शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

गुणवत्तेसाठी शिक्षकांची धडपड

By admin | Updated: November 8, 2015 01:53 IST

अनेकदा शिक्षण विभागाला पत्रव्यवहाराद्वारे कळवूनही उपयोग झाला नाही. वर्षभरापासून लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले.

निलज खुर्द शाळेची व्यथा : शिक्षकांच्या कमतरतेकडे विभागाचे दुर्लक्षकरडी (पालोरा) : अनेकदा शिक्षण विभागाला पत्रव्यवहाराद्वारे कळवूनही उपयोग झाला नाही. वर्षभरापासून लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले. मुलांची शैक्षणिक गुणवत्ता ठासळू पाहत होती. अध्यापनाचे कार्य खंडीत होत होते. यावर उपाय म्हणून शिक्षकांनीच पुढाकार घेतला आणि स्वत:च्या वेतनातून दोन पदवीधरांची परस्पर नेमणूक केली. मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द शाळेतील हा प्रकार आहे. शाळेत इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळेत दोन पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त असून मुख्याध्यापकाला स्वत:च तिन्ही वर्ग सांभाळावे लागत आहे.निलज खुर्द येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठविपर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. विद्यार्थी पटसंख्या १०८ आहे. प्राथमिक स्तरावरील वर्ग १ ते ५ मध्ये तीन शिक्षकांची नियुक्ती आहे. परंतू वर्ग ६ ते ८ मध्ये एकाच पदविधराची नियुक्ती आहे. सदर पदवीधर शिक्षक नरेंद्र देशमुख यांचेकडे मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे. शाळेचे अध्यापन व विविध कार्य, प्रशिक्षण, बैठका, सांभाळताना अध्यापनाचे कार्य मागे राहायचे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गुणवत्ता ढासळण्याच्या मार्गावर आहे. दोन पदविधरांची नियुक्ती करावी, याबाबत गटशिक्षणाधिकारी मोहाडी यांना अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र कार्यवाही झाली नाही. शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनाला अनेकदा कळविण्यात आले. मात्र उपयोग झाला नाही.शिक्षकांची कमतरता असल्याचे कारण प्रत्यकवेळी सांगण्यात आले, पण समस्याचे समाधान कुणीही काढले नाही. अच्छे दिनाचे नारे देणाऱ्यांनी सुद्धा बुरे दिन सुरू झाले असताना व्यवस्था परिवर्तनासाठी वेळीच पावले उचलली नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुचंबना सुरू झाली.कुणीही लक्ष देत नसल्याचे लक्षात आल्यानेच शाळेतील मुख्याध्यापकासह शिक्षकांनीच समस्येवर उपाय शोधण्याचे ठरविले. त्यांनी स्वत:च्या वेतनातून दोन शिक्षकांची मानधनावर परस्पर नियुक्त करून विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचे कार्य सुरू करण्यात आले आहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीवर शासनाकडून चिंतन होत असताना शिक्षकांनी मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी हाती घेतलेला उपक्रम शासन व समाजासमोर आदर्श ठरला आहे.(वार्ताहर)