शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाचे भिजत घोंगडे, शिक्षक होण्याचे स्वप्न कधी होणार पूर्ण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 15:23 IST

राज्यातील बहुतांश शाळांत शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ५०० शिक्षक पदे रिक्त आहेत. यामध्ये मराठी आणि हिंदी माध्यमांच्या शिक्षक पदांचा समावेश आहे.

ठळक मुद्देअनेकजण नोकरीच्या प्रतीक्षेत

गोंदिया :शिक्षकांची हजारो पदे राज्याच्या शिक्षण विभागात रिक्त आहेत. त्यातच नवीन भरती प्रक्रिया राबविण्याच्या प्रक्रियेतच सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे याचा परिणाम भावी शिक्षकांवर होत आहे. केवळ पारदर्शकतेच्या नावाखाली एकाच भरती प्रक्रियेला चार-चार वर्षे लागत असल्याने डी.एड.,बी.एड. बेरोजगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. पवित्र पोर्टलची प्रक्रिया फारच मंद गतीने सुरू असल्याने शिक्षक होण्याचे अनेकांचे स्वप्न केवळ स्वप्नच राहण्याची शक्यता आहे.

राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी डिसेंबर २०१७ मध्ये परीक्षा घेण्यात आली. चार वर्षे लोटत आली तरी पवित्र पोर्टलची प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नाही. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावाडे यांच्यापासून सुरू झालेली ही प्रक्रिया माजी मंत्री आशिष शेलार आणि आता विद्यमान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचली आहे. राज्यात सेना-भाजपचे सरकार बदलून महाविकास आघाडीचे सरकार आले. तरी शिक्षक भरतीचा हा पवित्र खेळ सुरूच आहे. या-ना त्या कारणाने भरती पुढे ढकलत गेली.

तत्कालीन सरकारने शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले. शिक्षक भरतीत भ्रष्टाचार होऊ नये, गुणवत्तापूर्ण शिक्षक शाळांना मिळावेत, यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा निर्णय तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावाडे यांनी २०१७ साली घेतला. आतापर्यंत या पोर्टलवर १ लाख २३ हजार उमेदवारांनी नोंदी केली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, माध्यमिक व प्राथमिक शाळांनी पोर्टलवर जाहिरातीही प्रसिद्ध केल्या. पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी शिक्षकांची राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांनी मुलाखतीशिवाय गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी होकार दर्शविला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांसाठी मेरीटनुसार नियुक्त्या करण्यात आल्या.

वाट पाहण्यात गेली चार वर्ष

भावी शिक्षकांच्या आयुष्याची ४ वर्षे भरतीची वाट पाहण्यात वाया गेली. नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनाच्या तोंडावर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची घोषणा केली. मात्र, अद्याप ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. राज्यातील बहुतांश शाळांत शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ५०० शिक्षक पदे रिक्त आहेत. यामध्ये मराठी आणि हिंदी माध्यमांच्या शिक्षक पदांचा समावेश आहे.

सोशल मीडियाची चळवळ

गेल्यावर्षी ५ मे रोजी शिक्षण विभागाने कोरोनाचे कारण सांगून जी स्थगिती भरती प्रक्रियेला दिली. त्यातून शिक्षक भरतीला वगळण्यात यावे. यासाठी राज्यभरातून सोशल मीडियावर चळवळ उभी राहिली. केवळ पारदर्शकतेच्या नावाखाली पवित्र पोर्टलचा सावळा गोंधळ सुरू केल्याने या चळवळीचाही लाभ झाल्याचे दिसून आले नाही.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकTeachers Recruitmentशिक्षकभरती