शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जनतेचा विश्वासघात करणाºयांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:05 IST

जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने प्रत्यक्षात मात्र जनतेची दिशाभूल केली. शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य नागरिकांना दिलेल्या एकाही आश्वासनाची अद्यापही पूर्तत: केली नाही.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तालुक्यात ठिकठिकाणी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने प्रत्यक्षात मात्र जनतेची दिशाभूल केली. शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य नागरिकांना दिलेल्या एकाही आश्वासनाची अद्यापही पूर्तत: केली नाही. त्यामुळे खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणाºया सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन आ.गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आ.अग्रवाल यांनी तालुक्यात ठिकठिकाणी सभा घेऊन नागरिकांशी संवाद साधत आहे. शनिवारी (दि.१४) तालुक्यातील पठानटोला,गोंडीटोला येथे आयोजित सभेप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे, जि.प.सभापती विमल नागपूरे, पी.जी.कटरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, रमेश अंबुले, सीमा मडावी, शेखर पटले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, स्रेहा गौतम, ओमप्रकाश भक्तवर्ती, चमन बिसेन, मनिष मेश्राम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन उपस्थित होते. आ.अग्रवाल म्हणाले, दिल्ली ते गल्लीपर्यंत सरकार चालविण्याचे कौशल्य केवळ काँग्रेसकडे आहे. भाजप नेत्यानी जनतेला मोठी मोठी आश्वासने दिली. मात्र सत्तेवर आल्यानंतर त्यांना या सर्व आश्वासनाचा विसर पडला आहे. याच पक्षाचे नेते आता गावा गावात जाऊन ७० वर्षांत काँग्रेसने काय केले असा सवाल करीत आहे. भाजपा नेत्यांनी सत्तेवर आल्यानंतर केवळ जनतेच्या विकासाऐवजी स्वत:चा विकास केल्याचा आरोप केला.काँग्रेस सरकारने महिला आणि युवकांच्या समस्यांना नेहमीच प्राधान्य दिले. स्थानिक स्वराज संस्थामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देत त्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी माहितीचा अधिकार कायदा लागू करुन जनतेला हक्क मिळवून देण्याचे काम केले. तर भाजपा सरकार केवळ जनतेला केवळ खोटी आश्वासने देण्यात व्यस्त आहे. या परिसरातील सिंचन तसेच शेतकºयांच्या अनेक समस्या मार्गी लावल्या.यापुढेही या परिसराच्या विकासासाठी आपण कठिबध्द असल्याचे सांगितले. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी योग्य उमेदवाराची निवड करावी. तसेच विकास कामे करणाºयांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.तालुक्यात ठिकठिकाणी सभाजिल्ह्यात १६ आॅक्टोबरला होवू घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आ.अग्रवाल यांनी शनिवारी (दि.१४) तालुक्यातील पठानटोला, गोंडीटोला, रतनारा, सालईटोला, धामनगाव, टेमनी, चुलोद बिरसी येथे सभा घेतली. तसेच गावकºयांशी संवाद साधला.