शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

जनतेचा विश्वासघात करणाºयांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:05 IST

जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने प्रत्यक्षात मात्र जनतेची दिशाभूल केली. शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य नागरिकांना दिलेल्या एकाही आश्वासनाची अद्यापही पूर्तत: केली नाही.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तालुक्यात ठिकठिकाणी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने प्रत्यक्षात मात्र जनतेची दिशाभूल केली. शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य नागरिकांना दिलेल्या एकाही आश्वासनाची अद्यापही पूर्तत: केली नाही. त्यामुळे खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणाºया सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन आ.गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आ.अग्रवाल यांनी तालुक्यात ठिकठिकाणी सभा घेऊन नागरिकांशी संवाद साधत आहे. शनिवारी (दि.१४) तालुक्यातील पठानटोला,गोंडीटोला येथे आयोजित सभेप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे, जि.प.सभापती विमल नागपूरे, पी.जी.कटरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, रमेश अंबुले, सीमा मडावी, शेखर पटले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, स्रेहा गौतम, ओमप्रकाश भक्तवर्ती, चमन बिसेन, मनिष मेश्राम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन उपस्थित होते. आ.अग्रवाल म्हणाले, दिल्ली ते गल्लीपर्यंत सरकार चालविण्याचे कौशल्य केवळ काँग्रेसकडे आहे. भाजप नेत्यानी जनतेला मोठी मोठी आश्वासने दिली. मात्र सत्तेवर आल्यानंतर त्यांना या सर्व आश्वासनाचा विसर पडला आहे. याच पक्षाचे नेते आता गावा गावात जाऊन ७० वर्षांत काँग्रेसने काय केले असा सवाल करीत आहे. भाजपा नेत्यांनी सत्तेवर आल्यानंतर केवळ जनतेच्या विकासाऐवजी स्वत:चा विकास केल्याचा आरोप केला.काँग्रेस सरकारने महिला आणि युवकांच्या समस्यांना नेहमीच प्राधान्य दिले. स्थानिक स्वराज संस्थामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देत त्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी माहितीचा अधिकार कायदा लागू करुन जनतेला हक्क मिळवून देण्याचे काम केले. तर भाजपा सरकार केवळ जनतेला केवळ खोटी आश्वासने देण्यात व्यस्त आहे. या परिसरातील सिंचन तसेच शेतकºयांच्या अनेक समस्या मार्गी लावल्या.यापुढेही या परिसराच्या विकासासाठी आपण कठिबध्द असल्याचे सांगितले. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी योग्य उमेदवाराची निवड करावी. तसेच विकास कामे करणाºयांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.तालुक्यात ठिकठिकाणी सभाजिल्ह्यात १६ आॅक्टोबरला होवू घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आ.अग्रवाल यांनी शनिवारी (दि.१४) तालुक्यातील पठानटोला, गोंडीटोला, रतनारा, सालईटोला, धामनगाव, टेमनी, चुलोद बिरसी येथे सभा घेतली. तसेच गावकºयांशी संवाद साधला.