शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचा विश्वासघात करणाºयांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:05 IST

जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने प्रत्यक्षात मात्र जनतेची दिशाभूल केली. शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य नागरिकांना दिलेल्या एकाही आश्वासनाची अद्यापही पूर्तत: केली नाही.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तालुक्यात ठिकठिकाणी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने प्रत्यक्षात मात्र जनतेची दिशाभूल केली. शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य नागरिकांना दिलेल्या एकाही आश्वासनाची अद्यापही पूर्तत: केली नाही. त्यामुळे खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणाºया सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन आ.गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आ.अग्रवाल यांनी तालुक्यात ठिकठिकाणी सभा घेऊन नागरिकांशी संवाद साधत आहे. शनिवारी (दि.१४) तालुक्यातील पठानटोला,गोंडीटोला येथे आयोजित सभेप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे, जि.प.सभापती विमल नागपूरे, पी.जी.कटरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, रमेश अंबुले, सीमा मडावी, शेखर पटले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, स्रेहा गौतम, ओमप्रकाश भक्तवर्ती, चमन बिसेन, मनिष मेश्राम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन उपस्थित होते. आ.अग्रवाल म्हणाले, दिल्ली ते गल्लीपर्यंत सरकार चालविण्याचे कौशल्य केवळ काँग्रेसकडे आहे. भाजप नेत्यानी जनतेला मोठी मोठी आश्वासने दिली. मात्र सत्तेवर आल्यानंतर त्यांना या सर्व आश्वासनाचा विसर पडला आहे. याच पक्षाचे नेते आता गावा गावात जाऊन ७० वर्षांत काँग्रेसने काय केले असा सवाल करीत आहे. भाजपा नेत्यांनी सत्तेवर आल्यानंतर केवळ जनतेच्या विकासाऐवजी स्वत:चा विकास केल्याचा आरोप केला.काँग्रेस सरकारने महिला आणि युवकांच्या समस्यांना नेहमीच प्राधान्य दिले. स्थानिक स्वराज संस्थामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देत त्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी माहितीचा अधिकार कायदा लागू करुन जनतेला हक्क मिळवून देण्याचे काम केले. तर भाजपा सरकार केवळ जनतेला केवळ खोटी आश्वासने देण्यात व्यस्त आहे. या परिसरातील सिंचन तसेच शेतकºयांच्या अनेक समस्या मार्गी लावल्या.यापुढेही या परिसराच्या विकासासाठी आपण कठिबध्द असल्याचे सांगितले. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी योग्य उमेदवाराची निवड करावी. तसेच विकास कामे करणाºयांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.तालुक्यात ठिकठिकाणी सभाजिल्ह्यात १६ आॅक्टोबरला होवू घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आ.अग्रवाल यांनी शनिवारी (दि.१४) तालुक्यातील पठानटोला, गोंडीटोला, रतनारा, सालईटोला, धामनगाव, टेमनी, चुलोद बिरसी येथे सभा घेतली. तसेच गावकºयांशी संवाद साधला.