शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

शिक्षण विभागाचे भिजत घोंगडे, शिक्षक होण्याचे स्वप्न कधी होणार पूर्ण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 15:23 IST

राज्यातील बहुतांश शाळांत शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ५०० शिक्षक पदे रिक्त आहेत. यामध्ये मराठी आणि हिंदी माध्यमांच्या शिक्षक पदांचा समावेश आहे.

ठळक मुद्देअनेकजण नोकरीच्या प्रतीक्षेत

गोंदिया :शिक्षकांची हजारो पदे राज्याच्या शिक्षण विभागात रिक्त आहेत. त्यातच नवीन भरती प्रक्रिया राबविण्याच्या प्रक्रियेतच सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे याचा परिणाम भावी शिक्षकांवर होत आहे. केवळ पारदर्शकतेच्या नावाखाली एकाच भरती प्रक्रियेला चार-चार वर्षे लागत असल्याने डी.एड.,बी.एड. बेरोजगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. पवित्र पोर्टलची प्रक्रिया फारच मंद गतीने सुरू असल्याने शिक्षक होण्याचे अनेकांचे स्वप्न केवळ स्वप्नच राहण्याची शक्यता आहे.

राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी डिसेंबर २०१७ मध्ये परीक्षा घेण्यात आली. चार वर्षे लोटत आली तरी पवित्र पोर्टलची प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नाही. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावाडे यांच्यापासून सुरू झालेली ही प्रक्रिया माजी मंत्री आशिष शेलार आणि आता विद्यमान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचली आहे. राज्यात सेना-भाजपचे सरकार बदलून महाविकास आघाडीचे सरकार आले. तरी शिक्षक भरतीचा हा पवित्र खेळ सुरूच आहे. या-ना त्या कारणाने भरती पुढे ढकलत गेली.

तत्कालीन सरकारने शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले. शिक्षक भरतीत भ्रष्टाचार होऊ नये, गुणवत्तापूर्ण शिक्षक शाळांना मिळावेत, यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा निर्णय तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावाडे यांनी २०१७ साली घेतला. आतापर्यंत या पोर्टलवर १ लाख २३ हजार उमेदवारांनी नोंदी केली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, माध्यमिक व प्राथमिक शाळांनी पोर्टलवर जाहिरातीही प्रसिद्ध केल्या. पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी शिक्षकांची राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांनी मुलाखतीशिवाय गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी होकार दर्शविला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांसाठी मेरीटनुसार नियुक्त्या करण्यात आल्या.

वाट पाहण्यात गेली चार वर्ष

भावी शिक्षकांच्या आयुष्याची ४ वर्षे भरतीची वाट पाहण्यात वाया गेली. नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनाच्या तोंडावर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची घोषणा केली. मात्र, अद्याप ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. राज्यातील बहुतांश शाळांत शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ५०० शिक्षक पदे रिक्त आहेत. यामध्ये मराठी आणि हिंदी माध्यमांच्या शिक्षक पदांचा समावेश आहे.

सोशल मीडियाची चळवळ

गेल्यावर्षी ५ मे रोजी शिक्षण विभागाने कोरोनाचे कारण सांगून जी स्थगिती भरती प्रक्रियेला दिली. त्यातून शिक्षक भरतीला वगळण्यात यावे. यासाठी राज्यभरातून सोशल मीडियावर चळवळ उभी राहिली. केवळ पारदर्शकतेच्या नावाखाली पवित्र पोर्टलचा सावळा गोंधळ सुरू केल्याने या चळवळीचाही लाभ झाल्याचे दिसून आले नाही.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकTeachers Recruitmentशिक्षकभरती