शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

जनतेचा विश्वासघात करणाºयांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:05 IST

जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने प्रत्यक्षात मात्र जनतेची दिशाभूल केली. शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य नागरिकांना दिलेल्या एकाही आश्वासनाची अद्यापही पूर्तत: केली नाही.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तालुक्यात ठिकठिकाणी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने प्रत्यक्षात मात्र जनतेची दिशाभूल केली. शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य नागरिकांना दिलेल्या एकाही आश्वासनाची अद्यापही पूर्तत: केली नाही. त्यामुळे खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणाºया सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन आ.गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आ.अग्रवाल यांनी तालुक्यात ठिकठिकाणी सभा घेऊन नागरिकांशी संवाद साधत आहे. शनिवारी (दि.१४) तालुक्यातील पठानटोला,गोंडीटोला येथे आयोजित सभेप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे, जि.प.सभापती विमल नागपूरे, पी.जी.कटरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, रमेश अंबुले, सीमा मडावी, शेखर पटले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, स्रेहा गौतम, ओमप्रकाश भक्तवर्ती, चमन बिसेन, मनिष मेश्राम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन उपस्थित होते. आ.अग्रवाल म्हणाले, दिल्ली ते गल्लीपर्यंत सरकार चालविण्याचे कौशल्य केवळ काँग्रेसकडे आहे. भाजप नेत्यानी जनतेला मोठी मोठी आश्वासने दिली. मात्र सत्तेवर आल्यानंतर त्यांना या सर्व आश्वासनाचा विसर पडला आहे. याच पक्षाचे नेते आता गावा गावात जाऊन ७० वर्षांत काँग्रेसने काय केले असा सवाल करीत आहे. भाजपा नेत्यांनी सत्तेवर आल्यानंतर केवळ जनतेच्या विकासाऐवजी स्वत:चा विकास केल्याचा आरोप केला.काँग्रेस सरकारने महिला आणि युवकांच्या समस्यांना नेहमीच प्राधान्य दिले. स्थानिक स्वराज संस्थामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देत त्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी माहितीचा अधिकार कायदा लागू करुन जनतेला हक्क मिळवून देण्याचे काम केले. तर भाजपा सरकार केवळ जनतेला केवळ खोटी आश्वासने देण्यात व्यस्त आहे. या परिसरातील सिंचन तसेच शेतकºयांच्या अनेक समस्या मार्गी लावल्या.यापुढेही या परिसराच्या विकासासाठी आपण कठिबध्द असल्याचे सांगितले. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी योग्य उमेदवाराची निवड करावी. तसेच विकास कामे करणाºयांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.तालुक्यात ठिकठिकाणी सभाजिल्ह्यात १६ आॅक्टोबरला होवू घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आ.अग्रवाल यांनी शनिवारी (दि.१४) तालुक्यातील पठानटोला, गोंडीटोला, रतनारा, सालईटोला, धामनगाव, टेमनी, चुलोद बिरसी येथे सभा घेतली. तसेच गावकºयांशी संवाद साधला.