी गणित ८५ टक्के गुण घेऊन पास झाल्या.नंतर डी.एड. उतीर्ण केले. सन १९९० ते १९९७ पर्यंत स्मिता प्राथमिक शाळा शिरपूर येथे दोन किलोमीटर पायी चालत जाऊन नोकरी केली. त्यांच्या घरची परिस्थिती हलाकीची होती.त्यानंतर १९९७ मध्ये दुय्यम निव्वळ सेवा मंडळ भंडारा येथे उतीर्ण केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुक्कीमेटा शाळेत नोकरी मिळाली तेथे त्यांनी साक्षरता वर्ग घेतले.

टॅग्स :Teacherशिक्षक